शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पिकांसोबत खेड्यांनीही टाकल्या माना; देशोधडीच्या वाटेवर मराठवाडा

By सुधीर महाजन | Updated: October 27, 2018 12:14 IST

मराठवाड्यात केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे.

दुष्काळामुळे पिकांनी माना टाकल्याचे माहीत होते; परंतु खेडीपण माना टाकतात, हे नव्यानेच पुढे आले. रणरणते ऊन तेही आॅक्टोबरमध्ये. विहिरींनी तळ गाठला नाही तर त्या कोरड्याठाक. नदीनाले कोरडे. वातावरणात एक कायमस्वरूपी उदासीनता भरून राहिलेली. पारांवर, कट्ट्यांवर, मंदिरांच्या पडव्यांमध्ये लोक बसलेले; पण कुणाच्याही चेहऱ्यावर चैतन्य नाही की, आलेला दिवस ढकलण्यासारखे आयुष्य आहे. 

मराठवाड्यात केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे. सोयगाव आणि गंगापूर या तालुक्यांतील जगरू तांडा आणि बोलठाण या दोन गावांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. आता या खेड्यांमध्ये वृद्धांशिवाय कुणी नाही. सगळेच काम शोधण्यासाठी बाहेर पडले. पोट भरणे हा एकमेव उद्देश. आज ते गावातून उखडले गेले. त्यापैकी किती परत येणार, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक दुष्काळाने अशी पिढीच्या पिढी आपल्या मातीपासून परागंदा केली आहे.

दुष्काळाची अशी दाहकता असताना सरकार आणि प्रशासन आकडेवारीचे निकष घासत बसले आहेत. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये आता केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आॅक्टोबरमध्ये जवळपास ३ हजार खेडी दुष्काळग्रस्त आहेत. २७ तालुक्यांत ही अवस्था. हे २७ जात्यात, तर आणखी १४ तालुके सुपात आहेत. दिवाळीनंतर तेथेही पाणी नसणार. रोजगार तर आजच नाही. दिवाळीची आशा मावळली आहे. असे म्हणण्यापेक्षा शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी करपली आहे. सरकार दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करते. ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त असला तरी त्यादिवशी काहीही होणार नाही. सरकार म्हणते दुष्काळसदृश स्थिती आहे, म्हणजे नेमके काय आहे. खरे तर दुष्काळ आहे की नाही, अशा दोन शब्दांतच स्पष्टता पाहिजे. आता दुष्काळ आहे; पण दुष्काळ नाही, असा शब्दच्छल चालू आहे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा हा खेळ तसा जुना झाला; पण सरकार व प्रशासन दोघेही तो खेळण्यात रमले आहेत.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष काय? लोक देशोधडीला लागण्यास सुरुवात झाली, पेरलेले हाती काहीच पडले नाही, हाताला काम नाही, जनावरे मातीमोल किमतीत कोणी घ्यायला तयार नाही, चारा नाही, पाणी नाही, अशी परिस्थिती दुष्काळसदृश कशी असू शकते. सरकार ३१ आॅक्टोबरपर्यंत नजर आणेवारी घेणार, त्यानंतर कापणीचा अहवाल आणि त्यानंतर प्रत्यक्ष पीक उत्पादनाचा अहवाल. त्यानंतर गेल्या १0 वर्षांतील शेतमालाचे उत्पादन आणि त्यांची सध्याच्या परिस्थितीची सरासरी, असे निकष ओलांडत दुष्काळ जाहीर होतो. या अंदाजांना खरे तर कोणताही शास्त्रीय आधार नाही. तरी सरकार म्हणते महिनाअखेर दुषकाळाची घोषणा करणार.

लोकांच्या हाताला काम नाही आणि लोक काम मागत नाहीत. सरकारही रोजगार हमीची कामे देत नाही. मराठवाड्यात उडीद, मुगाचे पीक गेले. याचे उत्पादन हेक्टरी ५३३ किलो व्हायला पाहिजे; पण यात ६२ टक्के घट झाली म्हणजे शास्त्रीय भाषेत उणे उत्पादन. झालेला खर्चही भरून निघाला नाही. कडधान्याचा भाग हा विदर्भ आणि मराठवाडा; पण येथे यावर्षी पिकलेच नाही. याचा अर्थ भाव वाढणार, महागाई वाढणार, सरकारचे मंत्रीसुद्धा त्यांना वाढलेल्या घोषणा करतात. चारा नाही म्हटल्यानंतर अर्जुन खोतकरांनी थेट आॅस्ट्रेलियातून चारा आणण्याच्या बाता मारल्या. ठीक आहे, तर मग पाणी कोठून आणणार? या प्रश्नाचेही उत्तर तयार असेल. व्यावहारिक पातळीवर बोलले नाही की, सार्वजनिक हसे होते, ते खोतकरांचे झाले.

दुष्काळ नवा नाही; पण आजवरच्या दुष्काळापेक्षा भीषण आहे. हा दुष्काळ ग्रामीण भागाची सामाजिक घडी उस्कटून टाकणार. खेडी ओस पडणार. ज्यावेळी जगण्याचा लढा तीव्र होतो, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा नात्यातला ओलावा आटतो. आता विहिरी आटल्या आणि त्याबरोबर परस्पर प्रेम, माया, आपुलकीला ओहोटी लागत आहे. माणूस मोडून पडणार आहे. तो पुन्हा उभा राहील का?

- सुधीर महाजन

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेती