शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

संपादकीय: उशिरा पडलेला प्रकाश! अमेरिकेचा दहशतवादावरील अहवाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:46 IST

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.

भारताने वर्षानुवर्षे कानीकपाळी ओरडूनही सातत्याने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाकडे दुर्लक्ष केलेल्या अमेरिकेच्या डोक्यात उशिरा पडलेल्या प्रकाशाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ काउंटर टेररिझम’ने नुकतेच ‘कंट्री रिपोर्ट् ऑन टेररिझम २०२१’ या नावाने विभिन्न देशांच्या २०२१ मधील दहशतवादविरोधी उपाययोजनांचे मूल्यमापन करणारे अहवाल जारी केले आहेत. त्यामध्ये दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेल्या भारतासंदर्भातील अहवाल आहे आणि दहशतवादाची जननी पाकिस्तानसंदर्भातील अहवालही आहे. अर्थातच उभय अहवालांचा तोंडावळा पूर्णतः भिन्न आहे.

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. अजिबात उशीर आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तमाम दहशतवादी संघटना समूळ नष्ट करण्याच्या प्रतिज्ञेसंदर्भात पाकिस्तानने काहीही केले नसल्याचा ठपका, पाकिस्तानसंदर्भातील अहवालात ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी भारतासंदर्भातील अहवालात भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना दाद देण्यात आली आहे. भारताने २०२१ मध्ये दहशतवादी संघटनांना वेसण घालण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले, दहशतवादी संघटनांसंदर्भात अमेरिकेने जी माहिती मागितली, ती तातडीने पुरवली आणि अमेरिकेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादी संघटनांच्या विरोधात जलदगतीने कारवाया केल्या, असे गौरवोद्गार अहवालात काढण्यात आले आहेत. भारत गत काही दशकांपासून स्वबळावर दहशतवादाच्या विरोधात लढा देत आला आहे. या दीर्घकालीन लढाईत एक पंतप्रधान व एका माजी पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेते, उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, लष्कर व निमलष्करी दलांचे कित्येक जवान आणि हजारो निष्पाप नागरिक हुतात्मा झाले आहेत.

युद्धभूमीत भारताला मात देता येत नसल्याचा तीनदा अनुभव घेऊन झाल्यावर आणि त्या प्रयत्नांत बांगलादेशाच्या रूपाने मोठा भूभाग गमावल्यावर, पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाचे शस्त्र उपसले. देशाच्या अनेक शहरांमध्ये हजारो निष्पाप सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले! आज न उद्या दहशतवादाचा भस्मासूर उर्वरित जगाच्याही डोक्यावर हात ठेवणार असल्याचा इशारा कंठशोष करून देत होता; परंतु जगाचा पोलिस बनून मिरविणाऱ्या अमेरिकेसह उर्वरित जगानेही भारताला तोपर्यंत गांभीर्याने घेतले नाही, जोपर्यंत भारताचा इशारा खरा ठरला नाही.  २००१ मध्ये ९/११ या नावाने इतिहासात नोंद झालेला अमेरिकेवरील प्रचंड दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्याने मात्र अमेरिकेसह संपूर्ण जग हादरले आणि मग भारताची ओरड अनाठायी नसल्याचे, दहशतवाद ही तातडीने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याजोगी जागतिक समस्या असल्याचे मान्य केले. दुर्दैवाने त्यानंतरही पाकिस्तानातून उगम पावणाऱ्या दहशतवादाला वेसण घालण्यासाठी पुरेशी पावले अमेरिकेने उचलली नाहीत. त्यानंतर बराच काळापर्यंत अमेरिकेचा दहशतवादविरोधी लढा केवळ ९/११ चा बदला घेण्यासाठी अल कायदा ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यापुरताच मर्यादित राहिला होता. त्यांना संपवूनही दहशतवाद काही संपत नाही, हे बघून मात्र अमेरिकेचा दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि जागतिक दहशतवाद संपवायचा असल्यास पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचे अमेरिकेने मान्य केले.

अमेरिकेचा बदललेला दृष्टिकोनच ताज्या अहवालांमधूनही झळकत आहे. जोपर्यंत रशियाच्या विरोधात आणि अफगाणिस्तानात पाकिस्तानची गरज होती, तोपर्यंत अमेरिकेला पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद दिसत नव्हता किंवा त्याकडे डोळेझाक करण्याचे काम अमेरिकेने वर्षानुवर्षे केले. बदललेल्या जागतिक परिस्थितीत आता अमेरिकेला पाकिस्तानची फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे अमेरिकेने त्या देशाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता अमेरिकेला चीनला लगाम घालायचा आहे आणि त्यासाठी भारताची गरज आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून अमेरिकेला भारतप्रेमाचे भरते आले आहे. उद्या जागतिक परिस्थिती बदलली तर पुन्हा अमेरिकेची भूमिका बदलणारच नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, याची खूणगाठ भारतीय नेतृत्वाने बांधलेली बरी !

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद