शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:24 IST

राजकारणातील अशा मागण्या आपल्या ताटात जास्तीचे काही पाडून घेण्यासाठी व आपला भाव वाढवून घेण्यासाठी केल्या जातात. पूर्वी हे काँग्रेस व राष्ट्रवादीत झाले, आता ते भाजप व सेना यांच्यात होत आहे एवढेच. शिवसेना आता काय करते, ते आपल्याला पाहायचे आहे.

अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे मिळाल्याखेरीज तडजोड नाही, अशी शिवसेनेने भाजपकडे केलेली मागणी म्हणावी तेवढी ठाम नाही. ती पातळ करून सरकारात सामील व्हायचे, हा सेनेचा पवित्रा जुना आहे आणि तोच याही वेळी पत्करेल, असे वातावरण आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा १२२ वरून कमी होऊन १०५ वर आल्या असल्या, तरी सेनेच्या जागाही फारशा वाढल्या नाहीत. भाजपचे सरकार दिल्लीत आहे आणि आता ते ईडीचा राजकीय वापर करण्यात तरबेज झाले आहे. त्यामुळे सेनेला आपला द्वेष फार काळ चालविता येण्याजोगा नाही, शिवाय विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. मागल्या निवडणुकीनंतर सेनेने भाजपची अशीच कोंडी केली, तेव्हा ‘घाबरू नका, मी तुम्हाला सत्तेबाहेर जाऊ देणार नाही,’ असे सांगून पवारांनीच भाजपला आश्वस्त केले होते. तीही एक भीती सेनेला आहे. एक गोष्ट मात्र खरी, सेनेच्या मदतीवाचून भाजपचे सरकार सत्तारूढ होत नाही आणि यावेळी ‘भाजपशी कोणतीही तडजोड न करण्याचा’ पवित्रा पवारांनीही घेतला आहे.

काही राजकीय बुद्धिवंतांच्या मते, पवारच सेनेशी युती करून व काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर काढतील. मात्र, पवार त्याहीबाबत ‘आम्हाला सत्ता नको, आम्ही विरोधातच राहू’ असे वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळे ही स्थिती सरकारची स्थापना खोळंबून ठेवणारी असली, तरी ती कायमची थांबवू शकणारी नाही, अशी आहे. एका गोष्टीवर भाजपनेही ठाम भूमिका घेतलेली दिसते. मंत्रिपदे देऊ, पण मुख्यमंत्रिपद मात्र कोणत्याही स्थितीत अडीच वर्षांसाठी सोडा, एका वर्षासाठीही तो पक्ष सेनेला देणार नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे. एवढ्या साऱ्यांची नामर्जी भाजप ओढवून घेईल, अशी शक्यता अजिबात नाही. त्याची मान्यता व मतसंख्या कमी झाल्याचे दिसत असले, तरी तो पक्ष आपला राष्ट्रीय चेहरा गमावील, असे मात्र नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे एक सूचक वक्तव्य आहे. ते म्हणाले, ‘सेनेने आमच्याकडे अजूनपर्यंत तरी विचारणा केली नाही.’ (अर्थात, अशी विचारणा कुणी उघडही करणार नाही, हे साऱ्यांना समजणारे आहे.) त्या वक्तव्यानंतर त्यांनी बारामतीत जाऊन पवारांची भेट घेतली. नंतर ते दोन्ही नेते गप्पच राहिलेले दिसतात.

त्यामुळे या साºयांबाबत कुतूहल आणि अंदाज बाळगणे एवढेच आपल्याला करता येणार आहे. खरा प्रश्न भाजप हा पक्ष किती कमी पदांवर सेनेला तडजोडीसाठी भाग पाडतो हा आणि सेनेला तो उपमुख्यमंत्रिंपदाचे पद तरी देईल की नाही हा आहे. राजकारणातील तडजोडी न बोलता करायच्या आणि मुकाटपणे विसरायच्या असतात. ते सेना कशी काय करते, हे खरे तर आपल्याला पाहायचे आहे. हरयाणाचे गणित सोपे होते. तेथे भाजपला ४० तर काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या होत्या. ९० सभासदांच्या सभागृहात जेएनएन ७ आमदार मिळवून भाजपच्या खट्टरांना बहुमत जोडणे जमणारे होते व ते त्यांनी केलेही. महाराष्ट्रात सारेच तुल्यबळ आहेत आणि कुणी एकटाच सबळ नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात यापूर्वी सख्य राहिले आहे. अगदी पवार हे या वयातही कुणास कशी हुलकावणी देतात, यांचा अंदाज त्यांच्या जवळच्यांनाही बांधता येत नाही. भाजपमधील शिवसेनेविषयीची साशंकता त्यातून येणारी आहे.

त्यातून आमच्या राजकारणाचा तत्त्वांशी, भूमिकांशी व खरे तर समाजकारणाशीही फारसा संबंध उरला नसल्याने, पुढारी केव्हा कुणाशी हातमिळवणी करतील, याचा नेम उरला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवायला वेळ लागत आहे. तो जास्तीतजास्त ताणून धरणे शिवसेनेच्या लाभाचे, भाजपच्या चिंतेचे, पवारांच्या डावपेचांचे आणि काँग्रेसच्या करमणुकीचे ठरणार आहे. ते काहीही असले, तरी अस्थिरता लवकर संपणे व स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार