शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

संपादकीय - शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 06:30 IST

काँग्रेस आघाडी सरकारने स्वामीनाथन आयाेगाची स्थापना केली हाेती. त्याच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत

ऐंशीच्या दशकामध्ये शरद जाेशी यांनी शेतकऱ्यांना संघटित करून बिगरराजकीय चळवळ सुरू केली. प्रत्येक शेतमालाला किमान आधारभूत भाव देण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली हाेती. विकासाच्या नावाखालील सर्व याेजना बंद करा, ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या हातात पैसा येऊ द्या, विकासाची सर्व कामे गावकरीच करतील, अशी भूमिका ते मांडत हाेते. शेती ताेट्यात जाते, कारण उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नाही म्हणून. शेतात राब राब राबूनही उत्पादित मालाला भाव न मिळणे, शेतमालाच्या उत्पादकांपेक्षा दलालच गब्बर होणे, ज्यावेळी चार पैसे हातात येतील असे वाटत असते, नेमके त्याचवेळी त्यांच्या हातातोंडाचा घास ओरबाडला जाणे आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे हे शेतकरीवर्गाचे जुने दुखणे आहे. त्यावर आजवर काेणत्याही राजकीय पक्षांच्या सरकारने समाधानकारक उत्तर शाेधलेले नाही. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांनी शेतमालाच्या उत्पादन खर्चावर दीडपट रक्कम आधारभूत किंमत ठरवून ती जाहीर केली जावी, अशी शिफारस केली होती. स्वामीनाथन समितीच्या अहवालातील शिफारशी सरकार स्वीकारत नाही आणि त्याच्या अंमलबजावणीसाठीची यंत्रणा कशी उभी करावी, यावर निर्णय हाेत नाही. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश; तसेच राजस्थानातील गहू, तांदूळ उत्पादक शेतकरी ‘चलाे दिल्ली’चा नारा देऊन सरकारला हाच निर्णय घेण्याचा आग्रह धरत आहेत.

काँग्रेस आघाडी सरकारने स्वामीनाथन आयाेगाची स्थापना केली हाेती. त्याच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. काँग्रेस आघाडीचा पराभव करण्यासाठी प्रचार करताना भाजपने स्वामीनाथन आयाेगाच्या शिफारशीप्रमाणे शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले; पण सत्तेवर येऊन दहा वर्षे झाली तरी निर्णय घेतला नाही. आता शेतकऱ्यांनी जाेरदार तयारी करून आंदाेलनाचा रेटा लावला आहे. केंद्र सरकारने हे आंदाेलन माेडीत काढण्याच्या इराद्याने दिल्ली शहरात येणारे रस्ते अडविले आहेत. रस्त्यावर खिळे ठाेकले आहेत, बॅरिकेड्स लावले आहेत, रस्ते खाेदून अडथळे उभारले आहेत. एवढेच नव्हे, तर आंदाेलनात भाग घेणाऱ्यांना विविध प्रकारे धमकावण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचे तीन मंत्री शेतकऱ्यांच्या नेत्यांसाेबत चर्चाही करीत आहेत. सरकारने चर्चाच केली नाही, असा आक्षेप काेणी घेऊ नये, यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांपैकी शेतीमालाला हमीभावाची गॅरंटी द्यावी, हीच प्रमुख मागणी सरकार फेटाळते आहे आणि चर्चा पुढे सरकत नाही. हमीभावाची मागणी घेऊन गेल्या चार दशकांहून अधिक काळ शेतकरी लढा देत आहेत. विद्यमान सरकारच्या राजकीय पक्षांच्या विराेधातील असंताेष म्हणून विराेधी पक्षही शेतकऱ्यांच्या आंदाेलनास पाठिंबा देतात; पण तेच पक्ष सत्तेवर येताच शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी विसरून जातात.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील हमीभाव देण्याची, तसेच स्वामीनाथन आयाेगाच्या शिफारशी स्वीकारण्याचे आश्वासन दिले आहे. सद्य:स्थितीत तरी या प्रश्नांवर सत्ताधारी गॅरंटी देतील असे वाटत नाही. दरम्यान, लाेकसभेची निवडणूक लवकरच जाहीर हाेणार आहे. ती जाहीर हाेताच आचारसंहितेमुळे काेणताही निर्णय घेता येणार नाही. निवडणूक आयाेगाची खास परवानगी घेेऊन निर्णय घेण्याची साेय आहे; पण त्यासाठी सरकार पुढाकार घेईल, असे वाटत नाही. किमान आधारभूत भाव देण्याचा कायदा केला तर ताे न देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. कायद्यानेच हमीभावाचे बंधन आले तर शेतमालाला किमान आधारभूत भाव देण्याची गॅरंटी देता येईल, अशी तरतूद करणारा कायदा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. कापूस, साेयाबीन, खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत भाव मिळत नाही, ही सार्वत्रिक तक्रार आहे. याशिवाय इतर मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करताना दिसत नाही. दाेन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी आंदाेलन केले तेव्हा दाखल करण्यात आलेले गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याची मागणी महत्त्वाची आहे. हिंसक कारवायांशिवाय देशद्राेहापर्यंतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते लढविताना शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास हाेताे. शेतकरी आंदाेलकांना हमीभावाची गॅरंटी देण्याची तयारी सरकारच्या पातळीवर दिसत नाही. शेतकरीदेखील मागे हटण्याची शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत निवडणुका जाहीर झाल्या तर चर्चा हाेण्याची शक्यताही नाही. अशावेळी हमीभावाची गॅरंटी काेणी घ्यायची, हा प्रश्न अनुत्तरितच राहताे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली