शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
3
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
4
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
5
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
6
IRCTC Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
7
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
8
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
9
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
10
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
11
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
12
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
13
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
14
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
15
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
16
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
17
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
18
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
19
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
20
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य

हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:58 IST

पहलगामचा दहशतवादी हल्ला मानवतेवर, काश्मिरियतवर, भारतीयत्वावर आहे, असे सांगून खोऱ्यातील जनतेने निषेध नोंदविला. दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रतिसादापेक्षा काश्मिरी जनतेमधील हे स्थित्यंतर पाकिस्तानसाठी अधिक धक्कादायक असावे

कवी प्रदीप यांच्या सिद्धहस्त प्रतिभेचे लावण्य आणि लता मंगेशकर यांच्या कोकीळकंठातून काळाच्या कातळावर कोरल्या गेलेल्या, कोई सिख, कोई जाट-मराठा; कोई गुरखा, कोई मदरासी, सरहद पर मरनेवाला; हर वीर था भारतवासी... 

या अजरामर ओळींना सहा दशके उलटून गेली आहेत. भारत-चीन युद्धानंतर दिल्लीच्या रामलीला मैदानावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासमक्ष हे गीत २७ जानेवारी १९६३ ला पहिल्यांदा गायले गेले. काल, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नरसंहारात जीव गमावलेल्या बंगाली, मराठी, ओडिया, गुजराथी पर्यटकांचे संदर्भ दिले. तेव्हा, ‘ऐ मेरे वतन के लाेगो...’ गीतामधील विविधता अधोरेखित झाली. काश्मीर खोऱ्यातील मंगळवारच्या भ्याड हल्ल्यानंतर देश क्षुब्ध आहे. अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोरात आहे. देशभर मृत पर्यटकांना श्रद्धांजलीच्या मेणबत्त्यांसोबतच पाकिस्तानचे प्रतीकात्मक पुतळे पेटविले जात आहेत. भारतीयांच्या मनात संतापाचा आगडोंब उसळला आहे. अशावेळी वाईट प्रसंगातही काही चांगले घडत असेल तर ते देशवासीयांच्या चिरपरिचित एकजुटीचे दर्शन. धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, प्रादेशिक विविधतेचे आवाज एकमेकांत मिसळून गेले आहेत. त्या सर्वांमधून देशभक्तीचा एकच आवाज बुलंद झाला आहे.

भारतीयांमध्ये काही मतभेद असतील, काहीवेळा मनभेदही होत असतील, भांडणे किंवा वाद असतील; तथापि, संकटसमयी आपण भारतीय एक होतो. ऐक्याची वज्रमूठ बांधली जाते. शत्रूंवर तिचा मर्मभेदी प्रहार होतो, हेच यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. अशा निस्सीम राष्ट्रप्रेमाचे दर्शन १९६२ च्या चीन युद्धावेळी घडले. १९६५ मध्ये ‘जय जवान, जय किसान’ नारा घुमला. भुकेचा सामना करण्यासाठी आठवड्यात एका उपवासाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आवाहन देशाने स्वीकारले. १९७१ साली बांगलादेशनिर्मितीवेळी पाकिस्तानसोबत अमेरिकेनेही डोळे वटारले, तेव्हा स्वाभिमानी भारतीयांनी त्या महाशक्तीच्या नजरेला नजर भिडवली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पाकिस्तानचे दोन तुकडे केले. १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिल-द्रास भागात घुसखोरीची आगळीक केली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात सैन्याने पुन्हा अदम्य शाैर्य दाखविले. पाकिस्तान्यांना पळता भुई थोडी केली. तसाच एकमुखी आवाज आणि एकसंध प्रतिसाद आता पहलगाम हल्ल्यानंतर उमटतो आहे. या एकजुटीचा पहिला हुंकार जम्मू-काश्मिरातून झाला.

पहलगामचा दहशतवादी हल्ला मानवतेवर, काश्मिरियतवर, भारतीयत्वावर आहे, असे सांगून खोऱ्यातील जनतेने निषेध नोंदविला. दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रतिसादापेक्षा काश्मिरी जनतेमधील हे स्थित्यंतर पाकिस्तानसाठी अधिक धक्कादायक असावे. कारण, खोऱ्यातील जनता साेबत असल्याच्या वल्गना पाकिस्तान गेले पाऊण शतक करीत आला आहे. पाठोपाठ देशभरातील राजकीय पक्षांनी एकजूट दाखविली. गुरुवारी सायंकाळी राजधानी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सरकार जे करील त्याला एकमुखी पाठिंबा जाहीर केला. हा हल्ला झाल्यानंतर काही तासांतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून सहकार्याचा शब्द दिला. दोघांची ही कृती दुर्मीळ होती. राजकीय अभिनिवेश स्पर्धेऐवजी शत्रुत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याची अलीकडच्या काही वर्षांतील अनेक उदाहरणे समोर असताना अशा संकटसमयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची भूमिका घेतली म्हणून सरकारचे आणि त्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘हम सब एक है’ ही कोट्यवधींची भावना समजून घेतली म्हणून विरोधकांचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या बैठकीत सहभागी झाले असते आणि त्यांनी विरोधकांच्या या प्रतिसादाचा आदर केला असता तर अधिक चांगले झाले असते.

पहलगाममधील रक्तपाताने केवळ राजकीय वैरच बाजूला फेकले गेले असे नाही, तर टोकाला पोहोचलेला धार्मिक द्वेषही देशप्रेमात विरघळून गेला आहे. देशभरातील मुस्लीमधर्मीयांनी शुक्रवारी पवित्र नमाजावेळी दंडावर काळ्या फिती बांधून व्यक्त केलेली सहवेदना हीदेखील दखलपात्र आहे. काही जण अजूनही या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते यशस्वी होणार नाहीत, याची ती सामूहिक ग्वाही व जगाला दिलेली द्वाहीदेखील आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान