शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

हवी नेतृत्वाची जरब अन् कायद्याचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:15 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र वापरत, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली.

- जमीर काझीमुंबई पोलिसांची तुलना नेहमीच इंग्लड आणि स्कॉटलंड पोलिसांशी केली जात असल्याने, मुंबई पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोण येणार, याकडे आंतरराष्ट्रीय मीडियाचेही लक्ष असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र वापरत, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली. या अनपेक्षित नियुक्तीमुळे पोलीस वर्तुळासह राजकीय पक्षांनाही मोठा धक्का बसला आहे.राज्यात परतण्यास अनुत्सुक असलेल्या जैस्वाल यांचे मन वळवून, तब्बल दहा वर्षांनंतर ते महाराष्टÑ केडरमध्ये पुन्हा दाखल झाले आहेत. जैस्वाल यांच्या नियुक्तीबरोबरच पोलीस महासंचालकपदाची धुरा, अपेक्षेप्रमाणे सेवाज्येष्ठतेच्या आधारावर मुंबईचे मावळते आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही महत्त्वपूर्ण पदांना स्वच्छ प्रतिमा, सचोटी आणि कोणत्याही वादात न अडकलेले चेहरे मिळाले आहेत. प्रत्यक्षात या दोन्ही अधिकाऱ्यांना नव्या पदावर फार काळ काम पाहता येणार नाही, हाच त्यातला थोडा हुरहुर लावणारा भाग.पडसलगीकर यांच्या सेवानिवृत्तीला जेमतेम दोन महिन्यांचा अवधी आहे. सरकारने ठरविले, तर त्यांना दोन टप्प्यांत जास्तीतजास्त सहा महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते. अजित पारसनीस यांचा अपवाद वगळता, गेल्या दहा वर्षांत कोणत्याही डीजीपीला तीन महिन्यांहून अधिक मुदतवाढ देण्यात आलेली नाही. पडसलगीकर यांच्यानंतर १९८५च्या आयपीएस बॅचचे जैस्वाल हेच सर्वांत ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तपदावरून ते पोलीस महासंचालक होणार हे निश्चित. त्यांना तेथे सुमारे साडेतीन वर्षांचा काळ मिळेल. तूर्तास या दोघाही ज्येष्ठ अधिकाºयांना कमी कालावधीत आक्रमक काम करत ठसा उमटावावा लागेल. मितभाषी पडसलगीकर यांनी मुंबईचे आयुक्त म्हणून २९ महिने कुशलतेने कार्यभार सांभाळला. मात्र, सहकारी अधिकाºयांमध्ये आदरयुक्त धाक ते प्रस्थापित करू शकले नाहीत. ते नि:स्वार्थीपणे काम करत राहिले, तरी ‘वर्दी’आडच्या भानगडी, गैरव्यवहार सुरूच राहिले. नेतृत्वाची ती उणीव जैस्वाल यांना भरून काढावी लागेल. मुंबईत २००६ सालातील बॉम्बस्फोट तपास, तेलगी मुद्रांक घोटाळा तपासावेळी दाखविलेली धडाडी त्यांच्याकडून आता अपेक्षित आहे. त्यातूनच मुंबई पोलिसांच्या आजवरच्या लौकिकाला उभारी मिळेल.महाराष्टÑ पोलीस दल काही महिन्यांपासून वादाच्या भोवºयात सापडले आहे. गेल्या पावणेदोन-दोन वर्षांत राज्यातील गुन्ह्यांचा आलेख, विशेषत: महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याचबरोबर, पोलीस दलातील अंतर्गत धुसफुस, बदल्यांतील वशिलेबाजी, गटबाजी प्रकर्षाने चव्हाट्यावर आली. सांगलीतील अनिकेत कोथळेचे प्रकरण असो, औरंगाबादमधील कचरा प्रश्नावरील मारहाण किंवा महिला अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण. कोरेगाव भिमातील हिंसाचारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटले. औरंगाबादेतील दंगल आटोक्यात आणताना, पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. निवृत्त महासंचालक सतीश माथूर यांच्यात ही प्रकरणे हाताळताना गांभीर्याचा अभाव दिसून आला. पडसलगीकर हे तुलनेत संवेदनशील अधिकारी असल्याने, त्यांच्याकडून अशा तपासावेळच्या त्रुटी दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Policeपोलिस