शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

घराबाहेर धोका अन् बोचरी अलिप्तता!

By किरण अग्रवाल | Updated: April 9, 2020 16:19 IST

कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशातच लॉकडाउन पुकारला गेल्याने प्रत्येकावरच घरात बसण्याची वेळ आली आहे. अर्थात घरात बसणे सुरक्षिततेचेही आहे. कारण आपण बाहेर पडलो तर कोरोनाचा विषाणू घरात येऊ शकेल.

- किरण अग्रवालमनुष्य हा मुळात सार्वजनिक - सामाजिक कवचात सुरक्षित राहणारा प्राणी आहे. यात प्रत्येकाचे वैयक्तिक खासगी आयुष्य आहे हे खरेच, पण त्याला सामाजिकतेचे वलय लाभले आहे हेदेखील तितकेच खरे. तसे नसते तर जगण्यातला आनंद अगर सुख-दु:खातल्या भावभावनांचे हसरे वा रडके तरंग त्याला अनुभवता आले नसते. ही सामाजिकता प्रत्येकाच्या सरावाचीच झालेली असते. तिचे अस्तित्व आहेच, किंवा असतेच; पण प्रत्येकवेळी ते जाणवतेच असेही नाही. एकटेपण वाट्यास येते तेव्हा मात्र ही समाजापासूनची अलिप्तता मनाला बोचते, जाणवते. काहीतरी राहून अगर सुटून जाते आहे असे यावेळी प्रकर्षाने वाटते, त्यातून आकारास येणारी हुरहूर संवेदनशील मनाला कुरतडणारीच ठरते. सध्याच्या कोरोनातून ओढवलेल्या लॉकडाउनच्या स्थितीत अनेकांना तेच अनुभवास येत आहे.कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशातच लॉकडाउन पुकारला गेल्याने प्रत्येकावरच घरात बसण्याची वेळ आली आहे. अर्थात घरात बसणे सुरक्षिततेचेही आहे. कारण आपण बाहेर पडलो तर कोरोनाचा विषाणू घरात येऊ शकेल. त्यामुळे ते आवश्यकच आहे. या घरबसलेपणामागे भीती आहे हेदेखील खरे; मात्र त्यातील चांगली बाजू अशी की, निदान यानिमित्ताने प्रत्येकाला कुटुंबासाठी खास वेळ देता येतो आहे. अशात टीव्हीसमोर बसून बसूनही किती वेळ बसणार, म्हणून काही हौशी स्वयंपाकघरात मदत, तर काही मुलांसोबत खेळण्यात वेळ घालवताना दिसत आहेत. इतरही कामात काहींनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. हे सारे एकीकडे होत असताना नेहमीच्या भेटीगाठी दुरावल्या आहेत. मोबाइलच्या माध्यमातून संपर्क होत असला तरी प्रत्यक्ष भेटीतला आनंद काय असतो याची जाणीव यानिमित्ताने होत आहे.महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून नाईलाजाने घराबाहेर पडावे लागलेल्यांनाही कसे चुकचुकल्यासारखे होते आहे. इमारती आहेत तिथेच आहेत, रस्ते तेच आहेत; पण त्यावर वर्दळ नाही, की नेहमी वाटेत भेटणारी वा दिसणारी माणसे नाहीत. वाहनांचा तो गोंगाट नाही, की हॉर्नचा कर्कश आवाज नाही. आपण हे रस्ते, त्यावरील इमारती, तेथील गजबजाट- गर्दी या साऱ्यांना इतके सरावलेले असतो की त्याशिवायची स्थिती कशी ओकीबोकी, भकास, विषण्ण वाटते. चौकाचौकात गाडी थांबल्यावर पुढे येत फुगे किंवा फुले विकणारी मुले असोत अथवा असहायतेने भिक्षेसाठी हात पुढे करणारी मंडळी, त्यांचे ते केविलवाणे चेहरे परिचित होऊन गेलेले असतात प्रत्येकासाठी; पण कोरोनाच्या भयाने तेही गायब आहेत. ना सिग्नल मुळे चौकात थांबण्याचा प्रश्न येतो, ना हे नेहमीचे चेहरे दृष्टीस पडतात. कशाला, कोणत्याही शहरातले उदाहरण घ्या; तेथील रिक्षावाल्याला टाळून कोणालाच पुढे जाता येत नाही, वाहनधारकाला नाही आणि पादचाऱ्यांनाही नाही. पण तेही आता रस्त्यावर नाहीत. सरकारी पक्षाने पुकारलेला असो, की विरोधकांचा; कुठला बंदही इतका कडक वा असा निर्मनुष्य नसतो. एकूणच या शुकशुकाटामुळे काही तरी राहून जाते आहे अशी रुखरुख अधिक प्रगाढ होते. सभोवतालच्या सजीवतेतील ही कमालीची अलिप्तता संवेदनशील मनाला बोचणारीच ठरली आहे.नाईलाजातून व अंतिमत: स्वत:च्याच सुरक्षेपोटी स्वीकारावा लागलेला हा एकांतपणा व शुकशुकाट आपल्याभोवती राहणाऱ्या सामाजिक-सार्वजनिक वलयाची, त्याच्या अभिन्नतेची आणि आवश्यकतेचीही जाणीव करून देणाराच ठरला आहे. समाजापासून दूर राहून कुणीही फार काळ टिकू अगर तरू शकत नाही, हेच यातून दृगोच्चर व्हावे. आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण स्वत:साठी धावत असतो. मी व माझेपणाची भावना कमालीची वाढीस लागलेली आहे, पण हे सारे खरे असले तरी समाज वा कुटुंबाशिवाय आयुष्यात तो आनंद नाही. मर्यादित काळासाठी व कारणांसाठीचे खासगीपण ठीक असले तरी सामाजिक, सार्वजनिकतेखेरीज त्यात गोडी नाही. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही सामाजिक सामिलकीची संकल्पना मांडली होती, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून उमटलेले दिसते. या सामिलकीखेरीज राहायची वेळ ओढवते तेव्हा साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखे ते ठरते, वाहत्या पाण्यातील नाद अगर लय त्यात नसते. तेव्हा कोरोनाच्या लॉकडाउनमधून हाच धडा घ्यायचा. आज सामाजिक भान जपत एकांतवास पत्करून घरात थांबूया, पण सामाजिक सामिलकीसह वसुधैव कुटुम्बकमची भावना जोपासण्याचा निश्चय नक्कीच मनाशी करूया एवढेच यानिमित्ताने.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या