शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

अग्रलेख : सगळ्यांच्याच झाकल्या मुठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 10:36 IST

सारे काही ठरल्यासारखे सोमवारी सकाळी नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे उमेदवार मुरजी पटेल माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ....

कार्यकर्ता-अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेताना विचारलेला, ‘आम्हा मतदारांना काही किंमत आहे की नाही’, हा प्रश्न पुन्हा विचारण्याचे निमित्त आहे, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे. हा प्रश्न आता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विचारत आहेत. रविवारी सकाळपर्यंत या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत घनघोर लढाईचे चित्र होते. अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिवंगत रमेश लटके यांनी मतदारसंघात केलेले काम आठवले. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्याप्रति सहानुभूती दाटून आली.

त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, अशा विनंतीचे पत्र लिहिले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, शालीन राजकारणाची आठवण करून दिली. एकमेकांशी हाडवैर घेतलेल्या शिंदे गटातील प्रताप सरनाईक यांनाही रात्री उशिरा रमेश लटके यांची दोस्ती आठवली. भाजपला माघार घेण्याची विनंती करा, अशी विनंती त्यांनी मु्ख्यमंत्री शिंदे यांना केली. सारे काही ठरल्यासारखे सोमवारी सकाळी नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे उमेदवार मुरजी पटेल माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असला तरी लढतीत आणखी काही उमेदवारही आहेत. त्यांनी माघार घेतली नाही तर ३ नोव्हेंबरला या जागेसाठी मतदान होईलच.

तेव्हा भलेही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होणार नसली तरी भाजपच्या माघारीमुळे आता केवळ सोपस्कार बाकी राहिला आहे. बृहन्मुंबई महापालिकेआधीची लिटमस टेस्ट, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील पहिली खडाजंगी वगैरे गोष्टी मागे पडल्या आहेत. हे इतके सगळे अवघ्या चोवीस तासांत कसे काय बदलले, ही स्क्रीप्ट कोणी लिहिली, यामागची शक्ती कोण, असे भाबडे प्रश्न मतदारांनी विचारायचे नसतात. हे विचारायचे नाही, की सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना असा सुसंस्कृतपणाचा व नैतिकतेचा उमाळा याआधी गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये झालेल्या पंढरपूर, देगलूर व कोल्हापूर दक्षिण या इतर पोटनिवडणुकींमध्ये का आला नव्हता? त्यापुढे हेदेखील विचारायचे नाही, की खुद्द ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील सेवेचा राजीनामा लटकला, त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयात धाव का घ्यावी लागली, तिथे महापालिकेच्या वतीने आदल्या दिवशी झालेल्या त्यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे कारण का सांगण्यात आले आणि महत्त्वाचे हे की इतके सारे होत असताना आता शालीन, सुसंस्कृत व नैतिक राजकारणावर बोलणारे नेते त्यावेळी गप्प का राहिले?

थोडक्यात, कार्यकर्ते जरी पक्षीय अभिनिवेश अंगात आल्यामुळे एकमेकांच्या जिवावर उठत असले तरी वरच्या पातळीवर सगळे काही मोठे नेते एकमेकांच्या सोयीने ठरवतात की काय, अशी शंका यावी. अन्यथा, देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाकडून आपल्या विनंतीचा मान राखला जाईल याची खात्री असल्याशिवाय राज ठाकरे यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी त्या विनंतीचे पत्र सार्वजनिक करणार नाहीच. असो. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची ही साठा उत्तराची कहाणी भाजप उमेदवाराच्या माघारीमुळे पाचा उत्तरी सुफळ व संपन्न झाली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षांना पुढच्या प्रचारासाठी काही ना काही मुद्दा मिळाला आहे. भाजपने पोटनिवडणुकीत माघार घेतली म्हणून शिवसेनेशी संघर्ष थांबला असे नाही.

उलट हा संदेश आहे, की ‘अशा किरकोळ लढतीसाठी कशाला सगळी ताकद लावायची? बीएमसीच्या निवडणुकीत भेटूच!’ महापालिकेची ही निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढविणार हे नक्की आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाचा महापालिका निवडणुकीवर नक्कीच परिणाम झाला असता. तेव्हा, झाकली मूठ सव्वालाखाची असा विचार करण्यात आला असावा. राजकारण हा केवळ आणि केवळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. ही अनिश्चितता अलीकडे क्रूरदेखील बनली आहे. त्यामुळे झाकली मूठ केवळ भाजपचीच आहे असे नाही. उद्धव ठाकरे यांचीही पोटनिवडणुकीची दगदग वाचली आणि प्रत्यक्ष लढतीत नसलेल्या बाकीच्या पक्षांनाही प्रोपगंडा करण्यासारखे बरेच आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूकAndheriअंधेरी