शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

अग्रलेख : पिक्चर अभी बाकी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 10:34 IST

आंतरराष्ट्रीय अर्थकारणात असलेल्या अस्थिरतेचे पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेत उमटले नसते तरच नवल होते.

आंतरराष्ट्रीय अर्थकारणात असलेल्या अस्थिरतेचे पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेत उमटले नसते तरच नवल होते. त्यामुळे मे महिन्यापासून चलनवाढ नावाच्या समस्येने डोके पुन्हा वर काढले. आजवर केलेल्या कठोर उपायांमुळे चलनवाढ आटोक्यात येईल, असा भारतीय रिझर्व्ह बँकेला विश्वास होता. मात्र, तसे झालेच नाही. आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील अस्थिरता अधिक वाढल्यामुळे भारतातही रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेनुसार चलनवाढ नियंत्रणात राहिली नाही. परिणामी, शुक्रवारी सादर झालेल्या पतधोरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेला रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ करण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दर १.९० टक्क्यांनी वाढला आहे. ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना कर्ज देते त्या दराला रेपो दर असे म्हणतात. हा रेपो दर वाढला की बँकादेखील आपल्या विविध कजांवरील व्याजदरात वाढ करतात. परिणामी, सामान्य माणूस अथवा व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढतात आणि याची परिणती अधिक मासिक हप्ता म्हणजे खिशाला अधिक झळ! 

मे महिन्यांत सर्वप्रथम ०.४० टक्क्यांनी रेपो दरात वाढ झाली. त्यानंतर जून आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी अर्धा टक्क्यांची दरवाढ झाली. त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत पुन्हा एकदा अर्धा टक्क्यांनी दरवाढ करण्यावर तज्ज्ञ समितीचे पाच विरुद्ध एक अशा मतविभागणीने शिक्कामोर्तब झाले. व्याजदर वाढतात तेव्हा नव्याने कर्ज घेणाऱ्या लोकांना वाढीव दराने कर्ज घ्यावे लागते तर ज्यांचे सध्या कर्ज सुरू आहे, त्या लोकांनादेखील ही दरवाढ सोसावी लागते. एकतर चालू मासिक हप्त्यामध्ये वाढ होते किंवा वाढीव हप्त्याची रक्कम कर्जाचा कालावधी वाढवून समायोजित केली जाते. यावेळच्या दरवाढीला समांतर अर्थसंकटाची आणखी एक किनार आहे. ती म्हणजे, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे सहस्रचंद्रदर्शन झाले. भारताकडून होणारा आयातीचा ९५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हा अमेरिकी डॉलरमध्ये होतो. त्यामुळे आयातीचा खर्च वाढणार आहे. इंधनापासून ते अनेक दैनंदिन गोष्टी आपल्याकडे आयात होतात. आयात खर्चात वाढ झाली, की आपोआप देशांतर्गत बाजारातल्या त्या वस्तूंच्या किमती वाढतात. 

साध्या खनिज तेलाच्याच किमती वाढल्या की त्याचे पडसाद जवळपास सर्वच दैनंदिन वस्तूंवरील किंमत वाढीच्या रूपाने आपल्याला दिसतात. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे अर्थचक्र रुतले. गेल्या नोव्हेंबरपासून अर्थव्यवस्था सावरतेय असे वाटायला लागले असतानाच चलनवाढीने डोके वर काढले आणि ती नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढ झाली. दुसरीकडे आयात खर्चात वाढ झाल्यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत खाद्यान्नाच्या किमतीमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली. अशा स्थितीत महिन्याच्या खर्चाचा ताळेबंद कसा जमवायचा आणि भविष्यासाठी बचत कशी करायची हा एक यक्षप्रश्न सामान्यांसाठी निर्माण झाला आहे. हे सारे नजिकच्या भविष्यात आटोक्यात येणार नाही. 

आगामी काळात गुजरातसह महत्त्वाच्या राज्यांत निवडणुका आहेत. कल्याणकारी राज्याच्या नावाखाली रेवडी वाटली जाईल पण आर्थिक अनिष्ट अपरिहार्य आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आहे. आजची घोषणा अजून पुरेशा लोकांपर्यंत पोहोचलीही नाही पण तेवढ्यातच डिसेंबरमध्ये देखील अर्धा टक्का दरवाढ अपेक्षित असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करायचे आपले स्वप्न आहे, ते ठीकच पण अर्थतज्ज्ञांच्या मते सध्या असलेली चलनवाढीची समस्या आणि अमेरिकी रुपयाच्या तुलनेत घसरणारा भारतीय रुपया हा प्रकार आणखी किमान वर्षभर तरी सुरू राहील. जागतिक अर्थकारणातील अस्थिरतादेखील वर्षभर आणखी तीव्र होताना दिसेल. त्याचे तीव्र पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवर उमटताना दिसतील. वर्षभराच्या या घुसळणीचा फटका किंवा बसणारे झटके यातून स्थिरावण्यासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागेल, दैनंदिन जगण्याला बसणारा फटका आणि सामान्यांना भविष्यासाठी कराव्या लागणारी बचत ही तारेवरची कसरत न राहता दोऱ्यावर चालण्याच्या स्पर्धेची कसरत ठरणार आहे. तेव्हा, सध्या होत असलेली आर्थिक घुसळण हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है!

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकEconomyअर्थव्यवस्था