शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

मोदींच्या मनात गडकरींबद्दल दुरावा म्हणून त्यांच्यावर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 03:55 IST

संघाला भाजपच्या सर्वोच्च स्थानी व सरकारच्याही प्रमुख पदावर गडकरीच हवे होते. मोदींच्या मागच्या कारकिर्दीत त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची नावे कार्यक्षमतेच्या यादीत फार वरिष्ठ जागांवर होती, त्यात गडकरींचे नाव होते.

नितीन गडकरी यांच्या कामाचा धडाका, वेग आणि पारदर्शीपणा पाहता, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना अधिक महत्त्वाचे खाते दिले जाईल, अशी अनेकांची अपेक्षा होती. तशीही संरक्षण, अर्थ व परराष्ट्र ही खाती रिकामी झाली होती, पण त्यापैकी एकावर निर्मला सीतारामन यांच्यासारख्या कनिष्ठ मंत्र्याला आणून मोदींनी गडकरी यांना महत्त्वाची खाती नाकारली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री यांचा कोअर ग्रुप असतो. तोच सरकारचे सर्व महत्त्वाचे राजकीय निर्णयही घेत असतो. गेली पाच वर्षे मोदींनी गडकरींना या ग्रुपमध्ये येऊ दिले नाही, हे प्रकर्षाने जाणवते. निदान यावेळी त्यांना त्या ग्रुपमध्ये आणले जाईल व राजकीय निर्णयाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतले जाईल, ही अपेक्षा होती. मात्र, मोदींनी तसे केले नाही. मोदी यांच्या मनातील गडकरी यांच्याविषयीचा दुरावा जुना आहे. ते दोघेही याविषयी कधी बोलत नसले, तरी त्याचे अस्तित्व त्यांच्याजवळच्या साऱ्यांना ठाऊक आहे. कोअर ग्रुप नाकारून ‘तुम्ही नुसतेच रस्ते व पूल बांधा आणि दिल्लीपासून शक्यतो दूर राहा’ असा संदेशच मोदींनी त्यांच्या या निर्णयाने गडकरी यांना दिला आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना गडकरी त्यात बांधकाममंत्री होते. तेव्हाच त्या क्षेत्रातील त्यांच्या नावाभोवती कीर्तीचे एक वलय उभे राहिले होते. काही काळात ते केंद्रात जातील, असे त्याही वेळी अनेक जण बोलत होते. प्रत्यक्षात ते तसे गेलेही.

संघाने त्यांना भाजपचे अध्यक्षपद देऊन त्यांना पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेतेच बनवून टाकले. तसे करताना लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही संघाने कठोरपणे बाजूला केले. अडवाणींचे पक्षाध्यक्षपद व लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेतेपद त्यासाठी त्यांनी काढून घेतले. गडकरी त्यावेळी महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे नेते होते. राज्यातला विरोधी पक्षनेता त्यांच्या रूपाने भाजप या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षातील अनेक महत्त्वाकांक्षी लोकांना त्यांच्याविषयीची असूया वाटू लागली होती. राज्यांचे मुख्यमंत्री व अनेक केंद्रीय मंत्री त्यांच्या अध्यक्षपदामुळे मागल्या रांगेत गेले होते. नरेंद्र मोदी हे अशा मागच्या रांगेत जाणाऱ्यांमध्ये एक होते. हे मोदी नक्कीच विसरले नसणार. काही काळातच गडकरी यांच्याविरुद्ध भाजपतील काही ज्येष्ठ नेत्यांनी एक बदनामीची मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांना गडकरींच्या पूर्ती या कारखान्याचे निमित्त पुरे झाले. प्रत्यक्ष राम जेठमलानींसारखा देशातला ज्येष्ठ कायदेपंडित व भाजपचा एके काळचा विधिमंत्री या मोहिमेत पुढाकार घेताना दिसला. त्यांनी ही मोहीम जोरदारपणे लढविली. त्यांच्यामागे असणाऱ्यांची नावे आता सर्वविदित आहेत. त्याबाबत कायम चर्चाही होत असते.

गडकरी यांच्याविषयी वाटणारी असूयाच त्यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीला मोदींना येऊ न देणारी ठरली. मुळात संघाला भाजपच्या सर्वोच्च स्थानी व त्याच्या सरकारच्याही प्रमुख पदावर गडकरीच हवे होते आणि ही गोष्ट संघातील वरिष्ठ नेते खासगीत बोलतही होते. मोदींनाही ही गोष्ट ठाऊकच असणार. गडकरी यांच्याविषयीचा त्यांच्या मनातील संशय आणि दुरावा यांचा इतिहास त्या काळापर्यंत मागे जाणारा आहे. मोदींच्या मागच्या कारकिर्दीत त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची नावे कार्यक्षमतेच्या यादीत फार वरिष्ठ जागांवर होती, त्यात गडकरींचे नाव होते. सारा देश पक्क्या सडकांनी बांधून काढण्याचा व ते काम शक्य तेवढ्या वेगाने करण्याचा त्यांचा झपाटा साऱ्या देशाला अचंबित करणाराही होता. त्यांचा या कामाचा निवडणुकीत पक्षाला अनुकूल लाभ झालाच असणार. भाजपच्या आताच्या विजयाचे फार मोठे श्रेय गडकरी यांच्या या बांधकामाला जाते. स्वाभाविकच अशा व्यक्तीला संरक्षण, गृह, अर्थ किंवा परराष्ट्र व्यवहार असे महत्त्वाचे खाते दिले जाईल, असे साऱ्यांना वाटत होते.

गडकरी नागपूरचे आहेत व ते संघाचे निकटवर्ती आहेत. त्यांना वरिष्ठ पद देऊन मोदींना भाजप व संघ यातील नाते आणखी घट्ट करता आले असते. ते न करता मोदींनी आपली जुनी असूया वापरून गडकरींवर पुन्हा एकदा आणि एकवार अन्यायच केला आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदी