शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

स्वप्न व स्वप्नरंजन

By admin | Updated: January 5, 2017 02:01 IST

आजपासून तेरा वर्षांनी देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे

आजपासून तेरा वर्षांनी देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे. स्वप्न बघणे तसे वाईट नसते. नरेंद्र मोदींना आपला देश सगळ्याच बाबतीत मोठा झालेला बघायचा आहे व तसे ते नेहमीच बोलून दाखवत असतात. त्यामुळे त्यांना भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता झालेला बघावासा वाटावा, यामध्ये वावगे काहीच नाही. फक्त स्वप्न आणि स्वप्नरंजन यामधला फरक त्यांनी ध्यानी घ्यायला हवा. गत काही वर्षात भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात निश्चितपणे आपली छाप उमटवली आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या १५ वर्षात, संशोधन प्रबंधांच्या प्रकाशनांमध्ये भारताने फ्रांस, रशिया, इटली, कॅनडा यासारख्या देशांना मागे टाकले आहे. ही निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे; पण त्याचवेळी ही बाबदेखील लक्षात घेतली पाहिजे, या बाबतीत केवळ संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक प्रगती महत्त्वाची असते. भारतात ज्या संशोधनांचा स्वामित्व हक्क (पेटंट) नोंदविला जातो, त्यापैकी बहुतांश संशोधने कधीच प्रत्यक्ष वापरात येत नाहीत; कारण त्यात तो दर्जाच नसतो! भारतात केल्या जाणाऱ्या बहुतांश शास्त्रीय संशोधनांमागे केवळ आचार्य (पीएचडी) ही पदवी आणि त्यायोगे वेतनवाढ, बढती, विदेश प्रवास इत्यादी लाभ पदरात पाडून घेणे हाच उद्देश असतो. इतर देशांमधील प्रबंधांची एका अक्षराचाही बदल न करता नक्कल करून आचार्य ही पदवी मिळविल्याच्या बातम्या अनेकदा उमटल्या आहेत. एवढे करूनही दर दहा हजार लोकसंख्येत संशोधकांची संख्या किती, या निकषावर भारत केनियासारख्या अविकसित आफ्रिकी देशाच्या तुलनेतही माघारलेला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे किती स्वामित्व हक्क नोंदविले गेले, या निकषावर स्थिती तपासू जाता, भारत विकसित राष्ट्रांच्या पासंगालाही पुरत नाही. भारतात २०१३ मध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे १७ स्वामित्व हक्क नोंदविले गेले होते, तर दक्षिण कोरियात ४,४५१! भारताचा शेजारी अन् प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्ये नोंदविल्या गेलेल्या स्वामित्व हक्कांची संख्या होती ५४१! संशोधन आणि विकास (आर अ‍ॅण्ड डी) या क्षेत्रावर विकसित देशांच्या तुलनेत केला जाणारा अत्यल्प खर्च हे त्यामागचे कारण आहे. जोपर्यंत ही परिस्थिती बदलली जाणार नाही, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा संशोधकांना उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. संशोधन न करता उचलेगिरी करून सादर केलेल्या प्रबंधांच्या संख्येच्या आधारे पंतप्रधान देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये नेऊन बसविण्याचे स्वप्न बघत असतील, तर मग दुर्दैवाने त्याला स्वप्नरंजनच म्हणावे लागेल!