शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
2
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
3
स्कॉटलंडच्या विजयाने गतविजेता इंग्लंड स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर! ब गटाचे विचित्र समीकरण 
4
मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी
5
लोकसभेत पराभव, तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ; भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या रवनीतसिंग बट्टू यांना दिली संधी
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral
7
वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!
8
राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!
9
PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
10
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 
11
PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी
12
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
13
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
14
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
15
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
16
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
17
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
18
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
19
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
20
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान

माहिती आयोगाचे ‘बुरे दिन’ कायम, राज्य माहिती आयोगाबाबत अद्यापही उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:56 PM

आघाडी सरकारच्या काळात राज्य माहिती आयोगाबाबत असलेली उदासीनता देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही कायम आहे.

- सुधीर लंकेआघाडी सरकारच्या काळात राज्य माहिती आयोगाबाबत असलेली उदासीनता देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही कायम आहे. माहिती अधिकाराचा काही नागरिक दुरुपयोग करतात अशी तक्रार सरकार व प्रशासकीय अधिकारी करतात. पण, खरे तर सरकारही या कायद्याचा सोयीने वापर करत आहे. अण्णा हजारे यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अण्णांना या मुद्यावर पुन्हा एकदा लढावे लागेल की काय, अशी परिस्थिती आहे.राज्य मुख्य माहिती आयुक्ताचे पद १३ डिसेंबरच्या आत भरा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिला. माधव करमरकर यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. पद भरा म्हणून नागरिकांना न्यायालयात जावे लागते यातच सगळे आले. मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वीच नवीन आयुक्ताची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारला त्यासाठी फुरसत मिळालेली नाही. मुळात माहिती आयुक्तांची पदे ही बहुधा निवृत्त सरकारी अधिकाºयांचे पुनर्वसन करण्याचे ठिकाण बनले आहे. माहिती आयुक्तांच्या निवडीसाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व एक कॅबिनेट मंत्री यांची समिती असते. ही समिती या पदांसाठीच्या नावांची छाननी करून राज्यपालांकडे शिफारस करते. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना ते या समितीत होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे दोन निवृत्त सचिव माहिती आयुक्त पदावर बसविले गेले. बांधकाम विभागातील अनियमिततेप्रकरणी भुजबळांवर जे गुन्हे दाखल झाले त्यात पुढे या दोघांचीही नावे आली.माहिती आयुक्त नियुक्त करण्यासाठीची प्रक्रिया कधी सुरू होते व कधी संपते, हेच समजत नाही. या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होत नाही. उमेदवार स्वत:हून अर्ज करतात. माहिती आयुक्त निवडीसाठीचे नियम ठरवा, असा आदेश न्यायालयाने नगरचे कार्यकर्ते जॉन खरात यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत दिला आहे. पण, सरकारने हे नियम ठरविलेले नाहीत. मुख्य माहिती आयुक्तांसह राज्यात विभागवार सात माहिती आयुक्त आहेत. या आयुक्तांकडे अपिलाची प्रकरणे इतकी प्रलंबित आहेत की दोन-दोन वर्षे निकाल लागत नाहीत. त्यामुळे माहिती दिली नाही तरी काही बिघडत नाही ही प्रवृत्ती खालील प्रशासकीय यंत्रणेत बळावत चालली आहे. माहिती अधिकाराचा अर्ज प्रथम जनमाहिती अधिकाºयाकडे जातो. माहिती न मिळाल्यास त्याच कार्यालयात प्रथम अपील दाखल करावे लागते. द्वितीय अपील आयोगाकडे. बहुतांश प्रशासकीय कार्यालयांनी आपल्या लिपिकाला जनमाहिती अधिकारी तर अधीक्षकाला अपिलीय अधिकारी बनविले आहे. वरिष्ठ अधिकारी सोयीस्कर बाजूला आहेत. माहिती वरिष्ठ अधिकाºयाशी संबंधित असेल तर हे खालचे कर्मचारी काय माहिती देणार? पहिल्याच टप्प्यावर पळवाट शोधली गेली आहे. मुख्य माहिती आयुक्त या नात्याने गायकवाड यांनी स्वत: ही त्रुटी आयोगाच्या अहवालात नमूद केली आहे. आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, हेही त्यांनी सांगितले. नगरचे शशिकांत चंगेडे यांनीही या सर्व बाबींसंदर्भात याचिका दाखल केली आहे. द्वितीय अपिलीय अधिकारी जिल्हास्तरावरच नेमा ही त्यांची मागणी आहे.