शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

IPL: चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला 'हा' संघ यंदा IPL चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 06:49 IST

IPL Match 2021: व्यंकटेश अय्यरच्या समावेशानंतर केकेआरमध्ये नवी ऊर्जा संचारली. शिवम मावीची गोलंदाजी धडकी भरविणारी ठरली, तर शुभमन गिल फलंदाजीत सतत धडाका करीत आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रातील ‘प्ले ऑफ’चे चार संघ निश्चित झाले आहेत. दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता संघ. याच क्रमाने ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान निश्चित करतील. तथापि, आयपीएल चाहत्यांसाठी सर्वांत मोठी धक्का देणारी बाब ठरली ती पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी. हा संघ यंदा अव्वल चार संघात पोहोचू शकला नाही.  हा जगभरातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो. पाच वेळा चषक उंचावणाऱ्या मुंबईला यंदा जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण करण्याची संधी होती. रोहित शर्मा हा मुंबईचा कर्णधार आहे. विराट कोहलीनंतर भारताचे नेतृत्व करण्यास सक्षम खेळाडू या नात्याने त्याच्याकडे पाहिले जाते. अशावेळी मुंबई संघाचे साखळी फेरीतच बाहेर पडणे चाहत्यांना निराश करणारे आहे. मुंबईच्या कामगिरीवर नजर टाकल्यास हा संघ यूएईत पोहोचल्यानंतर त्याची कामगिरी ढेपाळत गेली.

प्ले ऑफपर्यंत ज्या लढती झाल्या त्यात एकदाही मुंबईच्या खेळाडूंकडून शतकी खेळी झाली नाही. या संघात रोहितसह किरोन पोलार्ड, इशान किशन, क्विन्टन डिकॉक, हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू असे दिग्गज असताना मोठी धावसंख्या उभारणे मुंबईला कठीण गेले. गोलंदाजांबाबत सांगायचे तर जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पांड्या बंधू प्रभावहीन जाणवले. दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईला यंदा त्यांच्या हुकमी खेळाडूंनीच गंडवले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीपर्यंत त्यांना ‘चमत्कार’ आणि ‘नशिबाची साथ’ यामुळे इथंपर्यंत येता आले. डिकॉकनंतर एकटा पोलार्ड लढला; मात्र सूर्यकुमार, इशान किशन या मधल्या फळीने दगा दिला. धावगती ढेपाळण्याचे हे मोठे कारण आहे. केवळ मोठमोठी नावे पुरेशी नाहीत. त्यांच्याकडून कामगिरीही होणे आवश्यक असते. याचे मोठे उदाहरण ठरले ते आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर. आवेश दिल्लीचा वेगवान गोलंदाज, तर व्यंकटेश केकेआरचा सलामीवीर. इंदूरच्या या दोन्ही खेळाडूंची कामगिरी अधोरेखित करणारी आहे. ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स मात्र लक्षवेधी ठरला.

दिल्लीची मुसंडी हे सकारात्मक संकेत ठरावेत. ऋषभला भारतीय संघाचे भविष्य मानले जाते. दोन- चार वर्षांनंतरचा कर्णधार या नात्याने अनेकजण ऋषभकडे बघतात. ऋषभने दिल्लीला ज्या पद्धतीने विजय मिळवून देत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर नेले, ते भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी उपयुक्त मानले पाहिजे. युवा कर्णधार म्हणून ऋषभचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. रविचंद्रन अश्विनवरून मोठा वाद झाला. इंग्लंड दौऱ्यात त्याला सर्वच सामन्यांत बाहेर ठेवण्यात आले. यूएईत आल्यानंतर त्याचा इयोन मोर्गनसोबत वाद झाला. त्यानंतरही  दिल्ली संघ  दमदार कामगिरीसह पुढे सरकला. सर्वच खेळाडूंनी सांघिक योगदान दिले. प्रश्न उरतो तो ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीला आयपीएलचे पहिले जेतेपद मिळविणार का? असे झाल्यास भारतीय क्रिकेटच्या हितासाठी तो शुभसंकेत ठरावा. प्ले ऑफमध्ये ज्या संघांनी धडक दिली त्यांच्या कर्णधारांचा विचार केल्यास सर्वांत आधी नाव येते ते धोनीचे. धोनीने टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसी स्पर्धांचे जेतेपद मिळवून दिले आहे. विराट कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला अनेक महत्त्वाच्या मालिका आणि सामने जिंकून दिले. इयोन मोर्गननेदेखील २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले आहे, असे असताना ऋषभ पंत तीनही दिग्गजांपुढे आपल्या संघाला अव्वल स्थानावर घेऊन आला आहे.

केकेआरच्या कामगिरीचीही दखल घ्यावीच लागेल. केकेआरने यूएईत आल्यानंतर सातपैकी पाच सामने जिंकले. ज्या पद्धतीने हा संघ खेळतो आहे, त्यावरून त्यांची कामगिरी चमत्कारिकच मानायला हवी. चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला हा संघ यंदा आयपीएल चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको. व्यंकटेश अय्यरच्या समावेशानंतर केकेआरमध्ये नवी ऊर्जा संचारली. शिवम मावीची गोलंदाजी धडकी भरविणारी ठरली, तर शुभमन गिल फलंदाजीत सतत धडाका करीत आहे. केकेआर संघ करिष्मा करण्यास सज्ज आहे. दुसरीकडे धोनी हा क्रिकेटमध्ये ‘जादूगार’ मानला जातो. विराट कोहलीचा संघदेखील पहिल्या जेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे. एकूणच काय, तर चारही संघ आयपीएलचा चषक उंचावण्यास उत्सुक आणि जिकिरीचे प्रयत्न करणार असल्याने आता नवा संघ चॅम्पियन बनेल यात शंका नाही.

टॅग्स :IPLआयपीएल २०२१Mumbai Indiansमुंबई इंडियन्सKolkata Knight Ridersकोलकाता नाईट रायडर्सRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरdelhi capitalsदिल्ली कॅपिटल्सChennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्स