शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 07:06 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध निमित्ताने होणारी भाषणे आणि महाराष्ट्राची वाटचाल याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही, ते अंतर अधिकच वाढत चालले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध निमित्ताने होणारी भाषणे आणि महाराष्ट्राची वाटचाल याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही, ते अंतर अधिकच वाढत चालले आहे. राज ठाकरे यांचा विचार, आचार आणि कृतीत कोणतेही सातत्य नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण’ या पक्षाची संकल्पनाच स्पष्टपणे मांडता आलेली नाही. त्यानुसार कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही. प्रभावी भाषणाने अनेक जुनेच मुद्दे नव्या आवेशात जनतेसमोर मांडण्याचे कौशल्य राज ठाकरे यांच्याकडे आहे. एवढीच त्यांची जमेची बाजू! पण तो काही राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही. महाराष्ट्रात नवे काय निर्माण करायचे आहे आणि त्याचा कृती आराखडा काय असू शकतो, याची स्पष्टता नाही. हिंदुत्वासारखे मुद्दे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेले आहेत.

भारतातील बहुसंख्याकांनी अद्यापही हिंदुत्व किंवा हिंदुराष्ट्राला बहुमत दिलेले नाही. महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावर घ्यायच्या भूमिकेवर स्पष्ट धोरण नसल्याने त्यांना राजमार्गच सापडत नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देश पातळीवर उदयास आले तेव्हा राज ठाकरे त्यांचे समर्थक होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मते द्या, असे न सांगता त्यांनी भाजपविरोधात दहा मोठ्या सभा घेतल्या. त्यात नरेंद्र मोदी यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांचे व्हिडिओ आणि सत्तेवर आल्यावर घेतलेल्या भूमिका याची मांडणी केली; पण कोणाला मते द्या, हे सांगितले नाही. राज ठाकरे यांना राजमार्गच सापडलेला नाही, हाच त्याचा अर्थ होता. त्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात जाहीर सभा घेऊनही या युतीने दणदणीत विजय मिळवीत ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या.

राज ठाकरे यांच्या सभा गाजल्या; पण मतदारांनी त्यांची नोंद न घेता मतदान केले. आजही त्यांच्या सभा ऐकायला लोक जमतात; पण मते देत नाहीत हे अनेक निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यावर शिवसेनेला टार्गेट केले. नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. नंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केले आणि आता शरद पवार यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला भक्कम कार्यक्रम नसेल तर तो पक्ष वाढत नाही. कारण त्यांच्या नवनिर्माणच्या संकल्पनेत काही नवे नाही. त्यावर ते काही बोलत नाहीत. मशिदीवरील भोंगे काढून टाका, ते बंद करा, हा राजकीय कार्यक्रम होत नाही. तो एक भावनिक आणि धार्मिक श्रद्धांना गोंजारणारा विषय होऊ शकतो. तो माणसांच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार नाही.

मंदिरावरही अनेक ठिकाणी दररोज भोंगे वाजत असतात. धर्माचे आचरण घरात असावे ही भूमिका योग्य आहे. मात्र, ती सर्वच धर्मांना लागू होते. हिंदू-मुस्लिम वादाचे राजकारणही आता मागे पडत चालले आहे. देशातील धार्मिक दंगलींचे कमी झालेले प्रमाण हे त्याचे द्योतक आहे. नव्या अर्थव्यवस्थेत दंगा-धोपा, बंद, रास्ता रोकाे अशा मार्गांना आता जागा राहिलेली नाही. हा विषय वगळता मनसेकडे राजकीय कार्यक्रमच नाही. डाव्या पक्षांनी वैचारिक मांडणीची फेररचना न केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेला मर्यादा आल्या. त्यापेक्षा वाईट अवस्था मनसेची आहे. सध्याच्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगळता कोणत्याही राजकीय पक्षाला जागा नाही. किंबहुना लोकांनाच या चार राजकीय पक्षांव्यतिरिक्त नव्या शक्तीची गरज उरलेली नाही. राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत सातत्य ठेवून राजकीय कार्यक्रम मनसेच्या कार्यकर्त्यांना द्यायला हवा. शरद पवार म्हणतात तसे दोन-चार महिन्यांत एकदा घराबाहेर पडून इव्हेंट आयोजित करावा, तशी जाहीर सभा आयोजित करून राजकारण होत नाही.

पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालावा लागतो. वयाची ऐंशी वर्षे झाल्यावरही शरद पवार जेवढे किलोमीटर दरमहा फिरतात, तेवढी पावलेही राज ठाकरे टाकत नसतील. अशाने पक्ष वाढत नाही. मनसे, डावे, समाजवादी किंवा इतर राजकीय पक्षांना आता महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान नाही. हीच खरी खंत राज ठाकरे यांच्या मनातील खदखद असावी. लोक एक आक्रमक शैलीतील भाषण ऐकायला आवडत असल्याने जमत असावेत. शरद पवार यांनी त्यांच्या टीकेवर चोवीस तासांच्या आत मुद्देसूद उत्तर देऊन राज ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात नोंद घेण्याजोगी नसल्याचे दाखवून दिले. आता भाजपचे बोट धरून टिकून राहावे एवढाच  ‘राज’ मार्ग उरला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSharad Pawarशरद पवार