शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

न्यायव्यवस्था ही धर्मपरत्वे विचार करणारी आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 03:47 IST

कायदा साऱ्यांसाठी समान असल्याचे सांगितले जात असताना सामूहिक गुन्हेगारीत अडकलेले बहुसंख्य उजवे आरोपी अतिशय गंभीर गुन्ह्यांतून सन्मानपूर्वक निर्दोष का सुटतात, हा देशातील कायदेपंडितांएवढाच सामान्यांनाही गोंधळात टाकणारा प्रश्न आहे.

कायद्यासमोर सारे समान असल्याचे घटना सांगत असताना देशात आजवर झालेल्या सामूहिक गुन्हेगारीत अडकलेले बहुसंख्य उजवे आरोपी त्यांच्यावर अतिशय गंभीर गुन्हे असतानाही सन्मानपूर्वक निर्दोष का सोडले जातात वा सुटतात, हा देशातील कायदेपंडितांएवढाच सामान्य माणसांनाही गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. पंजाब झाले, दिल्ली झाले, गुजरात झाले आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये झाली. या साऱ्यांत उजव्यांनी सुटावे आणि डाव्यांनी अडकावे अशी काही तरतूद आपल्या घटनेत आहे काय, हा प्रश्न आज पडण्याचे कारण २०१३ मध्ये जगभर गाजलेल्या व ६५ जणांचा बळी घेतलेल्या मुजफ्फरपूरच्या सामूहिक हत्याकांडातील सगळेच्या सगळे म्हणजे १६८ आरोपी नुकतेच निर्दोष सुटले आहेत. या आरोपींवर ६५ जणांची हत्या केल्याचा, २६ स्त्रियांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होता.

हे सारेच्या सारे आरोप कोर्टाने असिद्ध ठरवत त्या १६८ जणांनाही सज्जनकीचे सर्टिफिकेट बहाल करून सन्मानपूर्वक सोडून दिले आहे. हे हत्याकांड घडले तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे सरकार सत्तेवर होते. त्यांच्या काळात हा खटला काही दिवस चालल्यानंतर तो भाजपच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या देखरेखीखाली चालला. या काळात सारे साक्षीदार उलटले. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जबान्या फिरविल्या. बलात्काराच्या आरोपींची वैद्यकीय तपासणी महिनोंमहिने लांबविली गेली. आपल्याला या खटल्यात खरे सांगायची भीती वाटते असे यातले अनेक साक्षीदार या काळात बाहेर बोलतही होते. दिल्लीचे आरोपी बाहेर, गुजरातचे आरोपी सत्तेवर, महाराष्ट्रातले संसदेत आणि आता उत्तर प्रदेशातले तुरुंगाबाहेर. हे सारे आरोपी बहुसंख्याक समाजाचे असून त्यांच्या हातून मारले गेलेले लोक व बलात्कार झालेल्या स्त्रिया अल्पसंख्य समाजातल्या आहेत.

कायदा साऱ्यांसाठी सारखा असताना त्याचा अंमल करणारी पोलिसांची यंत्रणा वा या यंत्रणेने केलेल्या तपासाच्या आधारे (तपासाच्या मागे न जाता) निर्णय देणारी न्यायव्यवस्था ही सारीच अशी नागरिकांचा धर्मपरत्वे विचार करणारी आहे काय, असा अस्वस्थ करणारा प्रश्न अशावेळी साऱ्यांना पडावा. दु:ख याचे की अल्पसंख्याकांना शिक्षा झाल्या की आनंदी होणारे लोक आपल्यात आहेत आणि बहुसंख्याकांविरुद्ध साधे गुन्हे नोंदविले तरी दु:खी होणारी माणसेही आपल्यात आहेत. अल्पसंख्याकांनी देश सोडून बाहेर जावे, ते सारेच्या सारे देशविरोधी आहेत, असे जाहीरपणे म्हणणारी माणसे, पक्ष व संघटना देशात आहेत. मुजफ्फरपूर खटल्याच्या निर्णयानंतर आपली न्यायालये व पोलीस यंत्रणाही असाच विचार करणाऱ्या आहेत की काय, असा प्रश्न मनात येतो. पुरावे नसतील, गुन्हा सिद्ध होत नसेल तर आरोपीने निर्दोष सुटणे यात गैर काही नाही.

मात्र सामूहिक हत्याकांड व बलात्कारात पुरावे गोळा करणे व त्या आरोपातील प्रत्येकाचा हात सिद्ध करणे अनेकदा अवघड होते. मात्र केवळ पोलिसांना अनुभवावी लागणारी यातली अडचण ही गुन्हेगारांसाठी लाभदायक ठरू नये. तसे होण्याने पोलिसांविषयीचा देशाचा विश्वास तर कमी होतोच; शिवाय त्यामुळे लोक न्यायालयांवरही विश्वास ठेवणे कमी करतात. दुर्दैव याचे की अशा गुन्ह्यातील आरोपींना निर्दोष सोडत असताना आपली न्यायालये प्रसंगी हेमंत करकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सच्च्या पोलीस अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवतात. आज देशात ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर आहे त्याच्या मनातच अल्पसंख्याकांविषयी अविश्वास आहे. या सरकारचा गृहमंत्रीच एका राज्यातील लक्षावधी अल्पसंख्याकांना देशाबाहेर घालविण्याची प्रतिज्ञा करून बसलेला आहे. मुजफ्फरपूर झाले तेव्हा पंतप्रधानही काही बोलले नाहीत. गुजरात झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान त्यांची नापसंती व्यक्त करून गेले. मात्र त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या सत्पुरुषाला त्याविषयीची साधी खंतही व्यक्त करावीशी वाटली नाही. आपला देश एकात्म आहे असे अशावेळी खरोखरीच वाटते काय?

टॅग्स :Courtन्यायालयAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी