शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 05:24 IST

विनेशबाबतीत झालेल्या चुका भाजपने आता तरी सुधारायला हव्यात. निवडणुकीच्या विजयाची वाट सोपी करणे, हा परिमार्जनाचा एक मार्ग असू शकतो!

अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, लोकमत

विनेश फोगटनेकाँग्रेस पक्षात प्रवेश करून हरयाणा विधानसभा निवडणुकीला उभे राहण्यावर भाजपकडून खरेतर प्रतिक्रिया यायला नको होती; पण ती आली. ऑलिम्पिकचे सुवर्णपदक असो वा नसो, भारतीय क्रीडा पटलावर विनेशचा चाहतावर्ग मोठा आहे. पॅरिसमध्ये पदक न मिळणे हे तिचे आणि भारताचे केवळ कमनशीब. उभा देश त्यावेळी पॅरिसवर नजर लावून होता. जागतिक स्तरावर आवश्यक असते तेवढी क्षमता किंवा कौशल्य तिच्याकडे नव्हते म्हणून तिचे पदक हुकले नाही; तर केवळ १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिची संधी गेली. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील एक पुढारी ब्रिजभूषण शरणसिंग यांनी मात्र नैतिकतेच्या नावाने तिच्यावर तोंडसुख घेतले. जणू ते आणि त्यांचे पक्ष सहकारी या सगळ्यांना विनेश अपात्र ठरल्याने आनंदाचे भरतेच आले होते.

भारतीय राजकारण असेच आहे. विनेशने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याबरोबर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील नेतेमंडळी यात पुढे होती. विनेशने राजकीय पक्षात प्रवेश केला किंवा निवडणुकीला उभे राहायचे ठरवले यात तिचे काय चुकले? राजकारणात प्रवेश केल्या-केल्या अचानक ती आता भारताची बेटी राहिली नाही हे कसे?

लिंग समानतेसाठी लढा द्यायचा असेल तर वेगवेगळ्या खेळांत महिलांचे स्वागत केले पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषा हिचे पदक थोडक्यात हुकले होते. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या वेळी भारतात थोड्याच घरात टीव्ही होते. ॲथलेटिक्स या खेळाविषयी लोकांना फारसे माहीतही नव्हते. आजच्या हरियाणाप्रमाणे त्यावेळी केरळने खेळांना, विशेषतः स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले होते. मुंबईने मोठमोठे क्रिकेटपटू निर्माण केले, बरीच दशके पंजाबने हॉकीला आश्रय दिला, त्याचप्रमाणे कुस्ती हा क्रीडा प्रकार हरियाणाने जोपासला. हरियाणातील मुलींनी (प्रामुख्याने महावीरसिंग फोगट यांच्या परिवारातील) या खेळात चांगलेच नैपुण्य दाखवले. आजवर कुस्ती हा पुरुषांचा खेळ मानला जात होता. भारतासारख्या देशातील सामाजिक रचना लक्षात घेता मुलींनी कुस्तीच्या रिंगणात उतरणे कधीच सोपे नव्हते. तरीही भारतीय मुली जिद्दीने कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आणि यशस्वी झाल्या.

क्रीडांगण गाजवणाऱ्या कर्तबगार स्त्रियांची परंपरा भारताला नवी नाही. मेरी कोम, सानिया मिर्झा, अंजली भागवत, दीपा कर्माकर, गीता आणि बबिता फोगट, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, मिताली राज, कर्णम मल्लेश्वरी, जलतरणपटू बुला चौधरी अशा किती जणींनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. बुला चौधरी तर डाव्या पक्षाच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधून निवडूनही आली. त्यावेळी कोणता वाद झाल्याचे मला आठवत नाही. भाजपनेही आजवर अनेक क्रीडापटू निवडणुकीला उभे केले आहेत.

विनेशच्या उमेदवारीवरून भाजपने उठवलेले रान या पार्श्वभूमीवर अनाठायी वाटते. भारतीय कुस्ती महासंघावर ताबा मिळवून बसलेल्या गुंडांशी तिने लढा सुरू केला, तेव्हा जणू पहिलवान मंडळी भाजपवरच तुटून पडली आहेत असा कांगावा करण्यात आला. महिला कुस्तीपटूंकडून विनयभंगाचे आरोप पहिल्यांदा करण्यात आले तेव्हा भाजपने वास्तविक कुस्ती महासंघापासून दूर राहायला हवे होते. योग्य ती चौकशी, पोलिस तपास होऊ द्यायला हवा होता. मात्र, अनुरागसिंह ठाकूर यांचे क्रीडा मंत्रालय, त्याचप्रमाणे पी. टी. उषा यांच्या नेतृत्वाखालील ऑलिम्पिक  असोसिएशनने कुस्तीगिरांविषयी फारच थोडी सहानुभूती दाखवली. पी. टी. उषा यांना मिळालेली राज्यसभेची जागा तिरक्या चर्चेचा विषय ठरली, ती उगाच नव्हे.

भाजपने ब्रिजभूषण यांची पाठराखण करत राहण्याऐवजी विनेश फोगटची बाजू घेतली असती तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते. विनेशला पॅरिसमध्ये पदक कदाचित मिळालेही असते. पॅरिसला जाण्यापूर्वी ती अत्यंतिक तणावाखाली सराव करत होती, हे वास्तव लपून राहिलेले नाही. सिंग आणि इतरांच्या टोळीने तिच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण केली होती आणि सरकारकडूनही आधार मिळाला नाही.

तिला गरज होती तेव्हा सत्तारूढ पक्ष आणि सरकार यांनी तिची पाठराखण केली असती, तर अनेक आघाड्यांवर आज चित्र वेगळे दिसले असते. विनेशच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कदाचित तिला भाजपच्याच तंबूत घेऊन आल्या असत्या. तिच्याबाबतीत झालेल्या चुका भाजपने आता तरी सुधारायला हव्यात. विनेशविरोधात उमेदवार उभा न करता, तिच्या विजयाची वाट सोपी करणे, हा परिमार्जनाचा एक मार्ग असू शकतो!

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटcongressकाँग्रेस