शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
4
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
5
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
6
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
7
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
8
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
9
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
10
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
11
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
12
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
13
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
14
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
15
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
16
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
17
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
18
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
19
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
20
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: उशिरा पडलेला प्रकाश! अमेरिकेचा दहशतवादावरील अहवाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:46 IST

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.

भारताने वर्षानुवर्षे कानीकपाळी ओरडूनही सातत्याने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाकडे दुर्लक्ष केलेल्या अमेरिकेच्या डोक्यात उशिरा पडलेल्या प्रकाशाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ काउंटर टेररिझम’ने नुकतेच ‘कंट्री रिपोर्ट् ऑन टेररिझम २०२१’ या नावाने विभिन्न देशांच्या २०२१ मधील दहशतवादविरोधी उपाययोजनांचे मूल्यमापन करणारे अहवाल जारी केले आहेत. त्यामध्ये दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेल्या भारतासंदर्भातील अहवाल आहे आणि दहशतवादाची जननी पाकिस्तानसंदर्भातील अहवालही आहे. अर्थातच उभय अहवालांचा तोंडावळा पूर्णतः भिन्न आहे.

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. अजिबात उशीर आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तमाम दहशतवादी संघटना समूळ नष्ट करण्याच्या प्रतिज्ञेसंदर्भात पाकिस्तानने काहीही केले नसल्याचा ठपका, पाकिस्तानसंदर्भातील अहवालात ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी भारतासंदर्भातील अहवालात भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना दाद देण्यात आली आहे. भारताने २०२१ मध्ये दहशतवादी संघटनांना वेसण घालण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले, दहशतवादी संघटनांसंदर्भात अमेरिकेने जी माहिती मागितली, ती तातडीने पुरवली आणि अमेरिकेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादी संघटनांच्या विरोधात जलदगतीने कारवाया केल्या, असे गौरवोद्गार अहवालात काढण्यात आले आहेत. भारत गत काही दशकांपासून स्वबळावर दहशतवादाच्या विरोधात लढा देत आला आहे. या दीर्घकालीन लढाईत एक पंतप्रधान व एका माजी पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेते, उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, लष्कर व निमलष्करी दलांचे कित्येक जवान आणि हजारो निष्पाप नागरिक हुतात्मा झाले आहेत.

युद्धभूमीत भारताला मात देता येत नसल्याचा तीनदा अनुभव घेऊन झाल्यावर आणि त्या प्रयत्नांत बांगलादेशाच्या रूपाने मोठा भूभाग गमावल्यावर, पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाचे शस्त्र उपसले. देशाच्या अनेक शहरांमध्ये हजारो निष्पाप सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले! आज न उद्या दहशतवादाचा भस्मासूर उर्वरित जगाच्याही डोक्यावर हात ठेवणार असल्याचा इशारा कंठशोष करून देत होता; परंतु जगाचा पोलिस बनून मिरविणाऱ्या अमेरिकेसह उर्वरित जगानेही भारताला तोपर्यंत गांभीर्याने घेतले नाही, जोपर्यंत भारताचा इशारा खरा ठरला नाही.  २००१ मध्ये ९/११ या नावाने इतिहासात नोंद झालेला अमेरिकेवरील प्रचंड दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्याने मात्र अमेरिकेसह संपूर्ण जग हादरले आणि मग भारताची ओरड अनाठायी नसल्याचे, दहशतवाद ही तातडीने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याजोगी जागतिक समस्या असल्याचे मान्य केले. दुर्दैवाने त्यानंतरही पाकिस्तानातून उगम पावणाऱ्या दहशतवादाला वेसण घालण्यासाठी पुरेशी पावले अमेरिकेने उचलली नाहीत. त्यानंतर बराच काळापर्यंत अमेरिकेचा दहशतवादविरोधी लढा केवळ ९/११ चा बदला घेण्यासाठी अल कायदा ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यापुरताच मर्यादित राहिला होता. त्यांना संपवूनही दहशतवाद काही संपत नाही, हे बघून मात्र अमेरिकेचा दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि जागतिक दहशतवाद संपवायचा असल्यास पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचे अमेरिकेने मान्य केले.

अमेरिकेचा बदललेला दृष्टिकोनच ताज्या अहवालांमधूनही झळकत आहे. जोपर्यंत रशियाच्या विरोधात आणि अफगाणिस्तानात पाकिस्तानची गरज होती, तोपर्यंत अमेरिकेला पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद दिसत नव्हता किंवा त्याकडे डोळेझाक करण्याचे काम अमेरिकेने वर्षानुवर्षे केले. बदललेल्या जागतिक परिस्थितीत आता अमेरिकेला पाकिस्तानची फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे अमेरिकेने त्या देशाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता अमेरिकेला चीनला लगाम घालायचा आहे आणि त्यासाठी भारताची गरज आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून अमेरिकेला भारतप्रेमाचे भरते आले आहे. उद्या जागतिक परिस्थिती बदलली तर पुन्हा अमेरिकेची भूमिका बदलणारच नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, याची खूणगाठ भारतीय नेतृत्वाने बांधलेली बरी !

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद