शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 31, 2018 00:28 IST

तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरकारला अशी पळापळी करावी लागली नसती.

प्रिय धर्मा आजोबा,तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरकारला अशी पळापळी करावी लागली नसती. तुमच्यामुळे सगळ्यांचा सोमवार वाया गेला. म्हातारपणी हे असा त्रास देणं बरोबर नाहीय.तुम्ही तुमचं निवेदनं कलेक्टर, तहसीलदार यांना दिलं असतं तर कधी ना कधी तुम्हाला न्याय मिळाला असता. शेजारच्या नेत्याला जेवढा मोबदला मिळाला तेवढाच तुम्हाला मिळाला पाहिजे असा आग्रह कसा काय धरू शकता तुम्ही? कुठे तुम्ही आणि कुठे ते नेते? आमचे सरकार पारदर्शक आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र सिस्टिम उभी करतोय. पण तुम्हाला घाई झाली. आमची सिस्टिम उभी राहण्याच्या आतच तुम्ही विषाची परीक्षा केलीत... थोडे थांबला असता तर तुम्हाला आमची पारदर्शक यंत्रणा दिसली असती... पण तुम्ही घाई केली. तुमचं चुकलंच आजोबा... तहसीलदार, कलेक्टर, आयुक्त सगळ्यींना इतरही कामं असतात. या वयात तुम्ही सगळीकडं फिरत बसण्यापेक्षा तुमचं काम एखाद्या दलालाला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हालाही हवा तेवढा मोबदला मिळाला असता आणि त्या नेत्यालाही त्याचा हिस्सा मिळाला असता. पण नाही, तुम्ही पडलात गांधीवादी. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी ३० दिवसाच्या आत तुमचा प्रश्न सोडवण्याचे लेखी पत्र तुमच्या मुलाकडे दिलं. तुमच्या जमीन संपादनात चूक झाली असेल तर व्याजासह मोबदला देऊ असंही लिहून दिलं त्यांनी त्या पत्रात. अहो, तुम्ही गेल्याची बातमी कळताच धावत पळत, आमच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलं... अजून काय करायला पाहिजे होतं त्यांनी? तुम्ही मात्र घाई केली हे चुकलंच तुमचं! आमची घाई सुध्दा विरोधकांना पहावत नाही. आता ते म्हणू लागले की, व्याजासह मोबदला मिळेलही पण गेलेली जिंदगानी व्याजासहित थोडीच येणार? हे काय बोलणं झालं का बरं? आमच्या मंत्र्यांना नागपुरातली इतरही कामं खूप आहेत, अमृत पाणीपुरवठा योजनेचे टेंडर ५० टक्के जास्ती आलं तरी आम्ही पाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते टेंडर पास केलचं ना... मग तुम्हालाही दिला असता जास्तीचा मोबदला. पण तुम्ही पारदर्शकपणे ते काम दलालाला न देता स्वत:च पायपीट करत राहिलात. हे काय बरोबर नाही केलं तुम्ही आजोबा...नवाब मलिक सुध्दा विनाकारण आमच्या जयकुमार रावलांवर आरोप करू लागलेत. काय तर म्हणे त्यांनी त्या भागात जमिनी घेऊन ठेवल्या, तुम्हाला मोबदला देण्यासाठी ठेवलेली बैठक त्यांनीच दोनवेळा रद्द करायला लावली... अहो, इतर काही कामं असतील म्हणून बैठक रद्द झाली असेल. याचा अर्थ ती तुमच्यासाठी रद्द केली असा होता का? आता कोणीतरी म्हणालं की, मंत्र्यांच्या नावावर जर आपल्या जमिनी केल्या तर मोबदला जास्तीचा मिळेल. पण आता हे कळून काय उपयोग. तुम्ही तर घाई केलीत. नाहीतर ही आयडिया तुमच्या कामी आली असती ना...? सरकार बदललं म्हणजे सगळी सिस्टिम बदलते असं कसं वाटलं तुम्हाला? म्हणूनच म्हणालो, तुमचं चुकलचं धर्मा आजोबा... 

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र