शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न व स्वप्नरंजन

By admin | Updated: January 5, 2017 02:01 IST

आजपासून तेरा वर्षांनी देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे

आजपासून तेरा वर्षांनी देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे. स्वप्न बघणे तसे वाईट नसते. नरेंद्र मोदींना आपला देश सगळ्याच बाबतीत मोठा झालेला बघायचा आहे व तसे ते नेहमीच बोलून दाखवत असतात. त्यामुळे त्यांना भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता झालेला बघावासा वाटावा, यामध्ये वावगे काहीच नाही. फक्त स्वप्न आणि स्वप्नरंजन यामधला फरक त्यांनी ध्यानी घ्यायला हवा. गत काही वर्षात भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात निश्चितपणे आपली छाप उमटवली आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या १५ वर्षात, संशोधन प्रबंधांच्या प्रकाशनांमध्ये भारताने फ्रांस, रशिया, इटली, कॅनडा यासारख्या देशांना मागे टाकले आहे. ही निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे; पण त्याचवेळी ही बाबदेखील लक्षात घेतली पाहिजे, या बाबतीत केवळ संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक प्रगती महत्त्वाची असते. भारतात ज्या संशोधनांचा स्वामित्व हक्क (पेटंट) नोंदविला जातो, त्यापैकी बहुतांश संशोधने कधीच प्रत्यक्ष वापरात येत नाहीत; कारण त्यात तो दर्जाच नसतो! भारतात केल्या जाणाऱ्या बहुतांश शास्त्रीय संशोधनांमागे केवळ आचार्य (पीएचडी) ही पदवी आणि त्यायोगे वेतनवाढ, बढती, विदेश प्रवास इत्यादी लाभ पदरात पाडून घेणे हाच उद्देश असतो. इतर देशांमधील प्रबंधांची एका अक्षराचाही बदल न करता नक्कल करून आचार्य ही पदवी मिळविल्याच्या बातम्या अनेकदा उमटल्या आहेत. एवढे करूनही दर दहा हजार लोकसंख्येत संशोधकांची संख्या किती, या निकषावर भारत केनियासारख्या अविकसित आफ्रिकी देशाच्या तुलनेतही माघारलेला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे किती स्वामित्व हक्क नोंदविले गेले, या निकषावर स्थिती तपासू जाता, भारत विकसित राष्ट्रांच्या पासंगालाही पुरत नाही. भारतात २०१३ मध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे १७ स्वामित्व हक्क नोंदविले गेले होते, तर दक्षिण कोरियात ४,४५१! भारताचा शेजारी अन् प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्ये नोंदविल्या गेलेल्या स्वामित्व हक्कांची संख्या होती ५४१! संशोधन आणि विकास (आर अ‍ॅण्ड डी) या क्षेत्रावर विकसित देशांच्या तुलनेत केला जाणारा अत्यल्प खर्च हे त्यामागचे कारण आहे. जोपर्यंत ही परिस्थिती बदलली जाणार नाही, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा संशोधकांना उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. संशोधन न करता उचलेगिरी करून सादर केलेल्या प्रबंधांच्या संख्येच्या आधारे पंतप्रधान देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये नेऊन बसविण्याचे स्वप्न बघत असतील, तर मग दुर्दैवाने त्याला स्वप्नरंजनच म्हणावे लागेल!