शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - शेअर बाजारात कमाई केली ना? - आता जरा थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 06:11 IST

गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षात सहज पैसा कमावला. पण ‘जानकारी’ नसेल त्यांनी सध्या बाजारापासून दूर राहावे किंवा गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी हे बरे.

केतन गोरानिया

कोविडनंतरच्या काळात भारतीय शेअर बाजारात नवे गुंतवणूकदार उतरले. बाजाराच्या इतिहासात गेल्या ३० वर्षांत हे असे प्रथमच घडले. मार्च २०२०पासून २२ महिन्यांत निर्देशांक दुपटीहून अधिक वर गेला. त्यात घसरण १० टक्केही झाली नाही. गेल्या दोन वर्षात प्रत्येक घसरणीत खरेदी करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळाला. यापुढेही ते असेच कमाई करतील की हात पोळून घेतील? जगातल्या सर्व बाजारांना २००९पासून मध्यवर्ती बँकांनी पोसले. अर्थव्यवस्थेत बक्कळ पैसा ओतल्याने शेअर बाजारात तेजी राहिली. कोविडमुळे जागतिक कर्ज वाढले. २२६ ट्रीलियन डॉलर्सपर्यंत  गेले. जागतिक कर्जाचे जी. डी. पी.च्या तुलनेत प्रमाण २००८ साली २८० टक्के होते, ते ३५६ टक्क्यांवर गेले. भारतात हे प्रमाण २००८ साली ७२.८ टक्के होते, ते आता ८८.८ टक्के झाले. 

जगभर चलनवाढ होते आहे. अमेरिकेत ४० वर्षांत प्रथमच ७ टक्के इतका हा दर वाढलाय. मध्यवर्ती बॅंका पतपुरवठा आवळतील, हे आता सगळीकडे स्पष्ट दिसते आहे. जास्त कर्ज आणि कमी व्याजदराच्या काळात जगाचे बरे चालले होते. परंतु, अधिक व्याजदर आणि चलनवाढीच्या काळात अनेक आव्हाने उभी राहतील. जी. डी. पी.च्या तुलनेत जास्त कर्जाच्या काळात व्याजदर वाढणे अर्थव्यवस्थांना जड जाईल. अडचणी उद्भवतील. विशेषत: रशिया-युक्रेन युद्ध लांबले तर चलनवाढ दबाव वाढेल. भारत मोठा आयातदार देश आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. भारतात चलनवाढ अटळ आहे. युद्ध लांबल्यास युरोप व अन्य जगाला होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल. 

- हे सारे लक्षात घेऊन सर्व देशांनी स्वत:ला वाचविण्यासाठी निर्यातीवर बंधने आणण्यासारखे उपाय योजायला सुरूवात केली आहे. खते, गहू, बी- बियाण्यांच्या किमती अतिशय वेगाने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या तेल किमतींचे समायोजन करणे भारत सरकारला कठीण जात आहे. चालू तसेच महसुली खात्यावरील तूट त्यातून मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तेल बॅरलमागे १० डॉलरने वाढले की, चालू खात्यावरील तूट ५ टक्के वाढते. भौगोलिक राजकीय संघर्षामुळे भारताच्या निर्यातीवरही परिणाम होणार आहे. जगात व्याज दर वाढत गेले तर विदेशी संस्थांची गुंतवणूक बाहेर जात राहील. जगभरात तांत्रिक समभाग घसरले तर भारताला स्टार्टअप्समध्ये पैसा खेचणे कठीण जाईल. या सगळ्यातून रुपया घसरून भारतापुढे आर्थिक कटकटी वाढतील.

सध्या २०२२ या आर्थिक वर्षातले नक्त देशांतर्गत उत्पन्न २३६.४४ लाख कोटी आणि बाजाराचे भांडवल २५२ लाख कोटी अपेक्षिण्यात आले आहे. यात जी. डी. पी.चे बाजार भांडवलाशी प्रमाण १.०६ निघते. जे ऐतिहासिक स्तरावर जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमीच. १ जानेवारी २०२० ते १२ मार्च २०२२ या काळात विदेशी संस्थांनी तब्बल १३ हजार कोटींची विक्री करूनही भारतीय शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. भारतातील खराब अर्थस्थिती आणि इतर ठिकाणी वाढते व्याजदर यामुळे विदेशी संस्था विक्री चालू ठेवतील. अल्प मुदतीच्या परताव्यावर याचा नक्कीच परिणाम संभवतो. खूप मोठ्या संख्येने नव्याने आलेल्या गुंतवणूकदारांनी मंदीच्या विळख्यातला बाजार किंवा मोठी घसरण पाहिलेली नाही. त्यांनी सावध राहिले पाहिजे. कमी परतावा असला तरी काही वर्षे गुंतवणूक राखण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. बाजार मोठी घसरण दाखवू शकतो किंवा दीर्घकाळ मंदीत राहू शकतो. नव्या गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षात सहज पैसा कमावला. पण त्यांच्याकडे पृथक्करणाचे कौशल्य, शिस्त नाही. त्यांनी एकतर बाजारापासून दूर राहावे किंवा गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी हे बरे.

(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत)

टॅग्स :share marketशेअर बाजारbusinessव्यवसाय