शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
3
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
4
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
5
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
6
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
7
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
8
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
9
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
10
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
11
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
12
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
13
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
14
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
15
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
16
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
17
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
18
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
19
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
20
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थशास्त्रज्ञ डॉ. आंबेडकरांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 03:12 IST

देशासह जगभरात सध्या आर्थिक युद्ध पेटल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील चलन युद्ध पुढच्या काळात गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. डॉ. आंबेडकर यांनी

- प्रकाश आंबेडकरदेशासह जगभरात सध्या आर्थिक युद्ध पेटल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील चलन युद्ध पुढच्या काळात गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. डॉ. आंबेडकर यांनी मांडलेल्या अर्थ विषयक सिद्धांताचा सखोल अभ्यास केल्यावर, सध्याच्या जगभरातील आर्थिक प्रश्नांवर उत्तरे सापडू शकतात...जगातील परिस्थितीचा आढावा घेतला, तर ‘दहशतवाद’च्या नावाखाली युद्ध सुरू आहे. या युद्धाची कारणे आर्थिक आहेत. जगात एकमेकांच्या अर्थव्यवस्था ताब्यात घेऊन त्यामार्फत आपले वर्चस्व निर्माण करणे, हा अनेक देशांचा धंदा झाला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रमुख चलन हे डॉलर आहे. चीन आपले चलन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिर करू पाहत आहे. हा संघर्ष दोन चलनांमधीलदेखील आहे. चीनने निर्यात क्षमता वाढवून मिळवलेला नफा अमेरिकेच्या सरकारी ट्रेजरी बिलमध्ये गुंतवला आहे. ही गुंतवणूक अमेरिकेच्या सरकारी ट्रेजरी बिलातील ३५ टक्के आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चीनची पकड आहे. चीनने अमेरिकन ट्रेजरी बिल २० टक्क्यांपर्यंत जरी वठवले, तरी डॉलर अडचणीत येईल. चीन हे करण्यास घाबरते. कारण त्यामुळे एकतर युद्ध सुरू होईल वा ज्या एक्सचेंज रेटवर चीनने ट्रेजरी बिल विकत घेतलेले आहे, तो भाव राहील का, ही शंका आहे.भारत महासत्ता होणार, असे मनमोहन सिंग यांनी जाहीर केले होते. नरेंद्र मोदी यांनीही त्याच घोषणेचा पुनरुच्चार केला. तथापि, औद्योगिक महासत्ता, आर्थिक महासत्ता की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महासत्ता व्हायचे आहे, याची स्पष्टता नाही. जगातील महासत्ता म्हणण्यापेक्षा भारत हा जगातील सर्वांत मोठा खरेदीदार होऊ शकतो. पाश्चिमात्य देशांमधील लोकसंख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे काम करणारा आणि ते उत्पादन विकत घेणारा वर्ग त्या देशामध्ये हवा त्या प्रमाणात नाही. त्यांची अर्थव्यवस्था चालण्यासाठी स्वत:च्या देशात निर्माण होणाऱ्या वस्तू विकण्याची गरज आहे. त्यामुळे हे देश भारताकडे बाजारपेठ म्हणून पाहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अर्थशास्त्राकडे भारतीय अर्थशास्त्रज्ञांनी अद्याप हवे तसे लक्ष दिलेले नाही. त्याचे कारण म्हणजे बहुतांश अर्थशास्त्रज्ञ सवर्ण असल्याने त्यांच्या डोळ््यावर जातीचा चष्मा असणे, मी गैर मानत नाही. अर्थशास्त्र शिकवणारा आंबेडकरी विचारांचा प्राध्यापक वर्गालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ होते, याचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळेच जागतिक पातळीवर जो तोडगा बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना सुचवला, त्याकडे दुर्लक्ष झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘यापुढचे लढे हे तलवारीपेक्षा पेनाच्या शाईतून होतील. जागतिक पातळीवर एका देशाने दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा ताबा घेऊ नये, देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी ही घटनेंतर्गत बाब असली पाहिजे,’ असे डॉ. आंबेडकर यांनी सुचविले होते. संविधानात आर्थिक जीवनवाहिनीची मालकी ही सरकारच्याच मालकीची असावी, हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला. या विचाराला त्या काळातही फार महत्त्व देण्यात आले नाही. कदाचित, ही सुचविलेली व्यवस्था स्वीकारली गेली असती, तर आज जगातील आर्थिक युद्ध झालेच नसते. एका देशाने स्वत:ची आर्थिक जीवनवाहिनी ठरवून तिची मालकी ठरवली, मग तिच्यावर कब्जा करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा ती बिगरसरकारी करणे हेदेखील शक्य होत नाही. हाच भारतीय अर्थव्यवस्थेतील सिद्धांत आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा विषय घेतला असता, तर त्यांच्या सदस्यांनी त्या-त्या देशांतील आर्थिक जीवनवाहिनी काय आहे, हे ठरवणे सुरू केले असते. ते ठरल्यानंतर मग आंतरराष्ट्रीय करारही झाले असते. ज्यात प्रत्येक देशाने आपली आर्थिक जीवनवाहिनी ठरवलेली आहे, त्यावर दुसऱ्या देशाने आघात करू नये, हस्तक्षेप करू नये किंवा नियंत्रित करू नये, असा करार झाला असता, तर आजची आर्थिक युद्धाची परिस्थिती निर्माणच झाली नसती. माझ्या दृष्टीने अजूनही वेळ गेलेली नाही. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने हा आर्थिक सिद्धांत भारतीय अर्थव्यवस्थेला जसा लागू आहे, असाच तसाच तो जगालाही लागू होतो. या विचारांतून बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने या आर्थिक पैलूवर चर्चा होईल. आपल्या देशाचा आर्थिक विभाग यावर सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, अशी अपेक्षा करतो. देशाच्या भवितव्यासाठी याहून वेगळा सक्षम मार्ग असू शकत नाही.