शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 05:44 IST

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे.

अलीकडील एक-दोन दशकात मान्सूनच्या पावसाची लय आणि चाल दोन्ही बिघडत असल्याचे दरवर्षी दिसते आहे. भारतात मान्सूनचा पाऊस  हा एकच पावसाळ्याचा ऋतू आहे. तो साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर असतो. मात्र या चार महिन्यातील कोणत्या आठवड्यात किंवा महिन्यात जोरदार पाऊस होईल याचा अंदाज लागत नाही. गतवर्षी जूनमध्ये एकूण पावसाच्या २१ टक्के पाऊस अपेक्षित असताना तो ३५ टक्के पडला. ऑगस्टमध्ये २८ टक्के अपेक्षित असताना केवळ १६ टक्केच पडला. वर्षाअखेरीस सरासरी १०९ टक्के पाऊस पडला. टक्केवारीच्या भाषेत उत्तम  अपेक्षेइतका पाऊस झाला असला तरी तो सलग होत नसल्याने पिकांच्या उगवणीवर  आणि वाढीवर परिणाम करून जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. यावर्षीची थंडी लवकर संपली आणि मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर भारतात कडक ऊन पडल्याने गव्हाचे उत्पादन एक कोटी टनाने घसरले. हा फटका शेतकऱ्यांना बसला आणि ग्राहकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे. निर्यातीवरही बंधने घालण्याची वेळ आली.  

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्राचे पाऊसमानाचे मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे विभाग आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील प्रत्येकी एक-दोन जिल्ह्यांचा अपवाद सोडला  तर पावसाने अजून सरासरी गाठलेली नाही. २० ते ५६ टक्क्यांपर्यंत या जिल्ह्यात पाऊस कमी आहे. विदर्भात यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांत फारच कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली इत्यादि जिल्ह्यांत अपवादवगळता बहुतांश तालुके कोरडे आहेत. हीच अवस्था मराठवाड्यात आहे. पश्चिम विदर्भातसुद्धा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. याचा परिणाम जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी महाराष्ट्रात सरासरी साठ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आणि जुलैमध्ये दांडी मारल्याने दुबार पेरण्यांचे संकट उद्भवले होते. यासाठीच मावळते कृषिमंत्री दादा भुसे पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन करीत खरिपाच्या तयारीचा विभागवार आढावा घेत होते.

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांना गती आलीच नाही. ज्या भागात पाऊस झाला आहे तेथे सोयाबीन आणि इतर कडधान्यांची पेरणी झाली आहे. जुलैपासून पावसाने जोर धरला असला तरी काही जिल्ह्यात सात दिवस एक मिलीमीटरदेखील पावसाची नोंद झालेली नाही. त्या तुलनेने कोकण किनारपट्टी आणि  सह्याद्री पर्वतरांगांच्या भागात आता पावसाने जोर धरला आहे. धरणांचा सरासरी पाणीसाठा आता वाढू लागला आहे. मुंबईने सरासरी बावीसशे मिलीमीटरपैकी एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद  गाठली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये महाबळेश्वर, आंबोली, कोयनानगर, भंडारदरा, ताम्हिणी घाट या परिसराने चार-पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी गाठली आहे.  लय आणि चाल बदलणाऱ्या मान्सूनच्या पावसाची धडकीच भरते आहे. याचा सर्वात मोठा फटका २००५  मध्ये मुंबई महानगरीला आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापणाऱ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याला बसला होता. २००६, २०१९ आणि २०२१ या तीन हंगामात पावसाने लय आणि चाल बदलून झोडपून काढले होते.

गतवर्षी मान्सूनच्या परतीच्या पावसाने मराठवाडा अक्षरशः धुवून काढला होता. प्रचंड हानी झाली. वाईटात चांगले घडते म्हणतात तसे मराठवाड्याचा रब्बीचा हंगाम चांगला गेला. उसाचे प्रचंड उत्पादन आले. सलग दोन वर्षे पावसाने उत्तम सरासरी गाठल्याचा तो  परिणाम होता. पण, पीकपद्धतीनुसार होणारे अतिउत्पादन किंवा नापिकी या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांचा तोटा करून जातात. सरकारलादेखील शेतमालाच्या उत्पादनाचा अंदाज येत नाही. आयात-निर्यातीचे वेडेवाकडे निर्णय घेऊन बाजारपेठेत विनाकारण हस्तक्षेप केला जातो, परिणाम शेतमालाचे दर कमी होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. हवामान बदलाने हे सर्व घडते आहे. याबद्दल आता संदिग्धता नाही. आसाम गेले तीन-चार आठवडे महापुरात डुबतो आहे आणि राजस्थान अचानक झालेल्या जोरदार पावसाने सावरतो आहे. याचा अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस