शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

हा पोरखेळ थांबवा आणि तरुणांना सहाय्यभूत करेल, असं सामंजस्याचे धोरण स्वीकारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:48 IST

Maratha Reservation, Supreme Court, MPSC Exam News: लाखो तरुण-तरुणी रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. वयोमर्यादेची अट संपली की, पुन्हा संधी मिळत नाही. ज्यांनी चार-पाच वर्षे तयारी केली आहे आणि परीक्षा देण्यास सज्ज झाले होते, त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार करायला हवा.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) होणारी परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. हा तरुण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला पोरखेळ आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाची कोणतीही नोकरभरती करू नये, असे मराठा नेत्यांना वाटते. गृहमंत्री अनिल देखमुख यांनी राज्य पोलीस दलात साडेचार हजार तरुण-तरुणींची भरती करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हादेखील अशी प्रतिक्रिया उमटली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांचे दुमत नाही. उलट एकमुखी पाठिंबाच आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या काही याचिकांवर सुनावणी घेताना न्यायालयाने या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे का, हे ठरविताना गृहीत धरलेल्या निकषांची छाननी आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी घटनापीठापुढे याची सुनावणी घेण्याचा निकालही दिला आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ चालू झालेले नाही. अशा परिस्थितीत आणि गुंतागुंतीच्या खटल्यावर निकालास उशीर होऊ शकतो. त्याचा विचार करता आरक्षणाच्या निर्णयापर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाच घ्यायच्या नाहीत का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परीक्षा बेमुदत किंवा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पुढे ढकललेल्या नाहीत, तर कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच नव्या तारखा जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. आता कोरोनाचे संकट उभे राहून आठ महिने झाले. सर्व परीक्षा घेणारच नाही, अशी ठाम भूमिका घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनाही विरोध केला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना मग मुभा का दिली होती? शिवाय ती एका दिवसावर आल्यावर रद्द करण्याची घाई तरी का केली? याचे समाधानकारक उत्तर त्यांनी दिलेले नाही. आरक्षण हाच जर वादाचा मुद्दा असेल, तर महाराष्ट्रातील तरुणांचे आपण अपरिमित नुकसान करतो आहे.

दुसऱ्या बाजूला नोकरभरती करायची नाही, कारण कोरोनामुळे राज्य सरकारची आर्थिक हलाखी चालली आहे, असेही सांगितले जाते. राज्य सरकार, प्रशासन, राज्यकर्ते, मराठा समाजाचे नेते सर्वच जण या विषयावर पोरखेळ करीत आहेत, असे वाटते. स्पर्धा परीक्षा या साध्या नसतात. त्यासाठी लाखो तरुण-तरुणी रात्रंदिवस अभ्यास करून तयारी करीत असतात. शिवाय त्याला वयोमर्यादेची अट असते. ती एकदा संपली की, पुन्हा संधी मिळत नाही. ज्यांनी चार-पाच वर्षे तयारी केली आहे आणि परीक्षा देण्यास सज्ज झाले होते, त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार करायला हवा. राज्य शासनात सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून लाखो तरुण-तरुणी जिवाचे रान करतात. अभ्यासासाठी प्रशिक्षण वर्ग लावतात. त्यासाठी पैसा मोजतात. त्यांचे कष्ट आणि पैसा वाया जातो आहे. काही विषय हे अधिक गांभीर्याने घेतले पाहिजेत. त्याचा समाजावर दूरगामी परिणाम होत असतो.

मराठा आरक्षणावर सर्वांचे एकमत असताना आणि कोणाचा विरोध नसताना घटनात्मक पेचावर कोणता उपाय काढता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते करण्याऐवजी आरक्षण मिळेपर्यंत सर्व व्यवहार किंवा नोकरभरती रोखा म्हणणे परवडणारे नाही. मुळात कोरोनामुळे अनेकांना रोजगार मिळाला नाही. लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना रोजगारासाठी दारोदार भटकावे लागत आहे. वृत्तपत्रांची पाने चाळली तर अनेक तरुण-तरुणी आत्महत्या करीत असल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत आहेत. आपल्या भावी पिढीच्या आयुष्याचा राज्यकर्त्यांनी आणि सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करून योग्य मार्ग काढावा लागेल. रोजगार कसे वाढतील ते पहावे लागेल. हा पोरखेळ थांबवा आणि तरुणांना सहाय्यभूत करेल, असे सामंजस्याचे धोरण स्वीकारा!

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMPSC examएमपीएससी परीक्षाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय