शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे मूल्यांकन आणि मिळणारे मूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:34 IST

पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हातचे गेले तर रबीचा पेरा निम्म्यावर आला. पाणीटंचाईच्या झळा हिवाळ्यातच तीव्र झाल्या. मध्यम, लघु प्रकल्पात जलसाठा जोत्याखाली गेला आहे.

- धर्मराज हल्लाळे

पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हातचे गेले तर रबीचा पेरा निम्म्यावर आला. पाणीटंचाईच्या झळा हिवाळ्यातच तीव्र झाल्या. मध्यम, लघु प्रकल्पात जलसाठा जोत्याखाली गेला आहे. भूगर्भातील जलपातळीत कमालीची घट झाली असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची सरकारला जाणीव झाली असून, केंद्रीय पथक दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी मराठवाड्यात दाखल झाले. परंतु, जसे हमीभाव आणि प्रत्यक्ष मिळणारा भाव याचे ताळमेळ लागत नाही तसे दुष्काळाचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष  मिळणारे भरपाई मूल्य याचाही मेळ बसत नाही. सरकारने कर्जमाफी केली. त्याचे अजूनही टप्पे सुरू आहेत. हमीभाव आणि खरेदी केंद्राचेही कागदी मेळ संपले नाहीत. अगदी बारदाणा नाही म्हणून हमीभाव केंद्रे सुरू झाली नव्हती. ज्यांनी विक्री केली त्यांनाही वेळेवर पैसे मिळाले नाहीत. शेवटी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असताना सुरूवातीला काही तालुके जाहीर केले. त्यानंतर मंडळनिहाय दुष्काळ जाहीर केला. शासन ही कल्याणकारी संकल्पना आहे. नफा आणि तोटा हे गणित शासनाच्या पटलावर नसते. मदत देताना जितका सुक्ष्म विचार शासन करीत आहे, तितका घोषणा करताना करीत नाही.केंद्रीय पथकाने सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागात पाहणी केली. शेतकरी बांधवांना मदतीची अपेक्षा आहे. परंतु, पथक तासाभरात दोन गावे करून घाईघाईने पुढे निघून गेले. आधीच शेतकºयांचा आवाज सरकार दरबारी पोहोचत नाही, त्यात पथकासमोर भाषेची अडचण झाली. भाषांतर करून अधिकाºयांनी व्यथा ऐकल्या.  त्या कितपत अधिकाºयांपर्यंत पोहोचल्या आणि काय, कशी मदत मिळणार हे लवकरच कळणार आहे. एकंदर सबंध राज्यातील दुष्काळ निवारणासाठी ७९६२ कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे कृषी खात्याने सांगितले. केंद्रीय पथक प्रमुख ही मागणी विचारात घेतील आणि मराठवाड्याला अधिकाधिक लाभ मिळेल एवढीच पथकाच्या मूल्यांकनातून अपेक्षा आहे.दुष्काळाचे लाभ देताना शासनाने निकष कठोर बनविले आहेत. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अपवाद वगळता मोठी मदत मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. प्रत्यक्षात दोन्ही जिल्ह्यात पेयजलाचे संकट आहे. लातूर शहराला याच शासनाने रेल्वेने पाणी पुरविले होते. मांजरा प्रकल्पात उन्हाळाअखेर पाणी पुरेल इतका साठा असल्याचे प्रशासन सांगत आहे. परंतु, सध्या शहराला १५ दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. परिणामी शहरातील महापालिकेच्या बोअरवर बहुतेक भाग अवलंबून आहे. येणाºया काही दिवसात त्या सर्व बोअरचे पाणी कमी झाले अथवा आटले तर पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला निधी मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जळकोटसारख्या तालुक्यांमध्ये आतापासूनच टंचाईचे चटके बसत आहेत. अशीच स्थिती उस्मानाबाद जिल्ह्यातही आहे. परंतु, शासनाने सरासरी पर्जन्यमानाचा आधार घेऊन दुष्काळाचे लाभ सार्वत्रिक केले नाहीत. या पार्श्वभूमीवर पेयजलासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दुष्काळाचे मूल्यांकन होईल, परंतु पेयजलाचे मूल्य तरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल का, हा सवाल आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ