शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

संपादकीय: उशिरा पडलेला प्रकाश! अमेरिकेचा दहशतवादावरील अहवाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:46 IST

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.

भारताने वर्षानुवर्षे कानीकपाळी ओरडूनही सातत्याने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाकडे दुर्लक्ष केलेल्या अमेरिकेच्या डोक्यात उशिरा पडलेल्या प्रकाशाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ काउंटर टेररिझम’ने नुकतेच ‘कंट्री रिपोर्ट् ऑन टेररिझम २०२१’ या नावाने विभिन्न देशांच्या २०२१ मधील दहशतवादविरोधी उपाययोजनांचे मूल्यमापन करणारे अहवाल जारी केले आहेत. त्यामध्ये दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेल्या भारतासंदर्भातील अहवाल आहे आणि दहशतवादाची जननी पाकिस्तानसंदर्भातील अहवालही आहे. अर्थातच उभय अहवालांचा तोंडावळा पूर्णतः भिन्न आहे.

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. अजिबात उशीर आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तमाम दहशतवादी संघटना समूळ नष्ट करण्याच्या प्रतिज्ञेसंदर्भात पाकिस्तानने काहीही केले नसल्याचा ठपका, पाकिस्तानसंदर्भातील अहवालात ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी भारतासंदर्भातील अहवालात भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना दाद देण्यात आली आहे. भारताने २०२१ मध्ये दहशतवादी संघटनांना वेसण घालण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले, दहशतवादी संघटनांसंदर्भात अमेरिकेने जी माहिती मागितली, ती तातडीने पुरवली आणि अमेरिकेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादी संघटनांच्या विरोधात जलदगतीने कारवाया केल्या, असे गौरवोद्गार अहवालात काढण्यात आले आहेत. भारत गत काही दशकांपासून स्वबळावर दहशतवादाच्या विरोधात लढा देत आला आहे. या दीर्घकालीन लढाईत एक पंतप्रधान व एका माजी पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेते, उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, लष्कर व निमलष्करी दलांचे कित्येक जवान आणि हजारो निष्पाप नागरिक हुतात्मा झाले आहेत.

युद्धभूमीत भारताला मात देता येत नसल्याचा तीनदा अनुभव घेऊन झाल्यावर आणि त्या प्रयत्नांत बांगलादेशाच्या रूपाने मोठा भूभाग गमावल्यावर, पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाचे शस्त्र उपसले. देशाच्या अनेक शहरांमध्ये हजारो निष्पाप सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले! आज न उद्या दहशतवादाचा भस्मासूर उर्वरित जगाच्याही डोक्यावर हात ठेवणार असल्याचा इशारा कंठशोष करून देत होता; परंतु जगाचा पोलिस बनून मिरविणाऱ्या अमेरिकेसह उर्वरित जगानेही भारताला तोपर्यंत गांभीर्याने घेतले नाही, जोपर्यंत भारताचा इशारा खरा ठरला नाही.  २००१ मध्ये ९/११ या नावाने इतिहासात नोंद झालेला अमेरिकेवरील प्रचंड दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्याने मात्र अमेरिकेसह संपूर्ण जग हादरले आणि मग भारताची ओरड अनाठायी नसल्याचे, दहशतवाद ही तातडीने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याजोगी जागतिक समस्या असल्याचे मान्य केले. दुर्दैवाने त्यानंतरही पाकिस्तानातून उगम पावणाऱ्या दहशतवादाला वेसण घालण्यासाठी पुरेशी पावले अमेरिकेने उचलली नाहीत. त्यानंतर बराच काळापर्यंत अमेरिकेचा दहशतवादविरोधी लढा केवळ ९/११ चा बदला घेण्यासाठी अल कायदा ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यापुरताच मर्यादित राहिला होता. त्यांना संपवूनही दहशतवाद काही संपत नाही, हे बघून मात्र अमेरिकेचा दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि जागतिक दहशतवाद संपवायचा असल्यास पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचे अमेरिकेने मान्य केले.

अमेरिकेचा बदललेला दृष्टिकोनच ताज्या अहवालांमधूनही झळकत आहे. जोपर्यंत रशियाच्या विरोधात आणि अफगाणिस्तानात पाकिस्तानची गरज होती, तोपर्यंत अमेरिकेला पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद दिसत नव्हता किंवा त्याकडे डोळेझाक करण्याचे काम अमेरिकेने वर्षानुवर्षे केले. बदललेल्या जागतिक परिस्थितीत आता अमेरिकेला पाकिस्तानची फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे अमेरिकेने त्या देशाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता अमेरिकेला चीनला लगाम घालायचा आहे आणि त्यासाठी भारताची गरज आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून अमेरिकेला भारतप्रेमाचे भरते आले आहे. उद्या जागतिक परिस्थिती बदलली तर पुन्हा अमेरिकेची भूमिका बदलणारच नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, याची खूणगाठ भारतीय नेतृत्वाने बांधलेली बरी !

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद