शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

हवाई प्रवासाचे झोके, धोके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:30 IST

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ ...

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणणारी, दुसरी लहरी हवामानामुळे हवाई प्रवासातील जोखीम अधोरेखित करणारी, तर तिसरी घटना महानगर नावाच्या बजबजपुरीत प्रवाशांच्या जिवाशी संभाव्य खेळ उजेडात आणणारी आहे. एक महिन्यापूर्वी देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो कंपनीच्या मुंबई ते वाराणसी विमानात चक्क जास्तीचा प्रवासी चढला. त्याने दुसऱ्याची जागा बळकावली. परिणामी, तिकीट कन्फर्म असूनही दुसऱ्याला उभे राहावे लागले. हे चित्र बसायला जागा न मिळाल्याने एसटी किंवा रेल्वेत उभे राहून प्रवास केल्यासारखे होते. 

विमान प्रवासात असे शक्यच नाही. कारण, जेवढ्या जागा तेवढीच तिकिटे विकली जातात. इंडिगोने जास्तीचे तिकीट कसे विकले आणि बोर्डिंगवेळी ते लक्षात कसे आले नाही, याची चौकशी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सुरू केली आहे. यातून हेच स्पष्ट होते, की प्रवाशांना अवाच्या सव्वा दराने तिकिटे विकणाऱ्या या कंपन्या प्रचंड बेफिकीर असतात, केंद्र सरकारच्या नियमांना वाकुल्या दाखविल्या जातात. असा सावळागोंधळ पहिल्यांदाच घडला, असे नाही. काही महिन्यांपूर्वी तब्बल ५५ प्रवाशांना विमानतळावरच सोडून वैमानिक बंगळुरू येथून विमान घेऊन दिल्लीकडे रवाना झाला होता. त्यासाठी गो फर्स्ट कंपनीला संचालनालयाने दहा लाखांचा दंड ठोठावला. विमानात उभे राहून प्रवास केला, तर काय होऊ शकते, हे दर्शविणारी दुसरी घटना सिंगापूर एअर लाइन्सच्या विमानात घडली. 

लंडन ते सिंगापूर या तेरा तासांच्या प्रवासादरम्यान दहा तासांनंतर विमान हिंदी महासागरावर, तब्बल ३७ हजार फूट उंचीवर असताना भयंकर वावटळीत सापडले. त्याने जीवघेणे हेलकावे खाल्ले. आधी वर गेले, मग खाली आले. पुन्हा वर गेले आणि अचानक सूर मारावा तसे अवघ्या दीडेक मिनिटांत जवळपास सहा हजार फूट खाली आले. त्यामुळे ज्यांनी सूचना मिळताच सीट बेल्ट लावले होते ते सोडून अन्य प्रवासी वरच्या सामान कक्षाला, छताला आदळले. या हेलकाव्यांमुळे जोडे, फोन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खाण्यापिण्याच्या वस्तू, प्लेट्स, चमचे वगैरे सामान इतस्तत: फेकले गेले. ही आदळआपट व भिरकावल्या गेलेल्या सामानांचा तडाखा बसून तीसेक प्रवासी जखमी झाले. ७३ वर्षे वयाच्या एका ब्रिटिश नागरिकाचा यात हृदयविकाराने मृत्यू झाला. विमानात २११ प्रवासी व १८ कर्मचारी होते. जखमींवर उपचारासाठी मग विमान मध्येच बँकाॅकला उतरविण्यात आले. विमान प्रवासात असे टर्ब्युलन्स किंवा वावटळी नव्या नाहीत. 

विजांच्या कडकडाटासह येणारी वादळे किंवा परस्परविरोधी दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अशा वावटळी येतात. त्यात प्रवासी जखमीही होतात. मृत्यू मात्र खूपच क्वचितच होतात. जखमींमध्ये बहुतेक वेळा प्रवाशांच्या सेवेत असलेले कर्मचारी असतात. कारण, ते सीट बेल्ट लावून एका ठिकाणी बसू शकत नाहीत. इंडिगोच्या मुंबई- वाराणसी विमानासारखे जास्तीचे प्रवासी उभे राहून प्रवास करायला लागले, तर काय होईल, याचीही कल्पना सहज येऊ शकते. मुंबईत घडलेली तिसरी घटना मात्र खूपच गंभीर, आपल्या विकासाच्या चुकीच्या संकल्पना आणि त्यातून उद्भवणारे धोके, भविष्यातील भीषण अपघातांना निमंत्रण, अशा अनेक मुद्यांना स्पर्श करणारी आहे. 

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाणारी विमाने पश्चिमेकडे उड्डाण करतात, तर येणारी विमाने पूर्वेकडून नवी मुंबई, घाटकोपरकडून धावपट्टीकडे येतात. दुबईवरून आलेल्या अशाच एका विमानाला फ्लेमिंगो किंवा रोहित पक्ष्यांचा थवा धडकला व जवळपास चाळीस पक्ष्यांच्या चिंधड्या उडाल्या. ठाणे खाडी व नव्या मुंबईतील पाणथळ जागी हजारो, लाखोंच्या संख्येने नजरेस पडणारे, शहरी मंडळींना नेत्रसुख देणारे हे देखणे पक्षी विमानाला धडकून मरण्याच्या घटनेकडे केवळ निसर्ग व पर्यावरणाच्या नजरेतून पाहता येणार नाही. पक्ष्यांची धडक बसल्यामुळे विमानाचे अपघात झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. असा अपघात मुंबईसारख्या महानगरात झाला, तर काय होईल, ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. 

ठाणे खाडी व नवी मुंबईतील बांधकामे, त्यासाठी वापरली जाणारी यंत्रे व स्फोटके, घाबरून आकाशात झेपावणारे राेहित पक्षी यातून टोलेजंग इमारती व अहोरात्र गजबजलेल्या वस्त्यांमध्ये विमान अपघाताचा मोठा धोका उद्भवू शकतो. नव्या मुंबईतील प्रस्तावित विमानतळ तर या स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाजवळच आहे. तेव्हा, पक्षी व प्रवासी दोन्हींना वाचविण्यासाठी गंभीर चिंतन गरजेचे आहे.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात