शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: ढकलगाडी बंदच करा! कौशल्य नसलेली मुले स्पर्धेच्या जगात कशी टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:15 IST

स्वतःपुरता मर्यादित विचार सगळेच करू लागले तर एक पिढी बरबाद होईल.

केंद्रीय शाळांमधील पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. महाराष्ट्रात हा निर्णय आधीच अमलात आला आहे. काही निर्णय कागदावर, तर काही मनापासून अंमलात आणले जातात. मात्र, फक्त पाचवी आणि आठवीच्या विद्याव्यांची परीक्षा घ्यायची पहिली ते चौथी आणि सहावी सातवीच्या मुलांना परीक्षेतून वगळायचे हे अनाकलनीय आहे. आरटीई कायदा आला त्यावेळी त्यात सातत्यपूर्ण सर्वंकष मुलामापन है सुत्र गृहीत धरले होते. परीक्षा घेतल्या नाहीत, तरी मुलांचे मूल्यमापन करणे अपेक्षित होते; पण गेल्या काही वर्षांत शालेय मुलांना नीट लिहिता-वाचताही येत नसल्याचे वास्तव अनेकदा उघडे पडले आहे. मुलांची बुद्धिमता वाढली पाहिजे, हा आग्रह किती शाळांनी धरला? किती शिक्षक त्यासाठी मनापासून प्रयत्न करतात? याचे उत्तर शोधले तर निराशाच पदरी पडेल. पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक वर्गात किमान ३० मुले, तर सहावी ते आठवीसाठी ३५ मुले असावी लागतात, त्या पटीत शिक्षक, शालेय पोषण आहार, शिक्षकांच्या पगाराच्या प्रमाणात वेतनेता अनुदानही मुलांची संख्या कमी झाली तर हे गणित बिघडते, सलग तीन महिने एखादे मूल शाळेत आले नाही तर त्याचे नाव पटावरून काढले पाहिले, असा नियम आहे. बऱ्याचदा पालक रोजगारासाठी गाव सोडून जातात, त्या कुटुंबातली मुले शाळेत येतच नाहीत, पण ती मुले शाळेच्या पटावर तशीच राहतात, दुसऱ्या गावात दुसऱ्या शाळेत त्या मूलांनी प्रवेश घेतला तर त्या ठिकाणी देखील त्यांचे नाव दाखल केले जाते. ही फसवणूकच नव्हे काय? 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापना मध्ये मुलांचे सतत मूल्यमापन करणे अपेक्षित होते. इतर मूल्यमापनासाठी ६० गुण आणि लेखी परीक्षेसाठी ४० गुण देण्याचा नियम असताना आजपर्यंत एकाही मुलाला ४१ पेक्षा कमी गुण मिळालेले नाहीत. सरकार सरकारने प्रत्येक शाळेचे रेकॉर्ड तपासले तर हे विदारक वास्तव समोर येईल. आता पाचवी आणि आठवीच्या मुलांची परीक्षा घ्यायची त्यात नापास होतील, त्या मुलांना महिनाभर पुन्हा शिकवायचे, त्यासाठीचे वेळापत्रक सादर करायचे पुरवणी परीक्षेत त्या मुलांना एक संधी यायची त्यात देखील ते नापास झाली तर त्यांना त्याच वर्गात ठेवायचे असे ठरले आहे. खरे तर पहिली ते आठवी परीक्षा झालीच पाहिजे. मुलांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर परीक्षेच्या माध्यमातून तयारी करण्याची सवय लावली पाहिजे. ज्याप्रमाणे दहावीची परीक्षा बोर्ड पातळीवर होते त्याचप्रमाणे चौथी आणि सातवीची परीक्षा ही बोर्ड पातळीवर झाली ता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय लागेल. लेखन-वाचनाचे मूलभूत कौशल्य नसलेली मुले स्पर्धेच्या जगात कशी टिकणार? मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देऊन स्वतः पुरता हा प्रश्न सोडवला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये काय शिकवले गेले? गृहपाठ काय दिला? याची विचारणा पालक करतात. आपले मूल काय कसे शिकत आहे, यावर या पालकांचे बारकाईने लक्ष असते. कारण त्यांच्यासाठी तीच पुढच्या आयुष्याची गुंतवणूक आहे. मात्र, सरकारी शाळांमधली गोरगरीब कष्टक-यांची मुले काय शिकलात, याची कल्पना त्यांच्या पालकांनाही नसते. रोजीरोटीच्या लढाईत त्यासाठी ना त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो, ना त्यासाठीची समजा! धोरणबदलासाठी दबावगट तयार करण्याची शक्यता तर फारच दूरची. एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत थोडी जरी गडबड झाली तर पालक एकत्र देतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आग्रह धरतात. गावखेड्यातल्या सरकारी शाळेत तसे चित्र दिसत नाही. मग दह‌ावीच्या परीक्षेत ग्रामीण भागातील अनेक शाळांभोवती कॉपी पुरवणा-यांचे जत्थेच्या जत्थे पाहायला मिळतात, त्याचे कारण पहिली ते आठवीपर्यतथ्या शिक्षणातही आहेच! क्षणिक स्वार्थासाठी, शालेय पोषण आहारात हात मारता यावा म्हणून वाढीव शिक्षक भरता आले तर त्यातून चार पैसे कमवावे म्हणून किंवा शासकीय अनुदानातून 'कट' मारता येईल. म्हणून स्वतःपुरता मर्यादित विचार सगळेच करू लागले तर एक पिढी बरबाद होईल. अशा अशिक्षित विद्याथ्यांची फौज पुढे जाऊन तुम्ही आमच्यासाठी काय केले?' असे विचारू लागली तर त्याचे उत्तर सरकारकडेही नसेल आणि विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांकडेदेखील. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSchoolशाळाTeacherशिक्षक