शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्त्यांचे चेहरे पडले उघडे!

By किरण अग्रवाल | Updated: July 16, 2023 12:27 IST

Due to the rain, the faces of the roads were exposed : या रस्त्यांच्या गुणवत्ता निकषांची कागदपत्रे या निमित्ताने तपासली जाणे गरजेचे आहे.

 - किरण अग्रवाल

यंदा एकतर पाऊसच विलंबाने आला, आणि तो येताच नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेले. जागोजागच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे कंबरडे तुटायची वेळ आली आहे, तेव्हा या रस्त्यांच्या गुणवत्ता निकषांची कागदपत्रे या निमित्ताने तपासली जाणे गरजेचे आहे.

लांबलेला पाऊस एकदाचा सुरू झाल्याने बळीराजाचा काहीसा जिवात जीव आला आहे, परंतु या पहिल्याच पावसाने रस्ते कामांची जी कल्हई उडवून ठेवली आहे त्याने वाहनधारकांना कंबर व पाठदुखीच्या वेदना दिल्या तर आश्चर्य वाटू नये.

यंदा मान्सून थोडाथोडका नव्हे, तर तब्बल महिनाभर लांबल्याने खरिपाच्या पेरणीला विलंब झाला आहे. अजूनही काही भागांत पुरेसा समाधानकारक पाऊस नाही, पण उशिरा का होईना तो आल्याने बळीराजा कामाला लागला आहे; पण शेती कामांसाठी शेतात जायचे तर पहिल्याच पावसाने रस्त्यांची हालत अशी काही करून ठेवली आहे की विचारता सोय नाही. विशेषत: पाणंद रस्त्याची कामे अनेक भागांत झालेली नाहीत. त्यामुळे बैलगाडीवर साहित्य वाहून न्यायचे तर शेतकऱ्याचीच नव्हे, मुक्या प्राण्यांचीही मोठीच कसरत होत आहे.

अजून खऱ्या पावसाळ्याला सामोरे जायचे आहे, पण तत्पूर्वीच रस्त्यांची ‘वाट’ लागली आहे. अकोला काय, किंवा बुलढाणा, वाशिम काय; सर्वच ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्यातून वाट काढणे दुचाकीस्वारांसाठी जिकिरीचे बनले आहे. पावसाळा सुरू झाला, परंतु अनेक ठिकाणच्या पावसाळी गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवर व घरादारात शिरून नुकसानीस सामोरे जावे लागल्याचाही अनुभव आला आहे. अजून म्हणावा तसा पाऊस नाहीच, तरी अकोला शहरातील व रेल्वे रुळाखालील अंडरपास पाण्याने तुडुंब भरली आहेत. यातील पाण्याचा निचरा होऊन जाईलही, पण अशा कामांमधील परसेंटेजचा जो निचरा ज्याच्या कुणाच्या खिशात झाला आहे, त्याची चर्चा झाल्याखेरीज राहू नये.

मध्य प्रदेश व अकोट तालुक्याला अकोला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल ९६ वर्षे जुना झाला, त्याला तडे पडले म्हणून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो वाहतुकीस बंद केला गेला. यामुळे स्थानिक नागरिकांची होणारी कुचंबना लक्षात घेता तातडीने सुमारे चार कोटी खर्च करून एक तात्पुरता पूल उभारला गेला, पहिल्याच पावसाचा पूर या पुलावरून ओसंडून वाहिला. यामुळे अकोला व अकोटचा संपर्क खंडित होऊन प्रवाशांचे खूपच हाल होतात. आता जेव्हा जेव्हा नदीला पाणी येईल त्यावेळी अशीच स्थिती ओढवणार, त्यामुळे लांबच्या दर्यापूरमार्गे प्रवासाखेरीज पर्याय उरलेला नाही. शेजारी असलेल्या गोपालखेडच्या पूलावरून पुढे जायचे तर त्यासाठीचा पोहोच मार्गही अद्याप पूर्ण झालेला नाही. पातुर ते महानचा अवघा अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता, पण त्याची अवस्था अशी झाली आहे की अर्धा तासाऐवजी तेथे चक्क दोन दोन तास लागत आहेत. म्हणजे एकतर वेळ जातो, आणि दुसरे म्हणजे कंबरडे तुटते. पण बोलायचे कुणाला?, कारण ऐकणारे आहेत कुठे?

रस्त्याची कोणतीही कामे करताना त्यासाठी गुणवत्तेचे निकष ठरलेले असतात व ते तपासून बिले काढली जाणे अपेक्षित असते. एकाच पावसात डांबर वाहून गेलेले असे जे जे काही रस्ते आहेत त्यांच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली, हे रस्ते कधीपर्यंत टिकणे अपेक्षित होते याचा शोध घेऊन जरा त्या गुणवत्ता प्रमाणपत्रांवरची धूळ यानिमित्ताने झटकायला हवी. लाखो रुपये खर्चाचे रस्ते दरवर्षी असे पावसात उघडे पडताना दिसतात, पण त्यासाठी कुणीच जबाबदार धरला जाताना दिसत नाही. पाऊस व अतिवृष्टीत हे होणारच असे गृहीत धरून यंत्रणाही संबंधित ठेकेदारांना क्लीन चिट देतात, हेच आश्चर्याचे व ओघानेच परस्परांमधील मिलीजुलीचे प्रत्यंतर आणून देणारे म्हणावयास हवे.

सारांशात, पावसामुळे झालेली रस्त्यांची बिकट अवस्था पाहता या रस्ता कामांच्या गुणवत्तेचे ‘रिऑडिट’ केले जाणे गरजेचे ठरावे. ज्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत तेथे ठिगळं जोडून वाहनधारकांची अपघात प्रवणता कमी करण्याचे प्रयत्न तातडीने व्हायला हवेत.

टॅग्स :Akolaअकोलाroad transportरस्ते वाहतूक