शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

‘ईव्हीएम’..आता शंका नको! सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी ठोकरली हे उत्तम झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 08:10 IST

शंकेखोरांच्या समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’संदर्भात काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अमलात आल्यावर शंकेखोरांच्या उरल्यासुरल्या शंकांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत होईल.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असतानाच, मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि मतदानाच्या पडताळणीसाठी त्यांना जोडलेल्या ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्रांवर शंका घेणाऱ्या आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे मतदानपत्रिकांच्या माध्यमातून मतदानप्रक्रिया राबविण्याची मागणी करणाऱ्या याचिका, सर्वोच्च न्यायालयाने निकालात काढल्या. आम्ही सर्व तांत्रिक पैलूंवर विस्तारपूर्वक चर्चा केली आहे आणि त्यानंतरच सर्व याचिका फेटाळून लावत आहोत, एखाद्या प्रणालीवर आंधळेपणाने अविश्वास व्यक्त केल्याने अकारण शंकांना वाव मिळतो, अशी टिप्पणी न्या. दीपंकर दत्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्वाळा देताना केली.

गत अनेक वर्षांपासून ‘ईव्हीएम’वर शंका घेतल्या जात आहेत. देशातील जवळपास प्रत्येकच राजकीय पक्षाने कधी ना कधी तरी ‘ईव्हीएम’वर शंका घेतली आहेच! निवडणूक निकालापूर्वी स्वत:च्या विजयाविषयी आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी, निकाल मनाविरुद्ध लागल्यास खापर फोडण्यासाठी ‘ईव्हीएम’ ही उत्तम सोय झाली होती. निकाल मनाजोगते लागल्यावर मात्र कोणीही ‘ईव्हीएम’विषयी बोलत नव्हते. त्यामुळे एका निवडणुकीत निकाल मनाविरुद्ध लागल्यावर ‘ईव्हीएम’विरुद्ध आदळआपट करणारे नेते, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळताच ‘ईव्हीएम’संदर्भात मूग गिळून बसताना देशाने अनेकदा बघितले आहेत.

‘ईव्हीएम’संदर्भात सातत्याने आशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्यामुळेच, निवडणूक आयोगाने ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे आणली होती. ‘व्हीव्हीपॅट’मुळे मतदाराला त्याने ‘ईव्हीएम’वर ज्या उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबली, त्यालाच मत गेल्याची खातरजमा करता येते; परंतु त्यावरही शंका घेणे सुरू झाले. सत्ताधारी पक्षाला ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करता येणे शक्य आहे, हा ‘ईव्हीएम’ विरोधकांचा मुख्य आक्षेप आहे. त्यांच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी, कोणीही यावे आणि ‘ईव्हीएम’ ‘हॅक’ करून दाखवावे, असे उघड आव्हान निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यावेळी मात्र एकही राजकीय पक्ष वा ‘ईव्हीएम’ विरोधक निवडणूक आयोगात पोहोचला नव्हता! खरे म्हणजे तिथेच हा विषय संपायला हवा होता; पण ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केली जाऊ शकते, हे सिद्ध करून दाखविण्याची संधी नाकारणाऱ्या मंडळींनी मग सर्वोच्च न्यायालयाची वाट धरली.

सर्वोच्च न्यायालयाने अशा सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करून त्या निकाली काढल्या. तंत्रज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असलेल्या कोणालाही हे सहज उमजू शकते की, भारतात वापरले जात असलेले ‘ईव्हीएम’ हे ‘स्टँड अलोन’ (कोणत्याही प्रकारची जोडणी नसलेले) यंत्र आहे. त्यामुळे ते ‘हॅक’ करून त्यामध्ये गडबड करणे शक्य नाही. एखाद्या उमेदवाराला अथवा पक्षाला, एखाद्या निवडणुकीचा निकाल मनाजोगता लावण्यासाठी, त्या निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या हजारो वा लाखो ‘ईव्हीएम’वर प्रत्यक्ष ताबा मिळवावा लागेल, जी अशक्यप्राय बाब आहे. शिवाय त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागेल की, ती गोष्ट लपून राहणे शक्यच होणार नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, संगणकात असते तशी ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ (ओएस) ‘ईव्हीएम’मध्ये नसते. त्यामुळे विशिष्ट उमेदवाराला अथवा पक्षालाच बहुसंख्य मते मिळावीत, अशा रीतीने ‘ईव्हीएम’चे ‘प्रोग्रामिंग’ करता येत नाही. तरीदेखील शंकेखोरांच्या समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’संदर्भात काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अमलात आल्यावर शंकेखोरांच्या उरल्यासुरल्या शंकांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत होईल.

‘ईव्हीएम’चा वापर सुरू होण्यापूर्वी काही भागांत मतदान केंद्रेच ताब्यात घेऊन, हव्या त्या उमेदवाराच्या नावापुढे ठप्पे मारून गठ्ठा मतदान केले जात असे, मतपेट्या पळविल्या जात असत. शिवाय तेव्हा मतमोजणीसाठी काही दिवस खर्ची पडत असत. तेव्हाच्या तुलनेत आता मतदारांची संख्याही दुपटीने वाढली आहे. त्यामुळे मतपत्रिकांच्या मोजणीसाठी किती प्रचंड वेळ व मनुष्यबळ लागेल, याचा विचार याचिकाकर्त्यांनी केला असेल, असे दिसत नाही. एखाद्या प्रणालीसंदर्भात कोणाला काही शंका असल्यास, त्या प्रणालीमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करायला हव्यात की, त्यापेक्षा वाईट असलेल्या जुन्या प्रणालीकडे परत जायला हवे? सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी ठोकरली हे उत्तम झाले. किमान आता तरी सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वर मारलेला ठप्पा अंतिम समजला जाईल, अशी आशा करावी का?

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग