शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

न्यायव्यवस्था ही धर्मपरत्वे विचार करणारी आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 03:47 IST

कायदा साऱ्यांसाठी समान असल्याचे सांगितले जात असताना सामूहिक गुन्हेगारीत अडकलेले बहुसंख्य उजवे आरोपी अतिशय गंभीर गुन्ह्यांतून सन्मानपूर्वक निर्दोष का सुटतात, हा देशातील कायदेपंडितांएवढाच सामान्यांनाही गोंधळात टाकणारा प्रश्न आहे.

कायद्यासमोर सारे समान असल्याचे घटना सांगत असताना देशात आजवर झालेल्या सामूहिक गुन्हेगारीत अडकलेले बहुसंख्य उजवे आरोपी त्यांच्यावर अतिशय गंभीर गुन्हे असतानाही सन्मानपूर्वक निर्दोष का सोडले जातात वा सुटतात, हा देशातील कायदेपंडितांएवढाच सामान्य माणसांनाही गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. पंजाब झाले, दिल्ली झाले, गुजरात झाले आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये झाली. या साऱ्यांत उजव्यांनी सुटावे आणि डाव्यांनी अडकावे अशी काही तरतूद आपल्या घटनेत आहे काय, हा प्रश्न आज पडण्याचे कारण २०१३ मध्ये जगभर गाजलेल्या व ६५ जणांचा बळी घेतलेल्या मुजफ्फरपूरच्या सामूहिक हत्याकांडातील सगळेच्या सगळे म्हणजे १६८ आरोपी नुकतेच निर्दोष सुटले आहेत. या आरोपींवर ६५ जणांची हत्या केल्याचा, २६ स्त्रियांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होता.

हे सारेच्या सारे आरोप कोर्टाने असिद्ध ठरवत त्या १६८ जणांनाही सज्जनकीचे सर्टिफिकेट बहाल करून सन्मानपूर्वक सोडून दिले आहे. हे हत्याकांड घडले तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे सरकार सत्तेवर होते. त्यांच्या काळात हा खटला काही दिवस चालल्यानंतर तो भाजपच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या देखरेखीखाली चालला. या काळात सारे साक्षीदार उलटले. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जबान्या फिरविल्या. बलात्काराच्या आरोपींची वैद्यकीय तपासणी महिनोंमहिने लांबविली गेली. आपल्याला या खटल्यात खरे सांगायची भीती वाटते असे यातले अनेक साक्षीदार या काळात बाहेर बोलतही होते. दिल्लीचे आरोपी बाहेर, गुजरातचे आरोपी सत्तेवर, महाराष्ट्रातले संसदेत आणि आता उत्तर प्रदेशातले तुरुंगाबाहेर. हे सारे आरोपी बहुसंख्याक समाजाचे असून त्यांच्या हातून मारले गेलेले लोक व बलात्कार झालेल्या स्त्रिया अल्पसंख्य समाजातल्या आहेत.

कायदा साऱ्यांसाठी सारखा असताना त्याचा अंमल करणारी पोलिसांची यंत्रणा वा या यंत्रणेने केलेल्या तपासाच्या आधारे (तपासाच्या मागे न जाता) निर्णय देणारी न्यायव्यवस्था ही सारीच अशी नागरिकांचा धर्मपरत्वे विचार करणारी आहे काय, असा अस्वस्थ करणारा प्रश्न अशावेळी साऱ्यांना पडावा. दु:ख याचे की अल्पसंख्याकांना शिक्षा झाल्या की आनंदी होणारे लोक आपल्यात आहेत आणि बहुसंख्याकांविरुद्ध साधे गुन्हे नोंदविले तरी दु:खी होणारी माणसेही आपल्यात आहेत. अल्पसंख्याकांनी देश सोडून बाहेर जावे, ते सारेच्या सारे देशविरोधी आहेत, असे जाहीरपणे म्हणणारी माणसे, पक्ष व संघटना देशात आहेत. मुजफ्फरपूर खटल्याच्या निर्णयानंतर आपली न्यायालये व पोलीस यंत्रणाही असाच विचार करणाऱ्या आहेत की काय, असा प्रश्न मनात येतो. पुरावे नसतील, गुन्हा सिद्ध होत नसेल तर आरोपीने निर्दोष सुटणे यात गैर काही नाही.

मात्र सामूहिक हत्याकांड व बलात्कारात पुरावे गोळा करणे व त्या आरोपातील प्रत्येकाचा हात सिद्ध करणे अनेकदा अवघड होते. मात्र केवळ पोलिसांना अनुभवावी लागणारी यातली अडचण ही गुन्हेगारांसाठी लाभदायक ठरू नये. तसे होण्याने पोलिसांविषयीचा देशाचा विश्वास तर कमी होतोच; शिवाय त्यामुळे लोक न्यायालयांवरही विश्वास ठेवणे कमी करतात. दुर्दैव याचे की अशा गुन्ह्यातील आरोपींना निर्दोष सोडत असताना आपली न्यायालये प्रसंगी हेमंत करकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सच्च्या पोलीस अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवतात. आज देशात ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर आहे त्याच्या मनातच अल्पसंख्याकांविषयी अविश्वास आहे. या सरकारचा गृहमंत्रीच एका राज्यातील लक्षावधी अल्पसंख्याकांना देशाबाहेर घालविण्याची प्रतिज्ञा करून बसलेला आहे. मुजफ्फरपूर झाले तेव्हा पंतप्रधानही काही बोलले नाहीत. गुजरात झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान त्यांची नापसंती व्यक्त करून गेले. मात्र त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या सत्पुरुषाला त्याविषयीची साधी खंतही व्यक्त करावीशी वाटली नाही. आपला देश एकात्म आहे असे अशावेळी खरोखरीच वाटते काय?

टॅग्स :Courtन्यायालयAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी