शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बये, ग्रामसभे, तुला माहीत आहे काय; निवडणुका उरकल्या आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 03:36 IST

आपली गावे अनेक शासकांना समजली नाहीत किंवा सर्व प्रकारच्या उलथापालथीतही ती बचावली, असा एक श्लेष या मांडणीतून निघतो. हा संदर्भ यासाठी, की आपल्या राजकीय पक्षांनाही आपले ग्रामस्वराज्य व ग्रामपंचायती अजून नीट उमगलेल्या नाहीत.

‘एकामागून एक राजघराणी कोसळतात, क्रांतीमागून क्रांती येते. हिंदू, पठाण, मुगल, मराठा, शीख, इंग्रज हे आळीपाळीने शासक होतात. पण, ग्राम समूह आहे तसाच राहतो’, असे वर्णन ‘मेटकाफ’ने भारतातील ग्रामसरकारांचे केले होते. आपली गावे अनेक शासकांना समजली नाहीत किंवा सर्व प्रकारच्या उलथापालथीतही ती बचावली, असा एक श्लेष या मांडणीतून निघतो. हा संदर्भ यासाठी, की आपल्या राजकीय पक्षांनाही आपले ग्रामस्वराज्य व ग्रामपंचायती अजून नीट उमगलेल्या नाहीत. अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल घोषित होताच त्यांच्या प्रवक्त्यांनी आपल्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे दावे ठोकले नसते. राज्यात मटका बंदी आहे, पण या पक्षीय आकड्यांना बंदी कशी करणार? मुळात आपल्या ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय चिन्हावर होत नाहीत. राज्यात एकूण २९ हजार ७०० ग्रामपंचायती आहेत. त्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या. यातील एकाही उमेदवाराला पक्षाचा ‘एबी’ फॉर्म नव्हता. त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू नाही. गावांना मोकळीक मिळावी, त्यांना त्यांचे कारभारी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी कायद्यानेच पक्षांना या निवडणुकांपासून दूर ठेवले आहे. मात्र, पक्ष व नेते गावांना हे स्वातंत्र्य देण्यास तयार नाहीत. ते सतत बेडी बनून गावासोबत आहेत. नेते स्वत:, नातेवाईकांकरवी किंवा समर्थकांमार्फत गावांवर अंकुश ठेवण्यासाठी धडपडतात. अर्थात गावे त्यांना हिसकाही दाखवितात. या ग्रामपंचायत निवडणुकात चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे, उदयनराजे भोसले, राम शिंदे अशा अनेक नेत्यांना धक्के बसल्याचे दावे केले गेले. त्यांना मानणारे लोक त्यांच्या गावांत, दत्तक गावांत पराभूत झाले, म्हणून विरोधकांनी हे दावे केले असावेत. अर्थात या नेत्यांनीही आपला-तुपला असे न मानता या निवडणुकीपासून दूर राहायला हवे. जो निवडून येईल त्याला साथ व जो पराभूत होईल त्यालाही सोबत घेण्याचे धोरण त्यांनी घेतले पाहिजे.

कोकणात नारायण राणे यांनी निकाल पाहून नेहमीसारखी गर्जना ठोकली की, पुढील वेळी शिवसेना तेथे औषधालाही ठेवणार नाही. गंमत म्हणजे याहीवेळी तेथे कुठल्याच व्होटिंग मशिनवर ‘कमळ’ नाही. असे असताना राणे सेनेला गोळ्या घालायला निघाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे, ग्रामीण माणूस सावध व चतूर असतो. तो स्वार्थीही आहे. कधीकधी तो संकुचित होतो. जातीयवादीही होतो. तो ‘मेटकाफ’ला समजला नाही, तेव्हा या नेत्यांना कसा लवकर समजेल? यावेळी तर आदर्श म्हणविलेल्या गावांतही फड रंगले. पोपटराव पवारांसारख्या आदर्श सरपंचाला निवडणुकीला सामोरे जावे लागले. ते मतांची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण, परीक्षा द्यावी लागली. भास्करराव पेरे पाटील यांनी गाव आदर्श करूनही त्यांची मुलगी पराभूत झाली. अण्णा हजारे यांच्या गावात मतदारांना आमिष दाखिवले गेले. अर्थात असे करणाऱ्यांना राळेगणने पराभूत केले. निवडणुका बिनविरोध न होण्यामागे एका मुखियाच्या हातात गावगाडा राहण्याऐवजी तो ‘सर्वाहाती’ राहावा, सर्वसंमतीने राहावा, अशी भूमिका असेल तर ती स्वागतार्ह आहे.

सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक चांगले पाऊल उचलले. अन्यथा, सरपंच पद डोक्यात ठेवूनच काहीजण रिंगणात उतरतात. आता वादाचे फड गुंडाळून ग्रामसभेने एकीचा मार्ग धरावा. नेत्यांनी ग्रामपंचायतीवर नागोबासारखे बसण्यापेक्षा गावांना अधिकार व बळ द्यावे. राज्यात सात हजार ग्रामपंचायतींना ग्रामसेवक नाहीत. अनेक पंचायतींची कार्यालये उघडतच नाहीत. ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय आहे व सरपंच ग्रामपंचायतीचा ‘सीईओ’ आहे हेच सरपंच व सदस्यांनाही ठाऊक नसते. अशा बंद दारावर पक्ष व नेत्यांचे नाव चिकटविण्यापेक्षा ही दारे उघडण्याची तसदी सरकार व गावाने घ्यावी. कवी लहू कानडे हे सध्या आमदार आहेत. त्यांची एक कविता येथे उद्धृत करण्याचा आम्हाला मोह होतो. जमलेच तर विधानसभेनेही ती ऐकावी -बये, ग्रामसभे, तुला माहीत आहे कायकी आपल्याला पिकवायचंय सोनंगायचंय हरएक जिवाचं गाणंपुन्हा सुपीक करायचीय गावाची भूमीकुणीच राहणार नाहीय उपेक्षितअशी द्यायचीय हमी...निवडणुका उरकल्या आता गावाची भूमी सुपीक करायची आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक