शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लसीवरून घूमजाव?; आश्वासनावर घूमजाव करण्याचा अधिकार सरकारला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:35 IST

लस घेण्यास जनता कितपत उत्सुक आहे याचाही पत्ता अद्याप लागलेला नाही. लस आली तरी आम्ही ती टोचून घेणार नाही असे ५९ टक्के नागरिकांनी गेल्याच आठवड्यात झालेल्या एका सर्वेक्षणात सांगितले.

जनमताला आपल्या बाजूने वळविण्याचे कौशल्य असलेला नेता अशी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे. जनतेशी ते सहज संवाद साधू शकतात, मग तो संवाद तथाकथित तज्ज्ञांना आवडो वा न आवडो. तज्ज्ञांनी खिल्ली उडविली तरी मोदी त्याला महत्त्व देत नाहीत. संवादाचे स्वसामर्थ्य ते जाणून आहेत. बिहार निवडणुकीत याचा अनुभव आला. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये यादव राजवटीतील गुंडाराजचा चतुराईने उपयोग करून मोदींनी महिलांची मते भाजपच्या बाजूने वळविली व बिहार राखले. मात्र मोदींचे हे संवाद चातुर्य भावनिक मुद्द्यांवर जितके परिणामकारक ठरते तितके आर्थिक वा सामाजिक मुद्द्यांवर ठरत नाही. नोटबंदीपासून सध्या सुरू असलेल्या कृषी सुधारणा कायद्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात मोदी सरकार कमी पडते असे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आणि वाढले. त्याचा फटका भाजपला बसला. संवाद साधण्यात मोदी आणि मोदी सरकार कमी पडले नसते, तर हे आंदोलन एवढे पेटले नसते.  

कोविड लस हे या यादीतील नवे उदाहरण. ही लस लवकरच मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ऑक्झफर्ड लसीच्या गुणवत्तेवरून चेन्नईतील नागरिकाने केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे काल सरकार व तज्ज्ञांतर्फे जाहीर करण्यात आले व लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला. कोविशिल्ड या लसीबाबत अशी समाधानकारक बातमी देत असतानाच कोविड लस सर्वांना मिळेल असे आश्वासन सरकारने कधी दिलेच नव्हते असे वक्तव्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केले व नवा वाद ओढवून घेतला. लस सर्वांना मोफत मिळेल असे आश्वासन केंद्र सरकारतर्फे बिहार निवडणुकीच्या प्रचारात देण्यात आले होते. ते खोडून काढणारे विधान आरोग्य सचिवांनी केले. लस आली तरी देशातील प्रत्येक नागरिकाला ती देण्याची जबाबदारी केंद्र सरकार झटकीत आहे अशी समजूत या वाक्यातून होते. आरोग्य सचिव हे आरोग्य खात्यातील सर्वोच्च पद आहे. आरोग्याची धोरणे ठरविण्याचे अधिकार या पदावरील व्यक्तीला आहेत. लस प्रत्येकाला देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते असे आरोग्य सचिव म्हणत असतील तर ते एकप्रकारे सरकारचेच वक्तव्य होते.

बिहार निवडणुकीत मते मिळविण्यासाठी कोविड लसीचा उपयोग करून घेण्यात आला व आता निवडणूक संपल्यावर सरकार स्वतःच दिलेल्या आश्वासनाला बांधील राहात नाही, अशी टीका करण्याची संधी आरोग्य सचिवांनी विरोधी पक्षांना आयती उपलब्ध करून दिली. आरोग्य सचिवांच्या वक्तव्यावर आयसीएमआर व अन्य तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच पत्रकार परिषदेत केलेली टिपण्णी पाहिली तर हा मुद्दा सर्वांना लस देण्याच्या बांधीलकीचा नसून ‘प्रत्येकाला लस आवश्यक असेल का?’ असा आहे हे लक्षात येते. आयसीएमआरचे प्रमुख डॉ. भार्गव म्हणाले की, कोविड संसर्गाची साखळी तोडणे याला प्राधान्य देण्यात आले आहे. भारताच्या संपूर्ण लोकसंख्येतील एका विशिष्ट संख्ये इतक्या लोकांना लस टोचली गेल्यावर जर संसर्गाची साखळी तुटली तर प्रत्येक नागरिकाला लस देण्याची आवश्यकता राहणार नाही, असा भूषण यांच्या विधानाचा अर्थ आहे, असा खुलासा भार्गव यांनी केला.

केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य व मान्यवर डॉक्टर गुलेरिया यांनीही असेच मत व्यक्त केले. कोराेना होऊन गेलेल्या व्यक्तींना लस देणे आवश्यक ठरणार नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. लस किती परिणामकारक ठरेल हेही अद्याप निश्चितपणे कळलेले नाही.  हे खुलासे ठीक असले तरी आरोग्य सचिवांनी जबाबदारीचे भान ठेवून विधान करायला हवे होते. तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार लस कोणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम ठरविता येईल, असे ते म्हणाले असते तर वाद निर्माण झाला नसता. साथ प्रतिबंधक लस मिळणे या विषयावर निर्विकारपणे मते देऊन चालणार नाही. मुळात रोज १५ लाख लोकांना लस टोचली तरी संपूर्ण भारताला लस मिळण्यास अडीच वर्षे लागतील. प्रशासनाचा कस पाहणारा हा मामला आहे.  लस घेण्यास जनता कितपत उत्सुक आहे याचाही पत्ता अद्याप लागलेला नाही. लस आली तरी आम्ही ती टोचून घेणार नाही असे ५९ टक्के नागरिकांनी गेल्याच आठवड्यात झालेल्या एका सर्वेक्षणात सांगितले. कोविडची धास्ती कमी होत चालल्याचा हा दाखला आहे. हा दाखला खरा मानला तरी दिलेल्या आश्वासनावर घूमजाव करण्याचा अधिकार सरकारला नाही. मोदी सरकारकडून याबाबत त्वरित स्पष्टीकरणाची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी