शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

दुष्काळाचे मूल्यांकन आणि मिळणारे मूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:34 IST

पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हातचे गेले तर रबीचा पेरा निम्म्यावर आला. पाणीटंचाईच्या झळा हिवाळ्यातच तीव्र झाल्या. मध्यम, लघु प्रकल्पात जलसाठा जोत्याखाली गेला आहे.

- धर्मराज हल्लाळे

पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हातचे गेले तर रबीचा पेरा निम्म्यावर आला. पाणीटंचाईच्या झळा हिवाळ्यातच तीव्र झाल्या. मध्यम, लघु प्रकल्पात जलसाठा जोत्याखाली गेला आहे. भूगर्भातील जलपातळीत कमालीची घट झाली असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची सरकारला जाणीव झाली असून, केंद्रीय पथक दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी मराठवाड्यात दाखल झाले. परंतु, जसे हमीभाव आणि प्रत्यक्ष मिळणारा भाव याचे ताळमेळ लागत नाही तसे दुष्काळाचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष  मिळणारे भरपाई मूल्य याचाही मेळ बसत नाही. सरकारने कर्जमाफी केली. त्याचे अजूनही टप्पे सुरू आहेत. हमीभाव आणि खरेदी केंद्राचेही कागदी मेळ संपले नाहीत. अगदी बारदाणा नाही म्हणून हमीभाव केंद्रे सुरू झाली नव्हती. ज्यांनी विक्री केली त्यांनाही वेळेवर पैसे मिळाले नाहीत. शेवटी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असताना सुरूवातीला काही तालुके जाहीर केले. त्यानंतर मंडळनिहाय दुष्काळ जाहीर केला. शासन ही कल्याणकारी संकल्पना आहे. नफा आणि तोटा हे गणित शासनाच्या पटलावर नसते. मदत देताना जितका सुक्ष्म विचार शासन करीत आहे, तितका घोषणा करताना करीत नाही.केंद्रीय पथकाने सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागात पाहणी केली. शेतकरी बांधवांना मदतीची अपेक्षा आहे. परंतु, पथक तासाभरात दोन गावे करून घाईघाईने पुढे निघून गेले. आधीच शेतकºयांचा आवाज सरकार दरबारी पोहोचत नाही, त्यात पथकासमोर भाषेची अडचण झाली. भाषांतर करून अधिकाºयांनी व्यथा ऐकल्या.  त्या कितपत अधिकाºयांपर्यंत पोहोचल्या आणि काय, कशी मदत मिळणार हे लवकरच कळणार आहे. एकंदर सबंध राज्यातील दुष्काळ निवारणासाठी ७९६२ कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे कृषी खात्याने सांगितले. केंद्रीय पथक प्रमुख ही मागणी विचारात घेतील आणि मराठवाड्याला अधिकाधिक लाभ मिळेल एवढीच पथकाच्या मूल्यांकनातून अपेक्षा आहे.दुष्काळाचे लाभ देताना शासनाने निकष कठोर बनविले आहेत. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अपवाद वगळता मोठी मदत मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. प्रत्यक्षात दोन्ही जिल्ह्यात पेयजलाचे संकट आहे. लातूर शहराला याच शासनाने रेल्वेने पाणी पुरविले होते. मांजरा प्रकल्पात उन्हाळाअखेर पाणी पुरेल इतका साठा असल्याचे प्रशासन सांगत आहे. परंतु, सध्या शहराला १५ दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. परिणामी शहरातील महापालिकेच्या बोअरवर बहुतेक भाग अवलंबून आहे. येणाºया काही दिवसात त्या सर्व बोअरचे पाणी कमी झाले अथवा आटले तर पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला निधी मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जळकोटसारख्या तालुक्यांमध्ये आतापासूनच टंचाईचे चटके बसत आहेत. अशीच स्थिती उस्मानाबाद जिल्ह्यातही आहे. परंतु, शासनाने सरासरी पर्जन्यमानाचा आधार घेऊन दुष्काळाचे लाभ सार्वत्रिक केले नाहीत. या पार्श्वभूमीवर पेयजलासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दुष्काळाचे मूल्यांकन होईल, परंतु पेयजलाचे मूल्य तरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल का, हा सवाल आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ