शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

पावसामुळे रस्त्यांचे चेहरे पडले उघडे!

By किरण अग्रवाल | Updated: July 16, 2023 12:27 IST

Due to the rain, the faces of the roads were exposed : या रस्त्यांच्या गुणवत्ता निकषांची कागदपत्रे या निमित्ताने तपासली जाणे गरजेचे आहे.

 - किरण अग्रवाल

यंदा एकतर पाऊसच विलंबाने आला, आणि तो येताच नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेले. जागोजागच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे कंबरडे तुटायची वेळ आली आहे, तेव्हा या रस्त्यांच्या गुणवत्ता निकषांची कागदपत्रे या निमित्ताने तपासली जाणे गरजेचे आहे.

लांबलेला पाऊस एकदाचा सुरू झाल्याने बळीराजाचा काहीसा जिवात जीव आला आहे, परंतु या पहिल्याच पावसाने रस्ते कामांची जी कल्हई उडवून ठेवली आहे त्याने वाहनधारकांना कंबर व पाठदुखीच्या वेदना दिल्या तर आश्चर्य वाटू नये.

यंदा मान्सून थोडाथोडका नव्हे, तर तब्बल महिनाभर लांबल्याने खरिपाच्या पेरणीला विलंब झाला आहे. अजूनही काही भागांत पुरेसा समाधानकारक पाऊस नाही, पण उशिरा का होईना तो आल्याने बळीराजा कामाला लागला आहे; पण शेती कामांसाठी शेतात जायचे तर पहिल्याच पावसाने रस्त्यांची हालत अशी काही करून ठेवली आहे की विचारता सोय नाही. विशेषत: पाणंद रस्त्याची कामे अनेक भागांत झालेली नाहीत. त्यामुळे बैलगाडीवर साहित्य वाहून न्यायचे तर शेतकऱ्याचीच नव्हे, मुक्या प्राण्यांचीही मोठीच कसरत होत आहे.

अजून खऱ्या पावसाळ्याला सामोरे जायचे आहे, पण तत्पूर्वीच रस्त्यांची ‘वाट’ लागली आहे. अकोला काय, किंवा बुलढाणा, वाशिम काय; सर्वच ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्यातून वाट काढणे दुचाकीस्वारांसाठी जिकिरीचे बनले आहे. पावसाळा सुरू झाला, परंतु अनेक ठिकाणच्या पावसाळी गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवर व घरादारात शिरून नुकसानीस सामोरे जावे लागल्याचाही अनुभव आला आहे. अजून म्हणावा तसा पाऊस नाहीच, तरी अकोला शहरातील व रेल्वे रुळाखालील अंडरपास पाण्याने तुडुंब भरली आहेत. यातील पाण्याचा निचरा होऊन जाईलही, पण अशा कामांमधील परसेंटेजचा जो निचरा ज्याच्या कुणाच्या खिशात झाला आहे, त्याची चर्चा झाल्याखेरीज राहू नये.

मध्य प्रदेश व अकोट तालुक्याला अकोला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल ९६ वर्षे जुना झाला, त्याला तडे पडले म्हणून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो वाहतुकीस बंद केला गेला. यामुळे स्थानिक नागरिकांची होणारी कुचंबना लक्षात घेता तातडीने सुमारे चार कोटी खर्च करून एक तात्पुरता पूल उभारला गेला, पहिल्याच पावसाचा पूर या पुलावरून ओसंडून वाहिला. यामुळे अकोला व अकोटचा संपर्क खंडित होऊन प्रवाशांचे खूपच हाल होतात. आता जेव्हा जेव्हा नदीला पाणी येईल त्यावेळी अशीच स्थिती ओढवणार, त्यामुळे लांबच्या दर्यापूरमार्गे प्रवासाखेरीज पर्याय उरलेला नाही. शेजारी असलेल्या गोपालखेडच्या पूलावरून पुढे जायचे तर त्यासाठीचा पोहोच मार्गही अद्याप पूर्ण झालेला नाही. पातुर ते महानचा अवघा अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता, पण त्याची अवस्था अशी झाली आहे की अर्धा तासाऐवजी तेथे चक्क दोन दोन तास लागत आहेत. म्हणजे एकतर वेळ जातो, आणि दुसरे म्हणजे कंबरडे तुटते. पण बोलायचे कुणाला?, कारण ऐकणारे आहेत कुठे?

रस्त्याची कोणतीही कामे करताना त्यासाठी गुणवत्तेचे निकष ठरलेले असतात व ते तपासून बिले काढली जाणे अपेक्षित असते. एकाच पावसात डांबर वाहून गेलेले असे जे जे काही रस्ते आहेत त्यांच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली, हे रस्ते कधीपर्यंत टिकणे अपेक्षित होते याचा शोध घेऊन जरा त्या गुणवत्ता प्रमाणपत्रांवरची धूळ यानिमित्ताने झटकायला हवी. लाखो रुपये खर्चाचे रस्ते दरवर्षी असे पावसात उघडे पडताना दिसतात, पण त्यासाठी कुणीच जबाबदार धरला जाताना दिसत नाही. पाऊस व अतिवृष्टीत हे होणारच असे गृहीत धरून यंत्रणाही संबंधित ठेकेदारांना क्लीन चिट देतात, हेच आश्चर्याचे व ओघानेच परस्परांमधील मिलीजुलीचे प्रत्यंतर आणून देणारे म्हणावयास हवे.

सारांशात, पावसामुळे झालेली रस्त्यांची बिकट अवस्था पाहता या रस्ता कामांच्या गुणवत्तेचे ‘रिऑडिट’ केले जाणे गरजेचे ठरावे. ज्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत तेथे ठिगळं जोडून वाहनधारकांची अपघात प्रवणता कमी करण्याचे प्रयत्न तातडीने व्हायला हवेत.

टॅग्स :Akolaअकोलाroad transportरस्ते वाहतूक