शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 05:44 IST

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे.

अलीकडील एक-दोन दशकात मान्सूनच्या पावसाची लय आणि चाल दोन्ही बिघडत असल्याचे दरवर्षी दिसते आहे. भारतात मान्सूनचा पाऊस  हा एकच पावसाळ्याचा ऋतू आहे. तो साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर असतो. मात्र या चार महिन्यातील कोणत्या आठवड्यात किंवा महिन्यात जोरदार पाऊस होईल याचा अंदाज लागत नाही. गतवर्षी जूनमध्ये एकूण पावसाच्या २१ टक्के पाऊस अपेक्षित असताना तो ३५ टक्के पडला. ऑगस्टमध्ये २८ टक्के अपेक्षित असताना केवळ १६ टक्केच पडला. वर्षाअखेरीस सरासरी १०९ टक्के पाऊस पडला. टक्केवारीच्या भाषेत उत्तम  अपेक्षेइतका पाऊस झाला असला तरी तो सलग होत नसल्याने पिकांच्या उगवणीवर  आणि वाढीवर परिणाम करून जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. यावर्षीची थंडी लवकर संपली आणि मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर भारतात कडक ऊन पडल्याने गव्हाचे उत्पादन एक कोटी टनाने घसरले. हा फटका शेतकऱ्यांना बसला आणि ग्राहकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे. निर्यातीवरही बंधने घालण्याची वेळ आली.  

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्राचे पाऊसमानाचे मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे विभाग आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील प्रत्येकी एक-दोन जिल्ह्यांचा अपवाद सोडला  तर पावसाने अजून सरासरी गाठलेली नाही. २० ते ५६ टक्क्यांपर्यंत या जिल्ह्यात पाऊस कमी आहे. विदर्भात यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांत फारच कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली इत्यादि जिल्ह्यांत अपवादवगळता बहुतांश तालुके कोरडे आहेत. हीच अवस्था मराठवाड्यात आहे. पश्चिम विदर्भातसुद्धा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. याचा परिणाम जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी महाराष्ट्रात सरासरी साठ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आणि जुलैमध्ये दांडी मारल्याने दुबार पेरण्यांचे संकट उद्भवले होते. यासाठीच मावळते कृषिमंत्री दादा भुसे पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन करीत खरिपाच्या तयारीचा विभागवार आढावा घेत होते.

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांना गती आलीच नाही. ज्या भागात पाऊस झाला आहे तेथे सोयाबीन आणि इतर कडधान्यांची पेरणी झाली आहे. जुलैपासून पावसाने जोर धरला असला तरी काही जिल्ह्यात सात दिवस एक मिलीमीटरदेखील पावसाची नोंद झालेली नाही. त्या तुलनेने कोकण किनारपट्टी आणि  सह्याद्री पर्वतरांगांच्या भागात आता पावसाने जोर धरला आहे. धरणांचा सरासरी पाणीसाठा आता वाढू लागला आहे. मुंबईने सरासरी बावीसशे मिलीमीटरपैकी एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद  गाठली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये महाबळेश्वर, आंबोली, कोयनानगर, भंडारदरा, ताम्हिणी घाट या परिसराने चार-पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी गाठली आहे.  लय आणि चाल बदलणाऱ्या मान्सूनच्या पावसाची धडकीच भरते आहे. याचा सर्वात मोठा फटका २००५  मध्ये मुंबई महानगरीला आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापणाऱ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याला बसला होता. २००६, २०१९ आणि २०२१ या तीन हंगामात पावसाने लय आणि चाल बदलून झोडपून काढले होते.

गतवर्षी मान्सूनच्या परतीच्या पावसाने मराठवाडा अक्षरशः धुवून काढला होता. प्रचंड हानी झाली. वाईटात चांगले घडते म्हणतात तसे मराठवाड्याचा रब्बीचा हंगाम चांगला गेला. उसाचे प्रचंड उत्पादन आले. सलग दोन वर्षे पावसाने उत्तम सरासरी गाठल्याचा तो  परिणाम होता. पण, पीकपद्धतीनुसार होणारे अतिउत्पादन किंवा नापिकी या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांचा तोटा करून जातात. सरकारलादेखील शेतमालाच्या उत्पादनाचा अंदाज येत नाही. आयात-निर्यातीचे वेडेवाकडे निर्णय घेऊन बाजारपेठेत विनाकारण हस्तक्षेप केला जातो, परिणाम शेतमालाचे दर कमी होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. हवामान बदलाने हे सर्व घडते आहे. याबद्दल आता संदिग्धता नाही. आसाम गेले तीन-चार आठवडे महापुरात डुबतो आहे आणि राजस्थान अचानक झालेल्या जोरदार पावसाने सावरतो आहे. याचा अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस