शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 05:24 IST

विनेशबाबतीत झालेल्या चुका भाजपने आता तरी सुधारायला हव्यात. निवडणुकीच्या विजयाची वाट सोपी करणे, हा परिमार्जनाचा एक मार्ग असू शकतो!

अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, लोकमत

विनेश फोगटनेकाँग्रेस पक्षात प्रवेश करून हरयाणा विधानसभा निवडणुकीला उभे राहण्यावर भाजपकडून खरेतर प्रतिक्रिया यायला नको होती; पण ती आली. ऑलिम्पिकचे सुवर्णपदक असो वा नसो, भारतीय क्रीडा पटलावर विनेशचा चाहतावर्ग मोठा आहे. पॅरिसमध्ये पदक न मिळणे हे तिचे आणि भारताचे केवळ कमनशीब. उभा देश त्यावेळी पॅरिसवर नजर लावून होता. जागतिक स्तरावर आवश्यक असते तेवढी क्षमता किंवा कौशल्य तिच्याकडे नव्हते म्हणून तिचे पदक हुकले नाही; तर केवळ १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिची संधी गेली. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील एक पुढारी ब्रिजभूषण शरणसिंग यांनी मात्र नैतिकतेच्या नावाने तिच्यावर तोंडसुख घेतले. जणू ते आणि त्यांचे पक्ष सहकारी या सगळ्यांना विनेश अपात्र ठरल्याने आनंदाचे भरतेच आले होते.

भारतीय राजकारण असेच आहे. विनेशने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याबरोबर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील नेतेमंडळी यात पुढे होती. विनेशने राजकीय पक्षात प्रवेश केला किंवा निवडणुकीला उभे राहायचे ठरवले यात तिचे काय चुकले? राजकारणात प्रवेश केल्या-केल्या अचानक ती आता भारताची बेटी राहिली नाही हे कसे?

लिंग समानतेसाठी लढा द्यायचा असेल तर वेगवेगळ्या खेळांत महिलांचे स्वागत केले पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषा हिचे पदक थोडक्यात हुकले होते. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या वेळी भारतात थोड्याच घरात टीव्ही होते. ॲथलेटिक्स या खेळाविषयी लोकांना फारसे माहीतही नव्हते. आजच्या हरियाणाप्रमाणे त्यावेळी केरळने खेळांना, विशेषतः स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले होते. मुंबईने मोठमोठे क्रिकेटपटू निर्माण केले, बरीच दशके पंजाबने हॉकीला आश्रय दिला, त्याचप्रमाणे कुस्ती हा क्रीडा प्रकार हरियाणाने जोपासला. हरियाणातील मुलींनी (प्रामुख्याने महावीरसिंग फोगट यांच्या परिवारातील) या खेळात चांगलेच नैपुण्य दाखवले. आजवर कुस्ती हा पुरुषांचा खेळ मानला जात होता. भारतासारख्या देशातील सामाजिक रचना लक्षात घेता मुलींनी कुस्तीच्या रिंगणात उतरणे कधीच सोपे नव्हते. तरीही भारतीय मुली जिद्दीने कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आणि यशस्वी झाल्या.

क्रीडांगण गाजवणाऱ्या कर्तबगार स्त्रियांची परंपरा भारताला नवी नाही. मेरी कोम, सानिया मिर्झा, अंजली भागवत, दीपा कर्माकर, गीता आणि बबिता फोगट, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, मिताली राज, कर्णम मल्लेश्वरी, जलतरणपटू बुला चौधरी अशा किती जणींनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. बुला चौधरी तर डाव्या पक्षाच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधून निवडूनही आली. त्यावेळी कोणता वाद झाल्याचे मला आठवत नाही. भाजपनेही आजवर अनेक क्रीडापटू निवडणुकीला उभे केले आहेत.

विनेशच्या उमेदवारीवरून भाजपने उठवलेले रान या पार्श्वभूमीवर अनाठायी वाटते. भारतीय कुस्ती महासंघावर ताबा मिळवून बसलेल्या गुंडांशी तिने लढा सुरू केला, तेव्हा जणू पहिलवान मंडळी भाजपवरच तुटून पडली आहेत असा कांगावा करण्यात आला. महिला कुस्तीपटूंकडून विनयभंगाचे आरोप पहिल्यांदा करण्यात आले तेव्हा भाजपने वास्तविक कुस्ती महासंघापासून दूर राहायला हवे होते. योग्य ती चौकशी, पोलिस तपास होऊ द्यायला हवा होता. मात्र, अनुरागसिंह ठाकूर यांचे क्रीडा मंत्रालय, त्याचप्रमाणे पी. टी. उषा यांच्या नेतृत्वाखालील ऑलिम्पिक  असोसिएशनने कुस्तीगिरांविषयी फारच थोडी सहानुभूती दाखवली. पी. टी. उषा यांना मिळालेली राज्यसभेची जागा तिरक्या चर्चेचा विषय ठरली, ती उगाच नव्हे.

भाजपने ब्रिजभूषण यांची पाठराखण करत राहण्याऐवजी विनेश फोगटची बाजू घेतली असती तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते. विनेशला पॅरिसमध्ये पदक कदाचित मिळालेही असते. पॅरिसला जाण्यापूर्वी ती अत्यंतिक तणावाखाली सराव करत होती, हे वास्तव लपून राहिलेले नाही. सिंग आणि इतरांच्या टोळीने तिच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण केली होती आणि सरकारकडूनही आधार मिळाला नाही.

तिला गरज होती तेव्हा सत्तारूढ पक्ष आणि सरकार यांनी तिची पाठराखण केली असती, तर अनेक आघाड्यांवर आज चित्र वेगळे दिसले असते. विनेशच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कदाचित तिला भाजपच्याच तंबूत घेऊन आल्या असत्या. तिच्याबाबतीत झालेल्या चुका भाजपने आता तरी सुधारायला हव्यात. विनेशविरोधात उमेदवार उभा न करता, तिच्या विजयाची वाट सोपी करणे, हा परिमार्जनाचा एक मार्ग असू शकतो!

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटcongressकाँग्रेस