शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

अग्रलेख: ढकलगाडी बंदच करा! कौशल्य नसलेली मुले स्पर्धेच्या जगात कशी टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:15 IST

स्वतःपुरता मर्यादित विचार सगळेच करू लागले तर एक पिढी बरबाद होईल.

केंद्रीय शाळांमधील पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. महाराष्ट्रात हा निर्णय आधीच अमलात आला आहे. काही निर्णय कागदावर, तर काही मनापासून अंमलात आणले जातात. मात्र, फक्त पाचवी आणि आठवीच्या विद्याव्यांची परीक्षा घ्यायची पहिली ते चौथी आणि सहावी सातवीच्या मुलांना परीक्षेतून वगळायचे हे अनाकलनीय आहे. आरटीई कायदा आला त्यावेळी त्यात सातत्यपूर्ण सर्वंकष मुलामापन है सुत्र गृहीत धरले होते. परीक्षा घेतल्या नाहीत, तरी मुलांचे मूल्यमापन करणे अपेक्षित होते; पण गेल्या काही वर्षांत शालेय मुलांना नीट लिहिता-वाचताही येत नसल्याचे वास्तव अनेकदा उघडे पडले आहे. मुलांची बुद्धिमता वाढली पाहिजे, हा आग्रह किती शाळांनी धरला? किती शिक्षक त्यासाठी मनापासून प्रयत्न करतात? याचे उत्तर शोधले तर निराशाच पदरी पडेल. पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक वर्गात किमान ३० मुले, तर सहावी ते आठवीसाठी ३५ मुले असावी लागतात, त्या पटीत शिक्षक, शालेय पोषण आहार, शिक्षकांच्या पगाराच्या प्रमाणात वेतनेता अनुदानही मुलांची संख्या कमी झाली तर हे गणित बिघडते, सलग तीन महिने एखादे मूल शाळेत आले नाही तर त्याचे नाव पटावरून काढले पाहिले, असा नियम आहे. बऱ्याचदा पालक रोजगारासाठी गाव सोडून जातात, त्या कुटुंबातली मुले शाळेत येतच नाहीत, पण ती मुले शाळेच्या पटावर तशीच राहतात, दुसऱ्या गावात दुसऱ्या शाळेत त्या मूलांनी प्रवेश घेतला तर त्या ठिकाणी देखील त्यांचे नाव दाखल केले जाते. ही फसवणूकच नव्हे काय? 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापना मध्ये मुलांचे सतत मूल्यमापन करणे अपेक्षित होते. इतर मूल्यमापनासाठी ६० गुण आणि लेखी परीक्षेसाठी ४० गुण देण्याचा नियम असताना आजपर्यंत एकाही मुलाला ४१ पेक्षा कमी गुण मिळालेले नाहीत. सरकार सरकारने प्रत्येक शाळेचे रेकॉर्ड तपासले तर हे विदारक वास्तव समोर येईल. आता पाचवी आणि आठवीच्या मुलांची परीक्षा घ्यायची त्यात नापास होतील, त्या मुलांना महिनाभर पुन्हा शिकवायचे, त्यासाठीचे वेळापत्रक सादर करायचे पुरवणी परीक्षेत त्या मुलांना एक संधी यायची त्यात देखील ते नापास झाली तर त्यांना त्याच वर्गात ठेवायचे असे ठरले आहे. खरे तर पहिली ते आठवी परीक्षा झालीच पाहिजे. मुलांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर परीक्षेच्या माध्यमातून तयारी करण्याची सवय लावली पाहिजे. ज्याप्रमाणे दहावीची परीक्षा बोर्ड पातळीवर होते त्याचप्रमाणे चौथी आणि सातवीची परीक्षा ही बोर्ड पातळीवर झाली ता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय लागेल. लेखन-वाचनाचे मूलभूत कौशल्य नसलेली मुले स्पर्धेच्या जगात कशी टिकणार? मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देऊन स्वतः पुरता हा प्रश्न सोडवला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये काय शिकवले गेले? गृहपाठ काय दिला? याची विचारणा पालक करतात. आपले मूल काय कसे शिकत आहे, यावर या पालकांचे बारकाईने लक्ष असते. कारण त्यांच्यासाठी तीच पुढच्या आयुष्याची गुंतवणूक आहे. मात्र, सरकारी शाळांमधली गोरगरीब कष्टक-यांची मुले काय शिकलात, याची कल्पना त्यांच्या पालकांनाही नसते. रोजीरोटीच्या लढाईत त्यासाठी ना त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो, ना त्यासाठीची समजा! धोरणबदलासाठी दबावगट तयार करण्याची शक्यता तर फारच दूरची. एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत थोडी जरी गडबड झाली तर पालक एकत्र देतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आग्रह धरतात. गावखेड्यातल्या सरकारी शाळेत तसे चित्र दिसत नाही. मग दह‌ावीच्या परीक्षेत ग्रामीण भागातील अनेक शाळांभोवती कॉपी पुरवणा-यांचे जत्थेच्या जत्थे पाहायला मिळतात, त्याचे कारण पहिली ते आठवीपर्यतथ्या शिक्षणातही आहेच! क्षणिक स्वार्थासाठी, शालेय पोषण आहारात हात मारता यावा म्हणून वाढीव शिक्षक भरता आले तर त्यातून चार पैसे कमवावे म्हणून किंवा शासकीय अनुदानातून 'कट' मारता येईल. म्हणून स्वतःपुरता मर्यादित विचार सगळेच करू लागले तर एक पिढी बरबाद होईल. अशा अशिक्षित विद्याथ्यांची फौज पुढे जाऊन तुम्ही आमच्यासाठी काय केले?' असे विचारू लागली तर त्याचे उत्तर सरकारकडेही नसेल आणि विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांकडेदेखील. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSchoolशाळाTeacherशिक्षक