शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा 'नऊ का दम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 09:12 IST

तब्बल नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत

मे २०२४ मधील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जात असलेल्या, २०२३ मधील नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुका, एकतर्फी जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राजधानी दिल्लीत सोमवार व मंगळवारी पार पडली. लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मिळालेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी बैठकीस संबोधित करताना, २०२३ मधील सर्व निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पक्षाला केले. सत्ताप्राप्ती हेच प्रत्येक राजकीय पक्षाचे ध्येय असते. त्यामुळे तब्बल नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना, आपल्या निवडणूक यंत्रणेची कार्यक्षमता जोखण्याची संधी भाजप दवडेल, हे शक्यच नाही! किंबहुना भाजपला पुन्हा एकदा लोकसभेत बहुमत मिळवायचे असल्यास, त्या नऊपैकी जास्तीत जास्त राज्यांमध्ये सत्ता मिळविणे क्रमप्राप्त आहे. तोच उद्देश नजरेसमोर ठेवून मंगळवारी भाजपने 'संपृक्ततेचे शासन' हा नवा नारा दिला.

सदासर्वकाळ निवडणूक सज्जतेसह शब्दच्छल केलेले नवनवीन नारे, हेदेखील भाजपचे गुणवैशिष्ट्य आहे. त्याला अनुसरूनच हा नवा नारा देण्यात आला आहे. पूर्वी सरकारी योजनांचे लाभ मूठभर लोकांपर्यंतच पोहोचत होते; पण भाजप सत्तेत आल्यावर ते सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचू लागले, असे भाजपला त्यातून सांगायचे आहे. 'सबका साथ, सबका विकास' हा भाजपसाठी केवळ एक नारा नाही, तर ते पक्षाचे तत्त्वज्ञान आहे, असे राष्ट्रीय कार्यकारिणीने पारित केलेल्या सामाजिक-आर्थिक प्रस्तावात म्हटले आहे. विरोधी पक्षांना मात्र ते मान्य नाही. मूठभर अभिजनांचे राज्य प्रस्थापित करणे, हेच भाजपचे अंतिम ध्येय आहे, असा विरोधकांचा आक्षेप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अभिजन विरुद्ध बहुजन असा सामना रंगवून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांतर्फे होणार, हे निश्चित त्यातच भाजपसोबत आता फारसे मित्रपक्षही उरलेले नाहीत. दुसरीकडे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा मुकाबला करावा, असे प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्थात त्यामध्येही अनेक अडथळे आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, या मुद्यावरून असलेले मतभेद हा सर्वात मोठा अडथळा !

शिवाय एखाद-दुसरा अपवाद वगळता कोणत्याही एका राज्यात भाजपच्या विरोधात दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रबळ विरोधी पक्ष नाहीत. त्यामुळे एका पक्षाची मते दुसऱ्या पक्षाकडे हस्तांतरित होण्यास फारशी संधी नाही. भाजपलाही त्याची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळेच आतापर्यंत तरी भाजपने विरोधी ऐक्याच्या गप्पांना फार गांभीर्याने घेतलेले नाही. त्याचा अर्थ भाजपसाठी मैदान पूर्णपणे मोकळे आहे, असाही नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जवळपास एक दशकापासून भाजप केंद्रात सत्तेत असल्याने सत्ताविरोधी प्रवाहाचा सामना करावा लागण्याची शक्यता मोडीत काढता येत नाही. यावर्षी ज्या नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यापैकी कर्नाटक हे एक असे राज्य आहे, जिथे दोन प्रबळ विरोधी पक्ष आहेत आणि ते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस गटबाजीने त्रस्त असली तरी भाजपची स्थितीही वेगळी नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची मांड पक्की आहे आणि भाजपला डॉ. रमण सिंग यांच्यानंतर लोकप्रिय चेहरा सापडलेला नाही. तेलंगणामध्ये भाजप खूप जोर लावत असला तरी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची लोकप्रियता कायम असल्याने भाजपसाठी सत्तेचा सोपान सोपा नाही. केंद्रशासित प्रदेश जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूक अपेक्षित असली आणि भाजपला तिथे खूप अपेक्षा असल्या तरी सत्तेची वाट बरीच अवघड आहे. उर्वरित चार राज्ये ईशान्य भारतातील छोटी राज्ये आहेत. सर्वसाधारणत: केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत राहण्याकडे त्या राज्यांचा कल असतो; परंतु त्यापैकी भाजप स्वबळावर सत्तेत असलेल्या त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा सत्तेत येण्याबाबत भाजप नेतृत्वही जरा साशंकच दिसते. ईशान्येतील राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा मुळातच फार कमी असल्याने, भाजपचे मुख्य ध्येय असलेल्या केंद्रातील सत्तेच्या दृष्टीने त्या राज्यांना तसेही फार महत्व नाही. थोडक्यात काय, तर २०२३ मध्ये सर्व नऊ राज्यांमधील विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असला तरी तो प्रत्यक्षात उतरविणे वाटते तेवढे सोपे नाही ।

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा