शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

परदेशी विद्यापीठांच्या अटींवर नव्हे, आपल्या अटींवर असावे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 10:35 IST

कधीकाळी तक्षशिला, नालंदा विद्यापीठांमध्ये जपान, कोरिया, इंडोनेशिया, टर्की यासह जगभरातून विद्यार्थी येत होते. आजची स्थिती उलट्या दिशेने आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जगभरातील नामांकित विद्यापीठांचे आकर्षण आहे.

हार्वर्ड, केम्ब्रिज, ऑक्सफर्डसह जगातील शंभर नामवंत परदेशी विद्यापीठांचे शिक्षण भारतात उपलब्ध होणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र ते शिक्षण परदेशी विद्यापीठांच्या अटींवर नव्हे तर आपल्या अटींवर असेल याकडे शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा भारतीय इतिहास गौरवशाली आहे. कधीकाळी तक्षशिला, नालंदा विद्यापीठांमध्ये जपान, कोरिया, इंडोनेशिया, टर्की यासह जगभरातून विद्यार्थी येत होते. आजची स्थिती उलट्या दिशेने आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जगभरातील नामांकित विद्यापीठांचे आकर्षण आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रारंभिक मसुद्यातील माहितीनुसार जगभरातून ५० लाख विद्यार्थी आपापला देश सोडून अन्य देशांत शिक्षणासाठी जातात. त्यात भारतात जेमतेम एक टक्का विद्यार्थी परदेशातून येतात. तर भारतातून जवळपास ७ ते ८ लाख विद्यार्थी परदेशी विद्यापीठांत प्रवेश मिळवितात. त्या विद्यापीठांतील शैक्षणिक दर्जा, संशोधन कार्य आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी न परवडणारा खर्च करून रांगा लावतात.नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर दिला आहे. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच जगभरातून विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी भारतात यावे, अशी भूमिका नव्या धोरणात आहे. सद्य स्थितीत परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या यादीत भारताचा २६ वा क्रमांक लागतो.  एकीकडे अमेरिका, युरोपमध्ये शिक्षणाचा खर्च मोठा आहे. तेथे जाऊन शिक्षण घेणे परवडणारे नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना नामवंत विद्यापीठांतील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. मात्र हे प्रयत्न मर्यादित आहेत. अशावेळी परदेशी विद्यापीठेच भारतात येऊन शिक्षण उपलब्ध करीत असतील तर त्याचा मोठा लाभ होईल, यात शंका नाही. ही चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे, त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले पाहिजे.परदेशी विद्यापीठांमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल, परंतु शिक्षणाचे बाजारीकरण होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. फायदा आणि तोटा असे व्यावसायिक गणित मांडले जाणार नाही, यासाठी नियमावली करण्याची गरज आहे. परदेशी विद्यापीठांना अभ्यासक्रमांची मुभा देताना केवळ परदेशात चाकरी करणारे कुशल मनुष्यबळ तयार होईल असा संकुचित दृष्टिकोन पुढे येऊ नये. भारतीय संस्था आणि परदेशी विद्यापीठे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून संशोधन आणि नावीन्यपूर्ण शिक्षणाला बळकटी मिळाली पाहिजे. शुल्क रचनेवर नियंत्रण असले पाहिजे. आर्थिक स्थिती कमकुवत आहे म्हणून कोणताही गुणवान विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे धोरण आखून अमलात आणले पाहिजे.आजही जगभरातील अनेक विद्यापीठे ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जोडलेले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर आंतरराष्ट्रीय सीमा आता खुल्या होत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग भरत आहेत. त्यात भारतीय विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि पैसा परदेशात जाणार नाही, यासाठी परदेशी विद्यापीठांची दारात उपलब्धता, भारतीय विद्यापीठांचा दर्जा सुधार हा पर्याय आहे. जग हे विशाल खेडे बनले आहे, हे सूत्र सर्वच क्षेत्रात आहे. ज्यामुळे शिक्षणात जगभरातील संस्था, विद्यापीठांचा शिरकाव रोखता येणार नाही. म्हणून त्याचे अगदीच मुक्तपणे स्वागत न करता नव्या शिक्षण धोरणात नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या शिक्षणासाठी एक  घटनात्मक संस्था स्थापित करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष विद्यापीठे दारात पोहोचायला अवकाश असेल, तर तातडीने परदेशी विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठे अथवा संस्थांमध्ये सामंजस्य करार करून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येतील.शालेय, उच्च शिक्षणात नवतंत्रज्ञानाचा उपयोग करून देश आणि जगातील नामवंत शिक्षकांना ग्रामीण भागाशी जोडणे शक्य आहे. इंटरनेट व अनुषंगिक सुविधांसाठी अधिक तरतूद करण्याची गरज आहे. दरडोई उत्पन्नाच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर व्हावा, हा कागदावरील विचार प्रत्यक्षात आणला पाहिजे. अजूनही अनेक राज्ये दीड-दोन टक्क्यांवर खर्च करीत नाहीत आणि केंद्रही संशोधनावर अत्यल्प खर्च करते. एकाचवेळी परदेशी विद्यापीठांचे नियमांना अधीन राहून स्वागत, भारतीय विद्यापीठांचे सक्षमीकरण, शिक्षणासाठी अधिकची तरतूद असे मार्ग अवलंबिले तरच आपण प्रगतिशील देशांच्या यादीत असू.

टॅग्स :Educationशिक्षण