शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

हवाई प्रवासाचे झोके, धोके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:30 IST

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ ...

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणणारी, दुसरी लहरी हवामानामुळे हवाई प्रवासातील जोखीम अधोरेखित करणारी, तर तिसरी घटना महानगर नावाच्या बजबजपुरीत प्रवाशांच्या जिवाशी संभाव्य खेळ उजेडात आणणारी आहे. एक महिन्यापूर्वी देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो कंपनीच्या मुंबई ते वाराणसी विमानात चक्क जास्तीचा प्रवासी चढला. त्याने दुसऱ्याची जागा बळकावली. परिणामी, तिकीट कन्फर्म असूनही दुसऱ्याला उभे राहावे लागले. हे चित्र बसायला जागा न मिळाल्याने एसटी किंवा रेल्वेत उभे राहून प्रवास केल्यासारखे होते. 

विमान प्रवासात असे शक्यच नाही. कारण, जेवढ्या जागा तेवढीच तिकिटे विकली जातात. इंडिगोने जास्तीचे तिकीट कसे विकले आणि बोर्डिंगवेळी ते लक्षात कसे आले नाही, याची चौकशी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सुरू केली आहे. यातून हेच स्पष्ट होते, की प्रवाशांना अवाच्या सव्वा दराने तिकिटे विकणाऱ्या या कंपन्या प्रचंड बेफिकीर असतात, केंद्र सरकारच्या नियमांना वाकुल्या दाखविल्या जातात. असा सावळागोंधळ पहिल्यांदाच घडला, असे नाही. काही महिन्यांपूर्वी तब्बल ५५ प्रवाशांना विमानतळावरच सोडून वैमानिक बंगळुरू येथून विमान घेऊन दिल्लीकडे रवाना झाला होता. त्यासाठी गो फर्स्ट कंपनीला संचालनालयाने दहा लाखांचा दंड ठोठावला. विमानात उभे राहून प्रवास केला, तर काय होऊ शकते, हे दर्शविणारी दुसरी घटना सिंगापूर एअर लाइन्सच्या विमानात घडली. 

लंडन ते सिंगापूर या तेरा तासांच्या प्रवासादरम्यान दहा तासांनंतर विमान हिंदी महासागरावर, तब्बल ३७ हजार फूट उंचीवर असताना भयंकर वावटळीत सापडले. त्याने जीवघेणे हेलकावे खाल्ले. आधी वर गेले, मग खाली आले. पुन्हा वर गेले आणि अचानक सूर मारावा तसे अवघ्या दीडेक मिनिटांत जवळपास सहा हजार फूट खाली आले. त्यामुळे ज्यांनी सूचना मिळताच सीट बेल्ट लावले होते ते सोडून अन्य प्रवासी वरच्या सामान कक्षाला, छताला आदळले. या हेलकाव्यांमुळे जोडे, फोन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खाण्यापिण्याच्या वस्तू, प्लेट्स, चमचे वगैरे सामान इतस्तत: फेकले गेले. ही आदळआपट व भिरकावल्या गेलेल्या सामानांचा तडाखा बसून तीसेक प्रवासी जखमी झाले. ७३ वर्षे वयाच्या एका ब्रिटिश नागरिकाचा यात हृदयविकाराने मृत्यू झाला. विमानात २११ प्रवासी व १८ कर्मचारी होते. जखमींवर उपचारासाठी मग विमान मध्येच बँकाॅकला उतरविण्यात आले. विमान प्रवासात असे टर्ब्युलन्स किंवा वावटळी नव्या नाहीत. 

विजांच्या कडकडाटासह येणारी वादळे किंवा परस्परविरोधी दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अशा वावटळी येतात. त्यात प्रवासी जखमीही होतात. मृत्यू मात्र खूपच क्वचितच होतात. जखमींमध्ये बहुतेक वेळा प्रवाशांच्या सेवेत असलेले कर्मचारी असतात. कारण, ते सीट बेल्ट लावून एका ठिकाणी बसू शकत नाहीत. इंडिगोच्या मुंबई- वाराणसी विमानासारखे जास्तीचे प्रवासी उभे राहून प्रवास करायला लागले, तर काय होईल, याचीही कल्पना सहज येऊ शकते. मुंबईत घडलेली तिसरी घटना मात्र खूपच गंभीर, आपल्या विकासाच्या चुकीच्या संकल्पना आणि त्यातून उद्भवणारे धोके, भविष्यातील भीषण अपघातांना निमंत्रण, अशा अनेक मुद्यांना स्पर्श करणारी आहे. 

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाणारी विमाने पश्चिमेकडे उड्डाण करतात, तर येणारी विमाने पूर्वेकडून नवी मुंबई, घाटकोपरकडून धावपट्टीकडे येतात. दुबईवरून आलेल्या अशाच एका विमानाला फ्लेमिंगो किंवा रोहित पक्ष्यांचा थवा धडकला व जवळपास चाळीस पक्ष्यांच्या चिंधड्या उडाल्या. ठाणे खाडी व नव्या मुंबईतील पाणथळ जागी हजारो, लाखोंच्या संख्येने नजरेस पडणारे, शहरी मंडळींना नेत्रसुख देणारे हे देखणे पक्षी विमानाला धडकून मरण्याच्या घटनेकडे केवळ निसर्ग व पर्यावरणाच्या नजरेतून पाहता येणार नाही. पक्ष्यांची धडक बसल्यामुळे विमानाचे अपघात झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. असा अपघात मुंबईसारख्या महानगरात झाला, तर काय होईल, ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. 

ठाणे खाडी व नवी मुंबईतील बांधकामे, त्यासाठी वापरली जाणारी यंत्रे व स्फोटके, घाबरून आकाशात झेपावणारे राेहित पक्षी यातून टोलेजंग इमारती व अहोरात्र गजबजलेल्या वस्त्यांमध्ये विमान अपघाताचा मोठा धोका उद्भवू शकतो. नव्या मुंबईतील प्रस्तावित विमानतळ तर या स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाजवळच आहे. तेव्हा, पक्षी व प्रवासी दोन्हींना वाचविण्यासाठी गंभीर चिंतन गरजेचे आहे.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात