शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
4
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
5
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
6
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
7
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
8
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
9
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
10
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
12
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
13
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
14
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
15
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
16
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
17
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
18
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
19
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
20
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली

जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर...अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:26 IST

आनंदवनातील वेदना, मुक्या प्राण्यांना लळा लावणाऱ्या कुटुंबाने नैराश्य व ताणतणावाचा सामना करणाऱ्या कर्तबगार लेकीची काळजी घेऊ नये? म्हणतात ना, अधिक दु:खी असलेल्या इतरांकडे पाहा म्हणजे स्वत:चे दु:ख हलके होईल.

‘श्रृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई; दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही’, असे सांगत ज्यांनी चंद्रपूरजवळ वरोऱ्याच्या माळरानावर आनंदवन फुलवले, आसवे अन् अंगाराचा शृंगार साकारला, समाजाने टाकून दिलेल्या कुष्ठरोगी माणसांना छातीशी कवटाळले, पांगळ्यांना पत्थराहून कणखर बनवले त्या कर्मयोगी बाबा आमटेंच्या नातीने, महारोगी सेवा समितीच्या ‘सीईओ’ डाॅ. शीतल आमटे यांनी कसलेसे नैराश्य, कसले तरी वाद व मानसिक तणावाखाली विषारी इंजेक्शनची सुई टोचून घेऊन आत्महत्या करावी? छे...! जेमतेम चाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाच जागतिक क्षितिजावर पावले उमटलेल्या तरुण कार्यकर्तीचे हे पाऊल कुणालाच रुचलेले नाही. स्वत: पेशाने डाॅक्टर,  त्या जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर... अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

मुक्या प्राण्यांना लळा लावणाऱ्या कुटुंबाने नैराश्य व ताणतणावाचा सामना करणाऱ्या कर्तबगार लेकीची काळजी घेऊ नये? म्हणतात ना, अधिक दु:खी असलेल्या इतरांकडे पाहा म्हणजे स्वत:चे दु:ख हलके होईल. ज्या दु:खी, दुबळ्या, नात्यागोत्यांनी अव्हेरलेल्या अभागी जिवांचा सांभाळ आनंदवनात होतो, तिथे डाॅ. शीतलने डोळसपणे अवतीभोवती पाहिले असते तरी खूप होते ना ! डाॅ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हळहळतो आहे. अर्थात, ते साहजिकच आहे. जागोजागी उभ्या राहिलेल्या, राहणाऱ्या सेवाभावी संस्था, समाजसेवक व कार्यकर्त्यांची कुटुंबे, त्या संस्थांना हातभार लावणारे श्रम व धनयोगी, संस्था मोठ्या होत असल्याचे पाहून समाजाच्या चांगुलपणाला मनोमन सलाम करणारा सामान्य माणूस अशा सगळ्यांसाठीच डाॅ. शीतल आमटे यांची ही आत्महत्या धक्कादायक आहे. केवळ आनंदवनच नव्हे तर अवघा महाराष्ट्र शोकाकुल आहे.

मुळात आनंदवनसारख्या संस्था हे समाजाचे संचित असते. रंजल्यागांजल्यांची काळजी बुद्धाच्या करुणेशी, गांधींच्या प्रेमभावनेशी तादात्म्य असते. ‘व्यवस्था जिथे कमी, तिथे आम्ही’ म्हणणे हा व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार असतो. शेकडो सेवाभावींनी घरादारावर तुळशीपत्रे ठेवून, रात्रीचा दिवस करून, घाम गाळून फुलवलेले नंदनवन कोलमडून पडणाऱ्यांना उभारीच देते. अशा मंतरलेल्या परिसरांमध्ये आत्मघात होत नाहीत; नवनिर्मिती होते, उज्ज्वल भविष्य अंकुरते,  नवोन्मेष साकारतात. अवघ्या काही वर्षांच्या सार्वजनिक जीवनात किंवा अलीकडे सोशल मीडियातून डाॅ. शीतल आमटे-करजगी यांचे जे महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्त्व समोर आले, ते आनंदवन, हेमलकसा किंवा सोमनाथ प्रकल्पांची स्थापना व वाटचालीतील त्यागाशी, ध्येयवादाशी, समर्पणाच्या भावनेशी मिळतेजुळते होतेच असे नाही. आत्मविश्वास, फारतर आक्रमकता व आक्रस्ताळेपणा यातील रेघ अगदी बारीक असते, हे त्यांच्या लक्षात आले नसेल.

धावणारा जिंकतोच असे नाही, पण कुठे थांबायचे हे ज्याला कळते त्याची जिंकण्याची शक्यता अधिक असते, हेही कळले नसेल. पण, हा दुर्विलास कोणत्याही सामाजिक संस्थांमध्ये कधी तरी येतोच. महापुरुषांच्या पुढच्या पिढ्या तितक्या उंचीच्या असत नाहीत. मोठ्या वृक्षाखाली वाढलेले छोटे वृक्ष डेरेदार बनत नाहीत. फक्त सावल्या मोठ्या होतात. डाॅ. शीतल आमटे यांना म्हणे आनंदवन हे ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचे होते, तिथल्या दुबळ्या माणसांनी वर्षांनुवर्षे चालवलेल्या व्यवसायांना आधुनिकतेचे अंगडे-टोपडे घालायचे होते. सेवाभावी संस्थेला ‘कार्पोरेट टच’ द्यायचा होता. जगभर जायचे होते. काळासोबत बदलताना हे करावेच लागते. त्याला कुणाचा विरोध असायचे कारण नाही. पण, माणसांचे मोठेपण ते इतरांना सोबत घेऊन चालण्यावर ठरते.

नव्या कल्पना जुन्या कारभाऱ्यांना पटवून देणे, त्यांना शत्रू नव्हे तर सहकारी मानणे, सोबत घेणे, महत्त्वाचे म्हणजे विश्वस्त व मालक यामधील फरक समजून घेणे, हादेखील व्यवस्थापनाचा भाग असतोच ना ! सामाजिक काम हे प्रसिद्धीपासून दूर तपश्चर्येसारखे करायचे असते. सतत व्यक्त व्हायला लावणाऱ्या सोशल मीडियामुळे डाॅ. शीतल यांना कदाचित हा अनुभव मिळाला नसावा, की सार्वजनिक आयुष्यात टीका होणार, चुकांवर बोट ठेवले जाणारच. कशाला प्रतिक्रिया द्यावी व कशाला नाही, हे तारतम्य महत्त्वाचे. आमटे कुटुंबातील अंतर्गत कलहावर होणारी चर्चाही निरर्थकच आहे. मुळात, अशा संस्थांवर मालकी असलीच तर कुटुंबांची नव्हे, समाजाची असते. ते भान राहिले नाही की अशा वादाचा शेवट शोकात्म होतो.

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेSuicideआत्महत्या