शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:24 IST

राजकारणातील अशा मागण्या आपल्या ताटात जास्तीचे काही पाडून घेण्यासाठी व आपला भाव वाढवून घेण्यासाठी केल्या जातात. पूर्वी हे काँग्रेस व राष्ट्रवादीत झाले, आता ते भाजप व सेना यांच्यात होत आहे एवढेच. शिवसेना आता काय करते, ते आपल्याला पाहायचे आहे.

अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे मिळाल्याखेरीज तडजोड नाही, अशी शिवसेनेने भाजपकडे केलेली मागणी म्हणावी तेवढी ठाम नाही. ती पातळ करून सरकारात सामील व्हायचे, हा सेनेचा पवित्रा जुना आहे आणि तोच याही वेळी पत्करेल, असे वातावरण आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा १२२ वरून कमी होऊन १०५ वर आल्या असल्या, तरी सेनेच्या जागाही फारशा वाढल्या नाहीत. भाजपचे सरकार दिल्लीत आहे आणि आता ते ईडीचा राजकीय वापर करण्यात तरबेज झाले आहे. त्यामुळे सेनेला आपला द्वेष फार काळ चालविता येण्याजोगा नाही, शिवाय विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. मागल्या निवडणुकीनंतर सेनेने भाजपची अशीच कोंडी केली, तेव्हा ‘घाबरू नका, मी तुम्हाला सत्तेबाहेर जाऊ देणार नाही,’ असे सांगून पवारांनीच भाजपला आश्वस्त केले होते. तीही एक भीती सेनेला आहे. एक गोष्ट मात्र खरी, सेनेच्या मदतीवाचून भाजपचे सरकार सत्तारूढ होत नाही आणि यावेळी ‘भाजपशी कोणतीही तडजोड न करण्याचा’ पवित्रा पवारांनीही घेतला आहे.

काही राजकीय बुद्धिवंतांच्या मते, पवारच सेनेशी युती करून व काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर काढतील. मात्र, पवार त्याहीबाबत ‘आम्हाला सत्ता नको, आम्ही विरोधातच राहू’ असे वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळे ही स्थिती सरकारची स्थापना खोळंबून ठेवणारी असली, तरी ती कायमची थांबवू शकणारी नाही, अशी आहे. एका गोष्टीवर भाजपनेही ठाम भूमिका घेतलेली दिसते. मंत्रिपदे देऊ, पण मुख्यमंत्रिपद मात्र कोणत्याही स्थितीत अडीच वर्षांसाठी सोडा, एका वर्षासाठीही तो पक्ष सेनेला देणार नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे. एवढ्या साऱ्यांची नामर्जी भाजप ओढवून घेईल, अशी शक्यता अजिबात नाही. त्याची मान्यता व मतसंख्या कमी झाल्याचे दिसत असले, तरी तो पक्ष आपला राष्ट्रीय चेहरा गमावील, असे मात्र नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे एक सूचक वक्तव्य आहे. ते म्हणाले, ‘सेनेने आमच्याकडे अजूनपर्यंत तरी विचारणा केली नाही.’ (अर्थात, अशी विचारणा कुणी उघडही करणार नाही, हे साऱ्यांना समजणारे आहे.) त्या वक्तव्यानंतर त्यांनी बारामतीत जाऊन पवारांची भेट घेतली. नंतर ते दोन्ही नेते गप्पच राहिलेले दिसतात.

त्यामुळे या साºयांबाबत कुतूहल आणि अंदाज बाळगणे एवढेच आपल्याला करता येणार आहे. खरा प्रश्न भाजप हा पक्ष किती कमी पदांवर सेनेला तडजोडीसाठी भाग पाडतो हा आणि सेनेला तो उपमुख्यमंत्रिंपदाचे पद तरी देईल की नाही हा आहे. राजकारणातील तडजोडी न बोलता करायच्या आणि मुकाटपणे विसरायच्या असतात. ते सेना कशी काय करते, हे खरे तर आपल्याला पाहायचे आहे. हरयाणाचे गणित सोपे होते. तेथे भाजपला ४० तर काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या होत्या. ९० सभासदांच्या सभागृहात जेएनएन ७ आमदार मिळवून भाजपच्या खट्टरांना बहुमत जोडणे जमणारे होते व ते त्यांनी केलेही. महाराष्ट्रात सारेच तुल्यबळ आहेत आणि कुणी एकटाच सबळ नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात यापूर्वी सख्य राहिले आहे. अगदी पवार हे या वयातही कुणास कशी हुलकावणी देतात, यांचा अंदाज त्यांच्या जवळच्यांनाही बांधता येत नाही. भाजपमधील शिवसेनेविषयीची साशंकता त्यातून येणारी आहे.

त्यातून आमच्या राजकारणाचा तत्त्वांशी, भूमिकांशी व खरे तर समाजकारणाशीही फारसा संबंध उरला नसल्याने, पुढारी केव्हा कुणाशी हातमिळवणी करतील, याचा नेम उरला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवायला वेळ लागत आहे. तो जास्तीतजास्त ताणून धरणे शिवसेनेच्या लाभाचे, भाजपच्या चिंतेचे, पवारांच्या डावपेचांचे आणि काँग्रेसच्या करमणुकीचे ठरणार आहे. ते काहीही असले, तरी अस्थिरता लवकर संपणे व स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार