शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

संघराज्यात अस्वस्थता! केंद्राने केलेल्या कायद्याच्या वैधतेस राज्य आक्षेप घेऊ शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:56 IST

अलीकडेच केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) सध्या देशभर सुरू असलेल्या वादंगात विरोधी सत्ता असलेल्या सात-आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा न राबविण्याचे जाहीर केले.

भारत अनेक घटकराज्यांचे मिळून संघराज्य आहे. या संघराज्यात केंद्र आणि घटक राज्यांच्या अधिकारांची निश्चित चौकट राज्यघटनेने ठरवून दिली आहे. केंद्रीय कायदेमंडळ आणि राज्यांचे विधिमंडळ या दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार असला तरी कोणकोणते कायदे करू शकेल याची विषयसूची राज्यघटनेच्या ७व्या परिशिष्टात दिलेली आहे. काही विषय दोघांमध्ये सामायिक आहेत. या व्यवस्थेनुसार केंद्राने केलेले कायदे राबविणे राज्यांना बंधनकारक आहे. केंद्रात व राज्यांत स्वतंत्र निवडणुकांनी स्वतंत्र लोकनियुक्त सरकारे स्थापन होतात. केंद्राने केलेला एखादा कायदा आम्हाला घटनाबाह्य वाटतो म्हणून आम्ही तो राबविणार नाही, अशी भूमिका कोणतेही घटकराज्य घेऊ शकत नाही. अलीकडेच केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) सध्या देशभर सुरू असलेल्या वादंगात विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सात-आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा न राबविण्याचे जाहीर केले. पण ही केवळ राजकीय भूमिका आहे.

केरळने यापुढे एक पाऊल टाकत विधानसभेने ‘सीएए’ रद्द करण्याची मागणी केली. पण तरीही केंद्राचा कायदा पाळण्याच्या बंधनातून सुटका होऊ शकत नाही, ही अडचण लक्षात घेऊन केरळने हा कायदा रद्द करून घेण्यासाठी केंद्राविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. पाठोपाठ छत्तीसगढनेही बुधवारी असाच दावा दाखल केला. पण छत्तीसगढचा दावा केंद्र सरकारने ११ वर्षांपूर्वी केलेल्या ‘एनआयए’ कायद्याच्या विरोधात आहे. सन २००८मध्ये हा कायदा केला तेव्हा केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ सरकार होते. आता छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, म्हणजेच काँग्रेसने आपल्याच पक्षाने केंद्रात केलेल्या कायद्याला आता इतक्या वर्षांनी का आव्हान द्यावे, हे अनाकलनीय आहे. या दोन दाव्यांमध्ये फरक असला तरी त्यांच्याकडे संघराज्यातील वाढत्या अस्वस्थतेचे प्रतीक म्हणूनच पाहावे लागेल. एखादा कायदा घटनाबाह्य ठरवून रद्द करून घेण्यासाठी नागरिकांना व्यक्तिश: उच्च वा सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करता येते. परंतु असंतुष्ट राज्यांना अशी सोय नाही.

यामुळेच केरळ व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांनी अनुच्छेद १३१चा आधार घेत दिवाणी दावा दाखल केला आहे. या अनुच्छेदानुसार केंद्र आणि राज्य किंवा राज्या-राज्यांमधील वादात असा दावा दाखल करता येतो व अशा दाव्यांचा निवाडा करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे. या दाव्यांच्या रूपाने राज्यघटनेतील काही त्रुटी समोर येत आहेत. शिवाय केंद्र व राज्यांमधील तंटे-बखेडे सोडविण्यासाठीची प्रस्थापित व्यवस्था पुरेशी व परिणामकारक आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो. मुळात केंद्राने केलेल्या कायद्याच्या वैधतेस राज्य आक्षेप घेऊ शकते का, हाही कळीचा मुद्दा आहे. केंद्रात एका पक्षाचे भक्कम बहुमताचे सरकार, पण राज्यांमध्ये मात्र विचारसरणीच्या दृष्टीने विळ्या-भोपळ्याचे नाते असलेली विरोधी पक्षांची सरकारे असा संमिश्र कौल सुज्ञ मतदार देत असतील तर केंद्र व राज्यांमध्ये असे संघर्षाचे प्रसंग वारंवार येणे क्रमप्राप्त आहे.

एक देश म्हणून सुरळीत कारभार चालण्यासाठी अशा धुमसत्या असंतोषाची मर्यादा ओलांडणार नाही यासाठी एखादा ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असणे नितांत गरजेचे आहे. अशा भांडणांत पंचाची भूमिका न्यायसंस्थेलाच बजवावी लागेल. पण त्यासाठी अनुच्छेद १३१अन्वये दिवाणी दावे दाखल करणे हा घटनासंमत मार्ग आहे का, हा मुद्दा अद्याप अनिर्णीत आहे. सन २०००मध्ये बिहार व मध्य प्रदेश या राज्यांचे विभाजन करून अनुक्रमे झारखंड आणि छत्तीसगढ ही दोन नवी राज्ये निर्माण केली गेली. त्यातून निर्माण झालेल्या वादात मध्य प्रदेश व बिहार या राज्यांनी असेच दावे दाखल केले. त्यात संसदेने केलेल्या राज्य पुनर्रचना कायद्यांना आव्हान दिले गेले होते. पण अनुच्छेद १३१नुसार राज्य अशा प्रकारे केंद्राच्या कायद्याला आव्हान देऊ शकते का, यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन खंडपीठांमध्ये मतभेद झाले. सध्या हा मुद्दा न्या. एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालीस तीन न्यायाधीशांच्या पीठापुढे प्रलंबित आहे. ‘सीएए’ला आव्हान देणाऱ्या अन्य रिट याचिकांसोबतच न्यायालयाने या मुद्द्यावरही लवकरात लवकर निर्णायक निकाल देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Indiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक