शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:24 IST

राजकारणातील अशा मागण्या आपल्या ताटात जास्तीचे काही पाडून घेण्यासाठी व आपला भाव वाढवून घेण्यासाठी केल्या जातात. पूर्वी हे काँग्रेस व राष्ट्रवादीत झाले, आता ते भाजप व सेना यांच्यात होत आहे एवढेच. शिवसेना आता काय करते, ते आपल्याला पाहायचे आहे.

अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे मिळाल्याखेरीज तडजोड नाही, अशी शिवसेनेने भाजपकडे केलेली मागणी म्हणावी तेवढी ठाम नाही. ती पातळ करून सरकारात सामील व्हायचे, हा सेनेचा पवित्रा जुना आहे आणि तोच याही वेळी पत्करेल, असे वातावरण आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा १२२ वरून कमी होऊन १०५ वर आल्या असल्या, तरी सेनेच्या जागाही फारशा वाढल्या नाहीत. भाजपचे सरकार दिल्लीत आहे आणि आता ते ईडीचा राजकीय वापर करण्यात तरबेज झाले आहे. त्यामुळे सेनेला आपला द्वेष फार काळ चालविता येण्याजोगा नाही, शिवाय विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. मागल्या निवडणुकीनंतर सेनेने भाजपची अशीच कोंडी केली, तेव्हा ‘घाबरू नका, मी तुम्हाला सत्तेबाहेर जाऊ देणार नाही,’ असे सांगून पवारांनीच भाजपला आश्वस्त केले होते. तीही एक भीती सेनेला आहे. एक गोष्ट मात्र खरी, सेनेच्या मदतीवाचून भाजपचे सरकार सत्तारूढ होत नाही आणि यावेळी ‘भाजपशी कोणतीही तडजोड न करण्याचा’ पवित्रा पवारांनीही घेतला आहे.

काही राजकीय बुद्धिवंतांच्या मते, पवारच सेनेशी युती करून व काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर काढतील. मात्र, पवार त्याहीबाबत ‘आम्हाला सत्ता नको, आम्ही विरोधातच राहू’ असे वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळे ही स्थिती सरकारची स्थापना खोळंबून ठेवणारी असली, तरी ती कायमची थांबवू शकणारी नाही, अशी आहे. एका गोष्टीवर भाजपनेही ठाम भूमिका घेतलेली दिसते. मंत्रिपदे देऊ, पण मुख्यमंत्रिपद मात्र कोणत्याही स्थितीत अडीच वर्षांसाठी सोडा, एका वर्षासाठीही तो पक्ष सेनेला देणार नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे. एवढ्या साऱ्यांची नामर्जी भाजप ओढवून घेईल, अशी शक्यता अजिबात नाही. त्याची मान्यता व मतसंख्या कमी झाल्याचे दिसत असले, तरी तो पक्ष आपला राष्ट्रीय चेहरा गमावील, असे मात्र नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे एक सूचक वक्तव्य आहे. ते म्हणाले, ‘सेनेने आमच्याकडे अजूनपर्यंत तरी विचारणा केली नाही.’ (अर्थात, अशी विचारणा कुणी उघडही करणार नाही, हे साऱ्यांना समजणारे आहे.) त्या वक्तव्यानंतर त्यांनी बारामतीत जाऊन पवारांची भेट घेतली. नंतर ते दोन्ही नेते गप्पच राहिलेले दिसतात.

त्यामुळे या साºयांबाबत कुतूहल आणि अंदाज बाळगणे एवढेच आपल्याला करता येणार आहे. खरा प्रश्न भाजप हा पक्ष किती कमी पदांवर सेनेला तडजोडीसाठी भाग पाडतो हा आणि सेनेला तो उपमुख्यमंत्रिंपदाचे पद तरी देईल की नाही हा आहे. राजकारणातील तडजोडी न बोलता करायच्या आणि मुकाटपणे विसरायच्या असतात. ते सेना कशी काय करते, हे खरे तर आपल्याला पाहायचे आहे. हरयाणाचे गणित सोपे होते. तेथे भाजपला ४० तर काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या होत्या. ९० सभासदांच्या सभागृहात जेएनएन ७ आमदार मिळवून भाजपच्या खट्टरांना बहुमत जोडणे जमणारे होते व ते त्यांनी केलेही. महाराष्ट्रात सारेच तुल्यबळ आहेत आणि कुणी एकटाच सबळ नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात यापूर्वी सख्य राहिले आहे. अगदी पवार हे या वयातही कुणास कशी हुलकावणी देतात, यांचा अंदाज त्यांच्या जवळच्यांनाही बांधता येत नाही. भाजपमधील शिवसेनेविषयीची साशंकता त्यातून येणारी आहे.

त्यातून आमच्या राजकारणाचा तत्त्वांशी, भूमिकांशी व खरे तर समाजकारणाशीही फारसा संबंध उरला नसल्याने, पुढारी केव्हा कुणाशी हातमिळवणी करतील, याचा नेम उरला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवायला वेळ लागत आहे. तो जास्तीतजास्त ताणून धरणे शिवसेनेच्या लाभाचे, भाजपच्या चिंतेचे, पवारांच्या डावपेचांचे आणि काँग्रेसच्या करमणुकीचे ठरणार आहे. ते काहीही असले, तरी अस्थिरता लवकर संपणे व स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार