शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

संपादकीय - इथे' तरी राडा नको, राजकीय खेळखंडोबा सभागृहात नकोच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 9:23 AM

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना बसलेला हादरा आणि अलीकडे अजित पवार यांच्या बंडाने शरद पवार यांना दिलेला दणका

राज्याच्या राजकारणात जो राडा सुरू आहे त्याचे प्रतिबिंब विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उमटू नये आणि लोकहिताच्या चार गोष्टींवर चर्चा आणि निर्णय व्हावेत, अशी माफक अपेक्षा सत्ताधारी अन् विरोधकांकडूनदेखील आहे. तीन पक्षांचे मजबूत सरकार आणि विरोधकांची आणखीच रोडावलेली संख्या असे अधिवेशनातील चित्र राहील. सत्तापक्षाला घेरण्याचे मोठे आव्हान विरोधकांसमोर असेल. त्यासाठीचे ऐक्य महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दाखविले तरच सरकारची कोंडी करता येईल. अवघ्या ऐंशीच्या घरात असलेल्या विरोधकांच्या संख्याशक्तीला २०० पेक्षा अधिक असलेल्या बलाढ्य शक्तीचा सामना अधिवेशनात करायचा आहे. तो करताना विरोधकांकडे चेहरा नाही. विरोधी पक्षनेताच सत्तेत सहभागी झाल्याने ते पद सध्या रिकामे आहे. संख्याबळाचा विचार करता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जायला हवे, पण त्यातही अडथळे आहेत. काँग्रेसमध्ये एका रात्रीतून काहीही ठरत नसते. आधी त्यांना नाव ठरवावे लागेल, नंतरच विधानसभा अध्यक्षांच्या मान्यतेने बारसे होईल.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना बसलेला हादरा आणि अलीकडे अजित पवार यांच्या बंडाने शरद पवार यांना दिलेला दणका, त्यातून या दोन दिग्गज नेत्यांसोबत बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिलेले आमदार आणि ताळमेळ नसलेली कॉंग्रेस अशी आजची विरोधकांची अवस्था आहे जाहीर सभांची वज्रमूठ ढिली झाली आहे; विधिमंडळात तरी ती दिसावी. विधानपरिषदेच्या सभापतींची निवड या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. भाजपला हे पद हवे आहे आणि शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या साथीने ते मिळविणे त्यांना सहज शक्यदेखील आहे. परिषदेत शिवसेनेकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा डोळा आहे. दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदावरून उरल्यासुरल्या महाविकास आघाडीत लठ्ठालठ्ठी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यातील अंतर्विरोध प्रकर्षाने समोर यावा ही सत्तापक्षाची रणनीती असेल. दोघांत तिसरा आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीसारखे सहज वाटत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यागाच्या भूमिकेत आहेत. भावनिक मित्र शिवसेना आणि राजकीय मित्र राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन लोकसभेच्या मिशन ४२ चे लक्ष्य निश्चित केलेले फडणवीस हेच या सरकारचे मुख्य खांब असून, तीन पक्षांची ग्रेट महायुती सर्कस चालविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, वित्त खाते हातात आलेले अजित पवार मित्रपक्षांनाच दाबतील की काय, अशी भीती अनेकांना सतावत आहे. राष्ट्रवादीमुळे आपली संधी हुकल्याची सल भाजप-शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याने सत्तापक्षांमध्येही परस्पर संशयाचे वातावरण आहे. सत्तापक्षाकडे राक्षसी बहुमत आहे, पण सरकारची घडी नीट बसलेली नाही.. सत्तेमुळे समाधानी असलेल्यापेक्षा असंतुष्टांची अधिक संख्या असणे हे त्यामागचे प्रमुख कारणा या अधिवेशनात एक विचित्र दृश्य बघायला मिळेल. कालपर्यंत शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध कंठशोष करणारे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे आता सरकारचे गोडवे गाताना दिसतील. सत्तेची फळे चाखण्यासाठी तत्त्वांना किंवा वर्षानुवर्षे घेतलेल्या भूमिकांना स्वहस्ते तिलांजली देणारी नेत्यांची जमात आज ठिकठिकाणी दिसते. 

पुरोगामित्वाचा बुरखा घालून जातीयवादी, मनुवादी म्हणून ज्यांना कालपर्यंत हिणवले त्यांच्याशी सत्तेत सलगी केल्यानंतर दुसरे काय होणार? भ्रष्टाचान्यांना धुऊन स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन म्हणून ज्या भाजपवर कालपर्यंत टीकास्त्र सोडण्याची एकही संधी गमावली नाही, त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला परमस्वच्छ करवून घेणारे राष्ट्रवादीचे नेते व त्यांचे समर्थक आमदार सत्तारुढ बाकांवर तोपर्यंत बसलेले दिसतील. राजकारण्यांनी २०१९ पासून एकमेकांशी नळावरल्या भांडणासारखे वाद घालून, टोकाची टीका करून तसेही महाराष्ट्राचा खूप वेळ खाल्ला आहे. बिनपैशांच्या या तमाशाला आता जनता पार कंटाळली आहे. नेतेमंडळीना त्यांच्याशी काहीही घेणे-देणे नसून त्यांनी एकमेकांचे कपडे फाडणे सुरूच ठेवले आहे. तेव्हा झाले ते खूप झाले. आता आम्ही नवीन सुरुवात करत आहोत. यापुढे आम्ही समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करू आणि त्याच्या हिताचेच निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याला देण्याची उत्तम संधी सत्ताधारी व विरोधकांनाही चालून आली आहे. त्या संधीचा उपयोग करून लोकहिताची चर्चा आणि लोकहिताचे निर्णय होतील, गोंधळ, आरडाओरडा, राडा, हेत्वारोप होणार नाहीत, याची वाट सर्वसामान्य माणूस पाहत आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMumbaiमुंबईnagpurनागपूर