शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

पिकांसोबत खेड्यांनीही टाकल्या माना; देशोधडीच्या वाटेवर मराठवाडा

By सुधीर महाजन | Updated: October 27, 2018 12:14 IST

मराठवाड्यात केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे.

दुष्काळामुळे पिकांनी माना टाकल्याचे माहीत होते; परंतु खेडीपण माना टाकतात, हे नव्यानेच पुढे आले. रणरणते ऊन तेही आॅक्टोबरमध्ये. विहिरींनी तळ गाठला नाही तर त्या कोरड्याठाक. नदीनाले कोरडे. वातावरणात एक कायमस्वरूपी उदासीनता भरून राहिलेली. पारांवर, कट्ट्यांवर, मंदिरांच्या पडव्यांमध्ये लोक बसलेले; पण कुणाच्याही चेहऱ्यावर चैतन्य नाही की, आलेला दिवस ढकलण्यासारखे आयुष्य आहे. 

मराठवाड्यात केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे. सोयगाव आणि गंगापूर या तालुक्यांतील जगरू तांडा आणि बोलठाण या दोन गावांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. आता या खेड्यांमध्ये वृद्धांशिवाय कुणी नाही. सगळेच काम शोधण्यासाठी बाहेर पडले. पोट भरणे हा एकमेव उद्देश. आज ते गावातून उखडले गेले. त्यापैकी किती परत येणार, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक दुष्काळाने अशी पिढीच्या पिढी आपल्या मातीपासून परागंदा केली आहे.

दुष्काळाची अशी दाहकता असताना सरकार आणि प्रशासन आकडेवारीचे निकष घासत बसले आहेत. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये आता केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आॅक्टोबरमध्ये जवळपास ३ हजार खेडी दुष्काळग्रस्त आहेत. २७ तालुक्यांत ही अवस्था. हे २७ जात्यात, तर आणखी १४ तालुके सुपात आहेत. दिवाळीनंतर तेथेही पाणी नसणार. रोजगार तर आजच नाही. दिवाळीची आशा मावळली आहे. असे म्हणण्यापेक्षा शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी करपली आहे. सरकार दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करते. ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त असला तरी त्यादिवशी काहीही होणार नाही. सरकार म्हणते दुष्काळसदृश स्थिती आहे, म्हणजे नेमके काय आहे. खरे तर दुष्काळ आहे की नाही, अशा दोन शब्दांतच स्पष्टता पाहिजे. आता दुष्काळ आहे; पण दुष्काळ नाही, असा शब्दच्छल चालू आहे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा हा खेळ तसा जुना झाला; पण सरकार व प्रशासन दोघेही तो खेळण्यात रमले आहेत.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष काय? लोक देशोधडीला लागण्यास सुरुवात झाली, पेरलेले हाती काहीच पडले नाही, हाताला काम नाही, जनावरे मातीमोल किमतीत कोणी घ्यायला तयार नाही, चारा नाही, पाणी नाही, अशी परिस्थिती दुष्काळसदृश कशी असू शकते. सरकार ३१ आॅक्टोबरपर्यंत नजर आणेवारी घेणार, त्यानंतर कापणीचा अहवाल आणि त्यानंतर प्रत्यक्ष पीक उत्पादनाचा अहवाल. त्यानंतर गेल्या १0 वर्षांतील शेतमालाचे उत्पादन आणि त्यांची सध्याच्या परिस्थितीची सरासरी, असे निकष ओलांडत दुष्काळ जाहीर होतो. या अंदाजांना खरे तर कोणताही शास्त्रीय आधार नाही. तरी सरकार म्हणते महिनाअखेर दुषकाळाची घोषणा करणार.

लोकांच्या हाताला काम नाही आणि लोक काम मागत नाहीत. सरकारही रोजगार हमीची कामे देत नाही. मराठवाड्यात उडीद, मुगाचे पीक गेले. याचे उत्पादन हेक्टरी ५३३ किलो व्हायला पाहिजे; पण यात ६२ टक्के घट झाली म्हणजे शास्त्रीय भाषेत उणे उत्पादन. झालेला खर्चही भरून निघाला नाही. कडधान्याचा भाग हा विदर्भ आणि मराठवाडा; पण येथे यावर्षी पिकलेच नाही. याचा अर्थ भाव वाढणार, महागाई वाढणार, सरकारचे मंत्रीसुद्धा त्यांना वाढलेल्या घोषणा करतात. चारा नाही म्हटल्यानंतर अर्जुन खोतकरांनी थेट आॅस्ट्रेलियातून चारा आणण्याच्या बाता मारल्या. ठीक आहे, तर मग पाणी कोठून आणणार? या प्रश्नाचेही उत्तर तयार असेल. व्यावहारिक पातळीवर बोलले नाही की, सार्वजनिक हसे होते, ते खोतकरांचे झाले.

दुष्काळ नवा नाही; पण आजवरच्या दुष्काळापेक्षा भीषण आहे. हा दुष्काळ ग्रामीण भागाची सामाजिक घडी उस्कटून टाकणार. खेडी ओस पडणार. ज्यावेळी जगण्याचा लढा तीव्र होतो, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा नात्यातला ओलावा आटतो. आता विहिरी आटल्या आणि त्याबरोबर परस्पर प्रेम, माया, आपुलकीला ओहोटी लागत आहे. माणूस मोडून पडणार आहे. तो पुन्हा उभा राहील का?

- सुधीर महाजन

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेती