शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Editorial: संपादकीय: महागाई की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 08:11 IST

गेल्या मे महिन्यातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात ती नाराजी स्पष्टपणे दिसून आली नव्हती. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये विरोधकांची सरकारे स्थापन झाली तरी त्याचा थेट संबंध कोरोना महामारीतल्या गैरव्यवस्थापनाशी लावता आला नाही.

लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या २९ जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला जागे करणारा, विरोधकांच्या तंबूत उत्साह वाढविणारा ठरावा. विरोधी पक्ष गेल्या जवळपास वर्षभरापासून आरोप करीत आहेत, की कोरोना महामारी हाताळताना झालेली धरसोड, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेली तडफड, गंगा नदीत वाहून जाणारी प्रेते, तसेच लस पुरवठ्याचे उशिरा आदेश व अपेक्षेपेक्षा लसीकरणाला झालेला उशीर वगैरे बाबींवर लोकांमध्ये नाराजी आहे. तथापि, गेल्या मे महिन्यातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात ती नाराजी स्पष्टपणे दिसून आली नव्हती. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये विरोधकांची सरकारे स्थापन झाली तरी त्याचा थेट संबंध कोरोना महामारीतल्या गैरव्यवस्थापनाशी लावता आला नाही. कारण, त्याचवेळी आसाम, पुदुचेरीमध्ये केंद्रात सत्ताधारी भाजपला यश मिळाले. त्या निकालांना पाच महिने उलटून गेले असताना महागाईचा नवा मुद्दा समोर आला आहे.

विशेषत: पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. इंधनांच्या दरांनी शंभरी ओलांडली, स्वयंपाकाच्या घरगुती गॅसचे सिलिंडर हजाराच्या व व्यावसायिक गॅसचे सिलिंडर दोन हजारांच्या घरात गेले. त्यावर मोठी नाराजी व्यक्त झाली तरी घसरण नाव घ्यायला तयार नाही. सरकारने वाहनधारकांना वाऱ्यावर सोडल्याची टीका होत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे, तर डिझेलच्या दरवाढीने वाहतूकखर्च वाढून महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. अशावेळी चौदा राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात पोटनिवडणूक झाली. नागालँडमधील शामातोर-चेसोर मतदारसंघात नॅशनालिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने उरलेल्या तेरा राज्यांमध्येच प्रत्यक्षात पोटनिवडणूक झाली. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत झाली व त्यापैकी अखेरची दोन राज्येवगळता इतरत्र काँग्रेसने भाजपवर मोठा विजय मिळविला. वरून मध्य प्रदेश व कर्नाटकातही काँग्रेसने एकेक जागा जिंकली. विशेषत: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठी प्रतिष्ठेची, दहा मंत्री जिथे प्रचारासाठी तळ ठाेकून बसले होते ती हंगल विधानसभेची जागा काँग्रेसने काबीज केली. महाराष्ट्रातील देगलूर पोटनिवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला झटका बसला होता. तेव्हा, दिवंगत काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून चव्हाणांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचीही प्रतिष्ठा राखली. दोन्ही काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपला विजय सोपा नाही, हे स्पष्ट झाले.

ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस आणखी दुबळी झालेली असताना रायगावची जागा पक्षाने जिंकली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा व तीन विधानसभा अशा चारही जागांवर भाजपला पराभूत केल्यामुळे उत्तर भारतात काँग्रेसमध्ये नवी उमेद निर्माण होईल, असा अंदाज आहे. लगतच्या पंजाब, उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हा विजय काँग्रेसला बळ देणारा ठरेल. खासकरून या टापूमध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले आंदोलन, वर उल्लेख केलेला महागाईचा मुद्दा तसेच कोरोना महामारीचा सामना करताना झालेला गोंधळ हे मुद्दे सरकारसाठी चिंतेचे ठरू शकतात. हरयाणातील ऐलनाबाद लोकसभा मतदारसंघात लोकदलाचे अभय चौताला यांचा विजयही महत्त्वाचा आहे.

लोकसभेच्या तीन जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशातील खंडवा हीच एक जागा टिकविता आली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृहजिल्हा असलेल्या मंडीमधील भाजपचा पराभव, दादरा-नगर हवेलीमधील शिवसेनेचा विजय राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरू शकतो. दादरा, नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांची मुंबईत धक्कादायक आत्महत्या, त्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी प्रशासकांवर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी कलाबेन यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांच्या रूपाने शिवसेनेने राज्याबाहेरचा पहिला खासदार लोकसभेत पाठवला. या निमित्ताने शिवसेनेने दिलेल्या ‘चलो दिल्ली’ घोषणेचे काय होते, हे पाहणे रंजक असेल.

टॅग्स :BJPभाजपाPetrolपेट्रोलElectionनिवडणूक