शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बहुभाषीय वर्गरचनेचे स्वप्न, नव्या शिक्षण धोरणाच्या मसुद्यात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व हवं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 02:11 IST

बाजारीकरणाला अंकुश लावला नाही, तर हे स्वप्न साकारणं अवघड दिसतं!

नव्या शिक्षण धोरणाच्या मसुद्यात मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे, हे अपेक्षित आहे. परंतु, मागील काळात पूर्वप्राथमिक व प्राथमिक स्तरावर इंग्रजी भाषा उपयोजित केली गेल्यामुळे इंग्रजी भाषेचे समाजात प्रचंड स्तोम माजलेले आहे. अशा स्थितीत मातृभाषेचा अंमल कसा करता येईल?- हा प्रश्नच आहे. मातृभाषेच्या अंगाने विचार केला तर आजही स्थिती फारच भयंकर आहे. प्राथमिक ते पदव्युत्तर स्तरापर्यंत मराठी भाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिकविणाºया शिक्षक-प्राध्यापकांना आजही प्रमाण भाषेनुसार मराठी धड लिहिता किंवा वाचता येत नाही. १९, २९, ३८, ३९, ४६, ७१, ७६, ८६, ९५ अशा अंकांचे नीट व अचूक अक्षरीलेखन करता येत नाही किंवा काही शब्दांचे अचूक उच्चारही करता येत नाहीत. मराठीच्या संदर्भातच बोलायचे तर मातृभाषा शिक्षणासंबंधीची ही उणीव कशी भरून काढता येईल, हा प्रश्न आहे!

नव्या धोरणात ५+३+३+४ असा नवा आकृतिबंध सुचविलेला आहे. बालवाडीचीे ३ वर्षे (वयोगट ३ ते ६) व १ ली व २ रीचे दोन वर्षे (वयोगट ६ ते ८) हा पाच वर्षांचा पहिला टप्पा निश्चित केला आहे. या मसुद्यात त्रिभाषा सूत्राचे जुनेच धोरण कायम ठेवून मातृभाषेला महत्त्व दिले आहे. बहुभाषी वर्गरचनेचे संकेतही दिलेत. त्याबरहुकूम भाषा म्हणजे शब्द आणि व्याकरणाचा मेळ किंवा भावना आणि विचारांच्या आदान-प्रदानाचे साधन नव्हे, तर भाषा ही एक जीवनदृष्टी आहे, भाषा हा एक जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. संस्कृती व सुख-दु:खाचे प्रकटीकरण आहे. बोलीपासून प्रमाणभाषेपर्यंत न्याय्य समायोजन वर्गरचनेत झाल्यास समावेशी भारताचे मॉडेल म्हणून त्याकडे बघू शकतो. परंतु, असा भारत निर्मिताचा भाग म्हणून हा मसुदा त्याकडे बघत नाही, तर भाषेच्या आधारावर गळती थांबण्याचा यांत्रिक विचार करते. (रा. शि. नि. अ. ४, पा. १०६) गळतीच्या मूलभूत कारणांना हात न घालता दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.राजकीय इच्छाशक्ती व प्रतिबद्धता नसल्यामुळे यांत्रिकपणेही मातृभाषा वा बहुभाषीय वर्गरचना अस्तित्वात येण्याची शक्यता वाटत नाही. मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या अतिरेकी प्रोत्साहनाला अंकुश लावणे गरजेचे आहे. असे करावयाचे तर प्रथम शिक्षणाच्या बाजारीकरणाला अंकुश लावावा लागतोे. याची कोणतीही हमी हा मसुदा देत नाही. उलट हे धोरण बाजारीकरणाचे निरंकुश धोरण स्वीकारते. शाळेच्या परिसरातील स्थानिकांची मदत घेऊन मातृभाषा किंवा बहुभाषीय वर्गरचनेचे स्वप्न यात रंगविले आहे. (रा.शि.नि.अ. २ पा. ७४) दुर्गम, ग्रामीण व आदिवासी परिसरातील शाळेत त्यांच्या जातीतील व त्यांची भाषा बोलणाºया शिक्षकांची नियुक्ती करून अपवादात्मक परिस्थिती वगळून बदली न करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. (रा.शि.नि. अ.५,पा. १६०, १६३) त्यातून परिसर-जात-बंदिस्ततेचे वास्तव दृढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डॉ. अशोक पळवेकरमहिला महाविद्यालय, चांदूर-रेल्वे, अमरावती

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या