शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - इथे' तरी राडा नको, राजकीय खेळखंडोबा सभागृहात नकोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 09:24 IST

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना बसलेला हादरा आणि अलीकडे अजित पवार यांच्या बंडाने शरद पवार यांना दिलेला दणका

राज्याच्या राजकारणात जो राडा सुरू आहे त्याचे प्रतिबिंब विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उमटू नये आणि लोकहिताच्या चार गोष्टींवर चर्चा आणि निर्णय व्हावेत, अशी माफक अपेक्षा सत्ताधारी अन् विरोधकांकडूनदेखील आहे. तीन पक्षांचे मजबूत सरकार आणि विरोधकांची आणखीच रोडावलेली संख्या असे अधिवेशनातील चित्र राहील. सत्तापक्षाला घेरण्याचे मोठे आव्हान विरोधकांसमोर असेल. त्यासाठीचे ऐक्य महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दाखविले तरच सरकारची कोंडी करता येईल. अवघ्या ऐंशीच्या घरात असलेल्या विरोधकांच्या संख्याशक्तीला २०० पेक्षा अधिक असलेल्या बलाढ्य शक्तीचा सामना अधिवेशनात करायचा आहे. तो करताना विरोधकांकडे चेहरा नाही. विरोधी पक्षनेताच सत्तेत सहभागी झाल्याने ते पद सध्या रिकामे आहे. संख्याबळाचा विचार करता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जायला हवे, पण त्यातही अडथळे आहेत. काँग्रेसमध्ये एका रात्रीतून काहीही ठरत नसते. आधी त्यांना नाव ठरवावे लागेल, नंतरच विधानसभा अध्यक्षांच्या मान्यतेने बारसे होईल.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना बसलेला हादरा आणि अलीकडे अजित पवार यांच्या बंडाने शरद पवार यांना दिलेला दणका, त्यातून या दोन दिग्गज नेत्यांसोबत बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिलेले आमदार आणि ताळमेळ नसलेली कॉंग्रेस अशी आजची विरोधकांची अवस्था आहे जाहीर सभांची वज्रमूठ ढिली झाली आहे; विधिमंडळात तरी ती दिसावी. विधानपरिषदेच्या सभापतींची निवड या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. भाजपला हे पद हवे आहे आणि शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या साथीने ते मिळविणे त्यांना सहज शक्यदेखील आहे. परिषदेत शिवसेनेकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा डोळा आहे. दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदावरून उरल्यासुरल्या महाविकास आघाडीत लठ्ठालठ्ठी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यातील अंतर्विरोध प्रकर्षाने समोर यावा ही सत्तापक्षाची रणनीती असेल. दोघांत तिसरा आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीसारखे सहज वाटत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यागाच्या भूमिकेत आहेत. भावनिक मित्र शिवसेना आणि राजकीय मित्र राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन लोकसभेच्या मिशन ४२ चे लक्ष्य निश्चित केलेले फडणवीस हेच या सरकारचे मुख्य खांब असून, तीन पक्षांची ग्रेट महायुती सर्कस चालविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, वित्त खाते हातात आलेले अजित पवार मित्रपक्षांनाच दाबतील की काय, अशी भीती अनेकांना सतावत आहे. राष्ट्रवादीमुळे आपली संधी हुकल्याची सल भाजप-शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याने सत्तापक्षांमध्येही परस्पर संशयाचे वातावरण आहे. सत्तापक्षाकडे राक्षसी बहुमत आहे, पण सरकारची घडी नीट बसलेली नाही.. सत्तेमुळे समाधानी असलेल्यापेक्षा असंतुष्टांची अधिक संख्या असणे हे त्यामागचे प्रमुख कारणा या अधिवेशनात एक विचित्र दृश्य बघायला मिळेल. कालपर्यंत शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध कंठशोष करणारे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे आता सरकारचे गोडवे गाताना दिसतील. सत्तेची फळे चाखण्यासाठी तत्त्वांना किंवा वर्षानुवर्षे घेतलेल्या भूमिकांना स्वहस्ते तिलांजली देणारी नेत्यांची जमात आज ठिकठिकाणी दिसते. 

पुरोगामित्वाचा बुरखा घालून जातीयवादी, मनुवादी म्हणून ज्यांना कालपर्यंत हिणवले त्यांच्याशी सत्तेत सलगी केल्यानंतर दुसरे काय होणार? भ्रष्टाचान्यांना धुऊन स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन म्हणून ज्या भाजपवर कालपर्यंत टीकास्त्र सोडण्याची एकही संधी गमावली नाही, त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला परमस्वच्छ करवून घेणारे राष्ट्रवादीचे नेते व त्यांचे समर्थक आमदार सत्तारुढ बाकांवर तोपर्यंत बसलेले दिसतील. राजकारण्यांनी २०१९ पासून एकमेकांशी नळावरल्या भांडणासारखे वाद घालून, टोकाची टीका करून तसेही महाराष्ट्राचा खूप वेळ खाल्ला आहे. बिनपैशांच्या या तमाशाला आता जनता पार कंटाळली आहे. नेतेमंडळीना त्यांच्याशी काहीही घेणे-देणे नसून त्यांनी एकमेकांचे कपडे फाडणे सुरूच ठेवले आहे. तेव्हा झाले ते खूप झाले. आता आम्ही नवीन सुरुवात करत आहोत. यापुढे आम्ही समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करू आणि त्याच्या हिताचेच निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याला देण्याची उत्तम संधी सत्ताधारी व विरोधकांनाही चालून आली आहे. त्या संधीचा उपयोग करून लोकहिताची चर्चा आणि लोकहिताचे निर्णय होतील, गोंधळ, आरडाओरडा, राडा, हेत्वारोप होणार नाहीत, याची वाट सर्वसामान्य माणूस पाहत आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMumbaiमुंबईnagpurनागपूर