शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय- महाराष्ट्राच्या स्थापनेला 62 वर्षे; पण प्यायचे पाणीही मिळू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 05:48 IST

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६२ वर्षे झाल्यानंतरही प्रमुख शहरांची ही अवस्था असावी, याचे आश्चर्य वाटते.

महाराष्ट्रात छत्तीस  जिल्हे आहेत. त्यापैकी मुंबई आणि उपनगर मुंबई या दोन जिल्ह्यांना ग्रामीण भाग नाही. अन्य चौतीस जिल्ह्यांत शहर आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. नगरसारखा १७ हजार चौरस किलोमीटरचा जिल्हा आहे. हिंगोलीसारखे तीन आमदार निवडून देणारे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांच्या वेड्यावाकड्या रचनांवर कोणी विचारही करीत नाहीत. लोकमत वृत्तपत्र समूहाने या सर्व जिल्ह्यांची मुख्यालये असणाऱ्या शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण केले. मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली-कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या अकरा जिल्हा मुख्यालयांचा अपवाद वगळला तर पंचवीस शहरात दररोज आवश्यक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व एकोणीस जिल्ह्यांच्या मुख्यालयात संपूर्ण शहराला दररोजचा पाणीपुरवठा होत नाही.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६२ वर्षे झाल्यानंतरही प्रमुख शहरांची ही अवस्था असावी, याचे आश्चर्य वाटते. नागपूर ही राज्याची उपराजधानी, औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी ! नागपूरच्या अनेक भागांत टँकरने पाणी दिले जाते. औरंगाबाद शहराला आवश्यक असणारा पाणीपुरवठाच पैठणजवळच्या जायकवाडी धरणातून होत नाही. जुनी योजना आहे. शहराची वाढ झाली आहे. या योजनेला गळती आहे. मराठवाड्याच्या इतर सातही जिल्ह्यांच्या मुख्यालयांना अपुरा पाणीपुरवठा होतो. दररोज नळाला पाणी येत नाही. परभणी, नांदेड, जालना या शहरांना पाणी पुरवठा होतो, पण शहरात घरोघरी पाणी देण्याची अंतर्गत सुविधा नाही. नांदेडला भरपूर पाणी आहे मात्र यंत्रणा जुनी आहे. जालना शहराला ६७ किलोमीटरवरून पैठणच्या जायकवाडी धरणातून स्वतंत्र नळ योजना करून पाणी आणले आहे. इतक्या दूरवरून आणलेले पाणी शहरात वितरित करणारी यंत्रणा नाही. अंतर्गत नळ योजना पूर्वीचीच आहे. म्हणजे हत्ती आलाय अन् शेपूट अडकले आहे, अशी अवस्था ! जालन्याचे खासदार केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचा मुलगा जिल्ह्यातून आमदार ! इतकी सत्तापदे असूनही या शहरात आठ-दहा दिवसांनी एकदा पाणी येते, यावर विश्वास कसा बसावा? बीडचा पाणीपुरवठा वाटेतच गळतो. शहरातील यंत्रणा अपुरी आहे. परभणी जिल्ह्यात तीन नद्या असताना गोदावरी खोऱ्यातील या शहरातील वितरण व्यवस्था विस्कळीत असल्याने सवडीने पिण्याचे पाणी सोडले जाते. लातूर आणि उस्मानाबाद ही मुळात तुटीच्या पाण्याच्या क्षेत्रातील  शहरे ! त्यांना आठ-दहा दिवसांनी पाणी दिले जाते. राज्याच्या राजकारणात नावे गाजविलेल्या या जिल्ह्यांच्या मुख्यालयांची अवस्था उद्ध्वस्त नगरी सारखी झाली आहे.  जळगाव म्हणजे सोन्याच्या व्यापाराचा धूर; मात्र, पाणी चार-पाच दिवसांनीच ! तीस टक्के पाणी गळतीमुळे शहरात येईपर्यंत वाहून जाते.  नगर शहराला मुळा नदीवरील राहुरीजवळच्या धरणातून थेट पाइपलाइनने पाणी आणले आहे. चाळीस किलोमीटर धावणारे पाणी आता अपुरे पडते.

पाणी असूनही कालबाह्य झालेल्या योजनांमुळे विदर्भातील बहुतांश अकरा शहरांना अपुरा पाणीपुरवठा होतो. भंडाराजवळची नदी उन्हाळ्यात कोरडी पडते म्हणून पाणी नाही. चंद्रपूर जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाचाही उपयोग होत नाही. पूर्व विदर्भ हा पाण्याचा आहे, जंगलांचा आहे. तरीही प्रत्येक शहर उन्हाळ्यात तहानलेले असते. पश्चिम विदर्भात अमरावतीचा अपवाद सोडला तर सारा अंधारच आहे. वाशिम हे छोटे शहर नवा जिल्हा, सतत अनेकवेळा निवडून येणारे गवळी घराणे ! पण, पाण्याचा विषय काढायचा नाही. आठवड्यात एकदा आले तरी नशीब ! तुलनेने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बारा जिल्ह्यांपैकी सोलापूरचा अपवाद सोडला तर दररोज पुरेसा पाणीपुरवठा होतो. यावर पश्चिम महाराष्ट्राच्या नावाने ओरडण्याचे कारण नाही. जालन्यात पाणी आणून दिले, ते घरोघरी देण्याची व्यवस्था स्थानिक नेतृत्वाला करता येत नसेल तर काय देव येणार का वाचवायला? - पाणी आहे, पण यंत्रणा जुनाट आणि अपुरी असे दुखणे अनेक ठिकाणी दिसते.  तीस-चाळीस टक्के पाणी गळतीमुळे वाया जाणाऱ्या योजना आहेत. पाणी योजनांची गळती काढण्याचे काम म्हणजे काय एव्हरेस्ट सर करणे आहे का?  किमान पंचवीस वर्षे चालणाऱ्या पाणी पुरवठा योजना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला उभ्या करता येऊ नयेत का?  जिल्हा मुख्यालयांच्या खालचे तालुके आणि तालुक्यातील गावांचा अभ्यास केला तर भयावह चित्र समोर येईल आणि हाच का माझा आधुनिक महाराष्ट्र, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही !

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भ