शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकचा नवा अध्याय? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना खास पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 07:07 IST

दाेन्ही देशांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वापरावर चर्चा करण्यास सुरू झाली आहे. तत्पूर्वीही भारत-पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवर हाेणाऱ्या चकमकींना विराम देण्याचा निर्णय घेतला हाेता. तेव्हाच आश्चर्य व्यक्त केले जात हाेते

भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांच्या नेतृत्वाने गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिका आणि घेतलेले निर्णय हा नवा अध्याय असू शकेल का? अशी चर्चा आशिया राष्ट्रांमधील संबंधावर विचारमंथन करणाऱ्या विचारवंतांच्यामध्ये चालू झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेली फाळणी आणि काश्मीर प्रश्नांवरून शेजारील दाेन्ही देशांमध्ये झालेल्या तीन युद्धांची पार्श्वभूमी पाहता या घडामाेडीवर तातडीने विश्वास बसत नाही, असे अनेकांना वाटते आहे. पाकिस्तानने परवा (मंगळवार, २३ मार्च राेजी) राष्ट्रीय दिन साजरा केला.

लाहाेर येथे २३ मार्च १९४० राेजी मुस्लीम लीगच्या पुढाकाराने घेतलेल्या अधिवेशनात सर्वप्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतरच स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे आली आणि स्वातंत्र्याच्या पहाटे देशाची फाळणी झाली. ताे दिवस पाकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळण्यात येताे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या हाेत्या. त्याचवेळी गेली दाेन वर्षे न झालेली भारत-पाकदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वाटपासाठी १९६० मध्ये स्थापन केलेल्या इंडस पाणी आयाेगाची बैठक सुरू झाली. दाेन्ही देशांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वापरावर चर्चा करण्यास सुरू झाली आहे. तत्पूर्वीही भारत-पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवर हाेणाऱ्या चकमकींना विराम देण्याचा निर्णय घेतला हाेता. तेव्हाच आश्चर्य व्यक्त केले जात हाेते. तसेच पंतप्रधान इम्रान खान यांनी उभय देशांमधील संबंध सुधारण्यावरही वक्तव्य करून या चकमकीच्या विरामाचे स्वागत केले हाेते.

पाकिस्तानात लाेकनियुक्त सरकार सत्तेवर असले तरी लष्कर आणि लष्करप्रमुखाची भूमिका काय राहते, याला महत्त्व असते. कारण आजवर लाेकनियुक्त सात पंतप्रधानांपैकी सर्वांनाच पदच्युत व्हावे लागले आहे किंवा त्यांची हत्या झाली आहे. हा पाकिस्तानमधील लाेकशाहीचा काळा इतिहास आहे. मात्र, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी इस्लामाबादेत एका परिसंवादात बाेलताना भारत-पाकिस्तानने भूतकाळातील घटना विसरून पुढे गेले पाहिजे, काश्मीर प्रश्नासह सीमेवर शांतता नांदेल याचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका मांडली, तेव्हाही सर्वांना थाेडे आश्चर्य वाटले हाेते. गेल्या दाेन महिन्यांतील या घटनांनी उभय राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी पाेषक वातावरण निर्मिती झाली आहे, हे तरी मान्य केले पाहिजे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काेविडबाधित झाल्याचे समजताच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करीत पंतप्रधान माेदी यांनी खास पत्र पाठवून राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सीमेवरील चकमकीस विराम, उभय देशांच्या पंतप्रधानांची जाहीर भूमिका आणि लष्करप्रमुखांचे वक्तव्य पाहता पाकिस्तानची भारताबराेबरच्या संबंधात सुधारणा करण्याची तयारी दिसते. त्याची दाेन प्रमुख कारणे दिसतात. ती म्हणजे अमेरिकेतील सत्तांतर आणि काेराेना महामारीने अर्थव्यवस्थेला बसलेला फटकाही आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जाे बायडेन निवडून आल्यानंतरच्या या घडामाेडी आहेत, हे नाकारता येणार नाही. पंतप्रधान माेदी यांनी डाेनाल्ड ट्रम्प यांची बाजू उचलून धरली असली तरी बायडेन यांच्या सरकारची भूमिका भारताला मदत करणारीच राहणार आहे, हे आता पाकिस्तानने ओळखले आहे. यात अमेरिकेच्या हितसंबंधांचा भाग असला तरी पाकिस्तानचे चीनच्या बाजूने झुकलेले अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीमध्ये बसत नाही, हे उघड सत्य आहे. चीनचे आर्थिक धाेरण पूर्णता व्यावसायिक आहे. याउलट अमेरिकेने पाकिस्तानची अफगाण युद्धात मदत घेताना भरभरून आर्थिक हातभार पाकिस्तानला लावला हाेता. चीनच्या उद्देशात हा विषयच येत नाही.

दक्षिण आशियातील सत्तासमताेलात आणि आर्थिक हितसंबंधात अमेरिकेचा कल भारताच्या बाजूने दिसताच पाकिस्तानच्या भूमिकेत हा झालेला बदल दिसताे. इंडस पाणी आयाेगाची दाेन वर्षे न झालेली बैठकही त्याचाच भाग आहे. अन्यथा चेनाब नदीच्या खाेऱ्यातील मरूसुदर या उपनदीवरील एक हजार मेगावॉटचा प्रकल्प पाकिस्तानला न विचारता बांधण्याचा निर्णयही माेदी सरकारने घेतला आहे. ताे या बैठकीत मान्य करण्यात येईलच. विशेषत: काश्मीरसाठी खास असलेले ३७०वे कलम रद्द करून ताे भाग केंद्रशासित केल्यानंतरच्या या घडामाेडी महत्त्वाच्या आहेत. यानिमित्त मांडलेल्या भूमिका आणि विविध पातळीवर हाेणाऱ्या चर्चेतून उभय राष्ट्रांतील तणाव निवळत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. नरेंद्र माेदी यांनीही दिलेला प्रतिसाद खूप सकारात्मक आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी