शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:27 IST

योजनेचे लाभार्थी साधारण १ कोटी ६० लाख. प्रत्येक वेळी या वाटपासाठी सरकारला साडेपाचशे कोटींच्या आसपास खर्च येतो. यात काही वेळेस सरकारने मैदा व पोहे देखील दिले होते.

घोषणांचा पाऊस पाडल्याने आता त्या अमलात आणायला पैसा नाही, असं सांगण्यासाठी सरकारकडे हिंमत लागते. हा खरेपणा एकट्या अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दाखवला. सरकारला आपले बहुतांश बजेट ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवावे लागत असल्याने राज्यात यंदा दिवाळीला ‘आनंदाचा शिधा’ देता येणार नाही, हे त्यांनी सांगून टाकले. दिवाळीला चटणी-भाकरी गोड माना, हेच जणू त्यांनी प्रांजळपणे गरिबांना सांगितले. ऑक्टोबर-२०२२ मध्ये सरकारने ही योजना आणली. राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी ही योजना आहे. यात सणावाराला प्रत्येक लाभार्थ्याला एक किलो रवा, चणा डाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल, अशा जिन्नसांचा संच अवघ्या शंभर रुपयांत देण्याची तरतूद आहे.

योजनेचे लाभार्थी साधारण १ कोटी ६० लाख. प्रत्येक वेळी या वाटपासाठी सरकारला साडेपाचशे कोटींच्या आसपास खर्च येतो. यात काही वेळेस सरकारने मैदा व पोहे देखील दिले. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या वेळीही सरकारने खास शासन आदेश काढून हा शिधा घरोघरी पोहोचविला अन् ‘जय श्रीराम’ म्हटले. गत दिवाळीलाही शिधा दिला. पण निवडणुका संपताच अनेक योजनांच्या वाट्याला ‘वनवास’ आला. त्यात हे सरकारी पोहे आणि मैद्यावरही वरवंटा आला, हे भुजबळांच्या विधानातून जनतेला समजले. विरोधकांनी यावरून ‘निवडणुका सरो-मतदार मरो’, असा टोला सरकारला हाणला. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनाही अशी निवडणुकीआधी आली. तिचीही ‘आबाळ’ सुरू आहे. शिवभोजन थाळीचेही पैसे थकतात. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यातून शेती, पिकांचे नुकसान झाले. त्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ, असे सरकारने सांगितले आहे. पण या राज्यात मोठा वर्ग असा आहे जो भूमिहीन आहे. त्यांचे पोट हातावर आहे. त्यांना राहायला साधे घरही नाही. त्यांचेही संसार पुरात वाहिले. पुरामुळे अनेकांचा रोजगारही बुडाला. शेतात पाणी असल्याने व पिकेच गेल्याने खेडोपाडी मजुरांसाठी कुठला आला रोजगार? ग्रामीण भागात ठेकेदारीची कामेदेखील सध्या थंड आहेत. कारण, ठेकेदार म्हणतात, ‘आमचीच बिले मिळायला तयार नाहीत’, म्हणजे तेथेही मजुरांना रोजगार नाही. अशा वेळी हा शंभर रुपयांचा शिधाही सणवार गोड करण्यासाठी दिलासा होता.

सामाजिक कार्यकर्ते गरिबीची एक व्याख्या करतात. ते म्हणतात, ‘गरिबी म्हणजे केवळ पैसे व अन्न कमी मिळणे नव्हेेे; तर गरिबी म्हणजे तुम्हाला कुणीतरी गृहीत धरणे, तुमची क्षमता संपविणे, तुमची प्रतिष्ठाच संपविणे!’ आज लोक पैशांनी गरीब तर आहेतच, पण त्यांची आपल्या हक्कांसाठी व अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमताच मारली गेली आहे. म्हणूनच, आनंदाचा शिधा का सुरू केला व तो का बंद केला? याबाबत सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात उरलेली नाही. विरोधक बेदखल आहेत, तर सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदुत्वाचा जप करण्यात दंग. अहिल्यानगरच्या भुजबळांच्याच पक्षाच्या आमदाराने दिवाळीला हिंदूंनी हिंदू दुकानांतच खरेदी करावी, असा फतवा काढला. सरकारने तमाम हिंदूंसह सर्व गरिबांचा आनंदाचा शिधा का बंद केला? हे विचारण्याची हिंमत मात्र या आमदार महाशयांमध्ये नाही.

दिवाळीच्या खरेदीसाठी गरिबांच्या खिशात पैसे आहेत का? दोन महिन्यांपासून रोजगार हमीच्या मजुरांचेही वेतन मिळालेले नाही, हे का? - हे प्रश्न त्यांना पडत नाहीत. रेशनवरचा शिधा गायब होत आहे आणि ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ ताटात वाढला जात आहे. महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न आहे; पण आपण अद्याप दारिद्र्य निर्मूलन करू शकलेलो नाही. सन २०११-१२ साली दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण देशात २५.७ टक्के होते. ते २०२३-२४ साली ४.८६ टक्क्यांवर आल्याचा दावा काही अहवालांच्या आधारे केला जातो. पण दारिद्र्य संपत चालले असेल तर लाभार्थी योजनांचा पाऊस का पाडावा लागतो? मतांसाठी पैसे का वाटावे लागतात?

English
हिंदी सारांश
Web Title : No rations, no joy! Bhujbal showed that courage...

Web Summary : Maharashtra cancels Diwali 'Anandacha Shidha' due to budget constraints diverting funds to other schemes. Bhujbal's honesty reveals post-election neglect of welfare programs, sparking opposition criticism amid financial woes for the poor and farmers.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाChagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदे