शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Editorial: कोरोनाच्या शेवटाची सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 07:28 IST

लसीकरणावर जोर कायमच ठेवावा लागणार , मास्क वापरावेच लागणार आणि शारीरिक अंतर राखण्याची दक्षता घ्यावीच लागणार आहे; कारण फ्लू अथवा स्पॅनिश फ्लूप्रमाणे कोविड-१९ हा आजारदेखील अवघ्या काही दिवसात सर्वसाधारण औषधांनी बरा होण्याची स्थिती निर्माण होण्यास अजून किमान एक वर्ष लागू शकते.

सुमारे तीन वर्षांपासून अवघ्या जगाला त्राही त्राही करून सोडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या अवताराने आता भारतातही हात-पाय पसरायला प्रारंभ केला आहे. रविवारी उपलब्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात एकाच दिवसात  २७ हजार ५५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि २८४ रुग्णांचा मृत्यू झाला. उर्वरित जगाशी तुलना केल्यास, भारतात सध्या तरी रुग्ण आणि मृत्यूची संख्या खूप कमी आहे; पण, अमेरिका व युरोपसारख्या विकसित भागांमध्येही कोरोनाने नव्याने हाहाकार माजविण्यास प्रारंभ केला आहे. नुकतीच कुठे जागतिक अर्थव्यवस्था सावरू लागली होती, तोच पुन्हा नव्याने ओमायक्रॉनच्या रूपाने संकट पुढ्यात उभे ठाकले आहे.

सुदैवाने जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओकडून एक दिलासादायक बातमी आली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रीयासस  यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ हे वर्ष कोविड-१९ महासाथीचे अखेरचे वर्ष सिद्ध होऊ शकते. सध्याच्या घडीला जगासाठी यापेक्षा अधिक आनंददायक वार्ता दुसरी कोणतीही असू शकत नाही. अर्थात डॉ. घेब्रीयासस यांनी दिलेली ही सुवार्ता विनाशर्त नाही. कोविड-१९ महासाथीचा अंत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असल्यास, विकसित देशांनी अविकसित देशांना मोठ्या प्रमाणात कोविड लसी पुरवायला हव्यात, असे डॉ. घेब्रीयासस यांचे म्हणणे आहे. यापूर्वी इतरही काही तज्ज्ञांनी, कोविड-१९ महासाथीच्या अंतासाठी ओमायक्रॉन विषाणू शिडीची पहिली पायरी सिद्ध होऊ शकतो, अशी आशा जागवली होती. कोरोना विषाणूचे आजवर जेवढे अवतार समोर आले आहेत, त्यामध्ये ओमायक्रॉन हा सर्वात वेगाने संसर्ग पसरवणारा अवतार आहे; परंतु इतर अवतारांच्या तुलनेत तो बराच कमी घातक आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने आणि मोठ्या प्रमाणात प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार होतात, असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळेच ओमायक्रॉनच्या माध्यमातून या महासाथीचा अंत घडवून आणता येईल, असा विश्वास संशोधकांना वाटू लागला आहे.

एका शतकापूर्वी अशाचप्रकारे जगाला विळखा घातलेल्या स्पॅनिश फ्लू या महासाथीचा अंतही अशाचप्रकारे झाला होता आणि आता तो एक अत्यंत सर्वसाधारण आजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच नजीकच्या भविष्यात कोविड-१९ हादेखील  घातक नसलेला सर्वसाधारण आजार म्हणून ओळखला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. कोणताही साथरोग येतो, तेव्हा त्यासाठी कारणीभूत ठरणारा विषाणू स्वत:मध्ये सातत्याने बदल घडवून आणत, नवी रूपे धारण करीत असतो.  त्या विषाणूमुळे बाधित व्यक्तींमध्ये त्या विषाणूसोबत लढण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रतिपिंड तयार होत असतात. लसदेखील शरीरात प्रतिपिंड तयार करण्याचेच काम करते. विषाणूची बाधा झाल्यामुळे अथवा लस घेतल्यामुळे प्रतिपिंड तयार झालेल्या व्यक्तींचे लोकसंख्येतील प्रमाण ६० ते ७० टक्क्यांदरम्यान पोहोचते, तेव्हा विषाणूची नवी रूपे सुरुवातीच्या अवतारांएवढी घातक राहत नाहीत आणि शेवटी साध्या औषधांनीही रुग्णांवर उपचार शक्य होतो. कोरोना आता त्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. काळजी करण्याची, दक्षता घेण्याची गरज संपली, असा त्याचा अर्थ नव्हे ! जोपर्यंत जगभरात हा आजार आटोक्यात येत नाही, तोपर्यंत सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागणार आहे.

लसीकरणावर जोर कायमच ठेवावा लागणार , मास्क वापरावेच लागणार आणि शारीरिक अंतर राखण्याची दक्षता घ्यावीच लागणार आहे; कारण फ्लू अथवा स्पॅनिश फ्लूप्रमाणे कोविड-१९ हा आजारदेखील अवघ्या काही दिवसात सर्वसाधारण औषधांनी बरा होण्याची स्थिती निर्माण होण्यास अजून किमान एक वर्ष लागू शकते. जग हे आता एक वैश्विक खेडे (ग्लोबल व्हिलेज) बनले आहे, असे आपण  म्हणतो;  कोविड-१९ महासाथीने त्याचा प्रत्यय आणून दिला . आज एखाद्या देशाने शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट जरी साध्य केले, तरी तो देश संपूर्णपणे कोविडच्या छायेतून मुक्त होऊ शकत नाही; कारण दररोज प्रत्येकच देशात जगभरातून हजारो प्रवासी येत असतात आणि त्यापैकी कोण कोरोना विषाणूचा नवा अवतार घेऊन येईल, याचा नेम नसतो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लसीकरण, हाच भीतीचा लवलेश शिल्लक न राहू देण्याचा खरा उपाय आहे. त्यासाठी विकसित देशांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. ते झाले तरच  जग या महासंकटावर मात करू शकेल!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना