शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

दिल्लीने लाज घालवली! 'भाजप-आप'ने महापालिकेचा आखाडा बनविणे देशासाठी लज्जास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 11:05 IST

भारतीय लोकशाहीबद्दल नेहमी एक गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते की, ही जगातली अशी एकमेव व्यवस्था आहे की, जिथे साधा सरपंचही निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शांतपणे पदावरून दूर होतो.

तासन्तास दिवसा - रात्री विरोधी बाकांवर पाण्याच्या बाटल्या मारून, मतपत्रिकांच्या जाडजूड पेट्या फेकून, घसा कोरडा होईपर्यंत ओरडून, हाता- पायाचा वापर करून थकले भागलेले एकत्रित दिल्ली महापालिकेचे नगरसेवक अखेर बाकड्यांवर झोपी गेल्याचे विलोभनीय दृश्य अख्ख्या देशाने पाहिले. अनेकांना ते पाहून या कष्टाळू नगरसेवकांचे किती कौतुक करावे आणि किती नको, असे झाले असावे. इतके काबाडकष्ट कशासाठी तर महापालिकेत आपली सत्ता असावी, अब्जावधीचे बजेट आपल्या हाती असावे म्हणून. गेले तीन दिवस देशाच्या राजधानीत, महापौर-उपमहापौर व स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अक्षरश: दंगल सुरू आहे.

नामनिर्देशित सदस्यांना मतदानाच्या अधिकारापासून सुरू झालेला वाद नंतर मतदान करताना मोबाइल जवळ ठेवण्यापर्यंत पोहोचला आणि बाचाबाची, गुद्दागुद्दी, हाणामारी, पुरुषांनी एकमेकाच्या गचांडी आणि महिलांनी एकमेकींच्या झिंज्या धरणे सुरू राहिले. या गदारोळातच महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान झाले आणि आम आदमी पक्षाच्या शेली ओबेरॉय व मोहम्मद इक्बाल विजयी झाले. स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होताना पुन्हा गदारोळाची पुनरावृत्ती झाली. भारतीय लोकशाहीबद्दल नेहमी एक गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते की, ही जगातली अशी एकमेव व्यवस्था आहे की, जिथे साधा सरपंचही निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शांतपणे पदावरून दूर होतो. दिल्ली महापालिकेतील दबंगाई पाहिली तर मात्र खरेच कसलाही त्रागा न करता कोणी पदावरून दूर होते का, असा प्रश्न पडावा. कारण, आधीच्या तीन महापालिकांचे एकत्रिकरण करून तब्बल अडीचशे सदस्यांची एकच मोठी महापालिका स्थापन करण्याआधी तिन्ही महापालिकांवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ती कायम राहावी हादेखील एकत्रिकरणामागे हेतू असावा, असे मानले जाते.

तथापि, गेल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपला धक्का दिला आणि १३४ जागांसह मोठा विजय मिळविला. साहजिकच हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. आता ज्या त्वेषाने भाजपचे नगरसेवक व अन्य नेते आपच्या सदस्यांवर चालून जात आहेत ते पाहिले की पराभवाची जखम किती खोल पोहोचलीय ते लक्षात यावे. दिल्ली व अन्य काही महापालिकांमध्ये त्या शहरांमधील खासदार व काही आमदार पदसिद्ध सदस्य असतात. मतदारांनी नाकारले तरी हे खासदार, आमदार आणि उपराज्यपालांकडून नामनिर्देशित केलेल्या सदस्यांच्या बळावर महापौर व अन्य पदे काबीज करण्याचे डावपेच भाजपने आखले. आम आदमी पक्षाने त्याला विरोध केला. त्यामुळे जवळपास तीन महिने महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. नामनिर्देशित सदस्यांना मतदान करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतरही साम, दाम, दंड, भेद वापरून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न भाजपने सोडला नाही.

आपला इतका मोठा, जगातला प्रथम क्रमांकाचा पक्ष आणि काल-परवा स्थापन झालेला आम आदमी पक्ष आपल्या डोळ्याला डोळा भिडवतो, ही कल्पनाच भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना सहन होत नसावी. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तीस-पस्तीस मतांच्या फरकाने पराभव झाल्यानंतरही स्थायीच्या मतदानापूर्वी पवन शेरावत नावाच्या आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाला फोडून आपल्या तंबूत आणले गेले. सत्ता गेल्यानंतर नेते व पक्ष कसे कासावीस होतात आणि विरोधी पक्ष फोडून येनकेन प्रकारेण सत्ता बळकावण्यासाठी कशा खटपटी लटपटी करतात याचे जे दर्शन देशात इतर ठिकाणी घडले, त्याचा दिल्ली महापालिका हा कळसाध्याय ठरावा. त्यातच दिल्ली देशाची राजधानी आहे. इतर राष्ट्रांच्या वकिलाती इथे रोजच्या घटना पाहतात, नोंदी ठेवतात, मायदेशी अहवाल पाठवतात. अशा शहरातील राजकारण, सत्ताकारण किमान सौजन्याचे व सभ्यतेचे असावे, अशी अपेक्षा असते. अशावेळी भाजप व आपने महापालिकेचा आखाडा बनविणे देशासाठी लज्जास्पद आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, भाजप असो की आप या दोन्ही पक्षांची 'राष्ट्र प्रथम' वगैरे आणाभाका घेणारी मंडळी दिल्लीत व देशात सत्तेवर आहेत आणि त्यांच्या डोळ्यादेखत राजधानीच्या महापालिका सभागृहात देशाच्या राजकारणाची अब्रू वेशीवर टांगली जात आहे. दंगेखोर नगरसेवकांना रोखावे, असे कणालाच वाटत नाही.

टॅग्स :BJPभाजपाAAPआप