शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

संपादकीय: ‘डेटा’ची सरकारी राखणदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 08:19 IST

मोबाइल अथवा अलेक्सासारख्या डिव्हाईसचा वापर करणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून त्यांचे जगणे प्रभावित करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

संपूर्ण मानवी विश्व व्यापून टाकणाऱ्या इंटरनेटसारख्या संवादी आणि संपर्क माध्यमाने मानवी जीवनात एकूणच क्रांतिकारक बदल घडवून आणले असले तरी या माध्यमाने आपल्या खासगी आयुष्यात शिरकाव केल्याने अनेक प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत. मानवी क्रिया, प्रतिक्रिया, वर्तनावर सातत्याने निगराणी आणि नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या या जगड्व्याळ अशा महाजालावर आता अंकुश ठेवला पाहिजे, असा सूर जगभर उमटू लागला आहे. चीनसारख्या राष्ट्राने तर याआधीच आपल्याभोवती चिरेबंदी भिंतीसारखी ‘डिजिटल वॉल’ उभारून माहितीच्या अदान-प्रदानास अटकाव केला आहे. गुगलसारखे लोकप्रिय सर्च इंजिन अथवा फेसबुक, ट्विटर आदी डिजिटल प्लॅटफॉर्म्सना ही भिंत ओलांडून ‘आत’ प्रवेश नाही. चीनच्या एकूण स्वभावाला ते साजेसेच; परंतु आता लोकशाहीवादी राष्ट्रेदेखील यासाठी पावले उचलत आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमे, इंटरनेट जोडणी पुरविणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि ॲमेझॉन आदी व्यावसायिक माध्यमांनी वापरकर्त्यांचा डेटा परस्पर विकून करोडो रुपयांची कमाई केल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. शिवाय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करून या तंत्रज्ञानाने आपल्या खासगी आयुष्यातदेखील प्रवेश केला.

मोबाइल अथवा अलेक्सासारख्या डिव्हाईसचा वापर करणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून त्यांचे जगणे प्रभावित करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती म्हणून आजवर आपण ते गोड मानून घेतले. मात्र, आता डोक्यावरून पाणी जाण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, परवा लोकसभेत मंजूर झालेले ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल २०२३’ महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे  विधेयक आणण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सरकार प्रयत्नशील होते. मात्र, हे विधेयक येण्यास अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय  कारणीभूत ठरला. गोपनीयतेचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच निवाड्याचा हवाला देत, गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत नागरिकांचा डेटा गोळा करणे, संग्रहित करणे आणि वापरणे यासाठी इंटरनेट कंपन्या, मोबाइल ॲप्स आणि व्यावसायिक कंपन्यांना अधिक जबाबदार बनविण्याच्या उद्देशानेच हे विधेयक आणल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

व्यक्तिगत माहितीच्या आडून राष्ट्रहिताला बाधा पोहोचविण्याचे धाडस कोणी करू नये, म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आला आहे. त्यासाठीच विधेयकातील तरतुदींचा भंग करणाऱ्या कंपन्यांना २५० कोटी रुपये, असा जबर दंड आकारण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाले असले तरी, अनेकांच्या मनात त्याबद्दल काही किंतु-परंतु मात्र जरूर आहेत. एक म्हणजे, सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा होऊ न देता हे विधेयक मंजूर करून घेतले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. मात्र, त्यादेखील फेटाळून लावण्यात आल्या. देशातील करोडो नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित विषय असल्याने  हे विधेयक पुनर्विलोकनासाठी  संयुक्त संसदीय समितीकडे सोपवावे आणि त्यावर सखोल चर्चा, मंथन झाल्यानंतर मगच ते मंजूर करावे, अशी विरोधकांची मागणी होती. तीदेखील अमान्य करण्यात आली. सरकारने हे विधेयक मंजूर करून घेताना जी घाई केली, त्यावरून सरकारच्या हेतूविषयीच शंका उपस्थित केली जात आहे. माहितीचा अधिकार हादेखील नागरिकांच्या मूलभूत अधिकारात मोडतो. या विधेयकाच्या आडून सरकार आता माहिती अधिकार कायद्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

एडिटर्स गिल्ड, या देशभरातील संपादकांच्या संघटनेनेदेखील हीच शंका उपस्थित केली आहे. या विधेयकामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक हितांसाठी वृत्तांकन करताना पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टचा अडसर ठरू शकतो. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती मिळेलच, याची शाश्वती नसते. तिथेही गोपनीयतेचे कारण पुढे करून माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. लोकसभेत मंजूर झालेल्या या ‘डेटा प्रोटेक्शन’ विधेयकावर राज्यसभा आणि नंतर राष्ट्रपतींची मोहोर उमटल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे, हे खरेच. मात्र ही राखणदारी मूळ मालकाच्या मुळावर येऊ नये म्हणजे झाले!