शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

 ... हा तर ड्रॅगनचाच फुत्कार; पाकचे षडयंत्र वेळीच ओळखून जगासमोर मांडायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 06:20 IST

gilgit-baltistan : परराष्ट्र मंत्रालयाने दावा केल्यानुसार हा प्रदेश भाौगोलिक, सांस्कृतिक अशा सर्वच दृष्टींनी गेल्या वर्षी केंद्रशासित प्रदेश बनलेल्या लडाखचा, पर्यायाने भारताचा अविभाज्य भाग आहे.

पाकिस्तानने बेकायदेशीरीत्या ताब्यात ठेवलेल्या  गिलगिट-बाल्टिस्तानला पूर्ण राज्याचा दर्जा व न्यायालयाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून तिथे प्रांतीय असेम्ब्लीची निवडणूक घेण्याच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या घोषणेचा भारताने निषेध केला आणि तो भूभाग भारताचाच असल्याचे पुन्हा ठणकावून सांगितले हे बरे झाले.

परराष्ट्र मंत्रालयाने दावा केल्यानुसार हा प्रदेश भाौगोलिक, सांस्कृतिक अशा सर्वच दृष्टींनी गेल्या वर्षी केंद्रशासित प्रदेश बनलेल्या लडाखचा, पर्यायाने भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकच्या मंत्र्यांनीच पुलवामा अतिरेकी हल्ल्यात सहभागाची संसदेत दिलेली कबुली आणि विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेवरून इमरान सरकारची पुन्हा चव्हाट्यावर आलेली फजिती, यावरून लक्ष इतरत्र वळविण्यासाठीही हा डाव टाकलेला असू शकतो. परंतु, केवळ निषेध नोंदवून, विरोध दर्शवून भागणार नाही. चीनच्या हातचे बाहुले बनलेल्या पाकिस्तानचे या कृतीमागचे षडयंत्र वेळीच ओळखून ते जागतिक व्यासपीठावर आक्रमकपणे मांडायला हवे. गेल्या मे-जूनमध्ये लडाखमध्ये चीनची घुसखोरी, आता भारतासोबत सुरू असलेली शांततेची बोलणी, या पार्श्वभूमीवर, 2018च्या प्रशासकीय आदेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी 2019 मधील आदेशाची आताच पाकिस्तानला आठवण का आली, यामागील कट जगापुढे जायला हवा. 

काश्मीरसारखाच, किंबहुना त्याहून अधिक सुंदर, उंचच उंच पर्वतरांगा, बारमाही खळखळून वाहणाऱ्या नद्या, सुंदर निसर्ग असा गिलगिट-बाल्टिस्तान पृथ्वीवरचा स्वर्गच आहे. तिबेटच्या पठारावर उगम पावून लडाख, गिलगिट-बाल्टिस्तानातून पाकिस्तानमार्गे अरबी समुद्राला मिळणारी सिंधू नदी, एव्हरेस्टपेक्षा अवघ्या 237 मीटरने कमी उंचीचे के-2 हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे पर्वतशिखर असा ठेवा इथे आहे. पण, एव्हरेस्टसारखा तिथे पर्यटन व्यवसाय बहरलेला नाही. मानसरोवरासारखे सपतारा सरोवर या भागात आहे. पण, मोठे पाटबंधारे प्रकल्प नाहीत. चीनच्या मदतीने गेल्या जुलैमध्ये दायमेर येथे पाकिस्तानने जलविद्युत प्रकल्पाची घोषणा केली खरी. परंतु, त्यामागे विकासाऐवजी भारताला डिवचण्याचाच हेतू होता. पाकच्या या आगळिकीमागे चीनच आहे. आताच्या आगाऊपणाला लडाखच्या पूर्व सीमेवरील चीनच्या उद्दामपणाचा संदर्भ आहे. आर्थिक संकटात सापडलेले पाकिस्तान पूर्णपणे कह्यात ठेवण्यासाठी सामरिक, आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा गिलगिट-बाल्टिस्तान भूभाग हाताशी ठेवणे चीनसाठी महत्त्वाचे आहे. अर्थात हे डावपेच नवे नाहीत.

पाकव्याप्त काश्मीरसह 1947 मध्ये पाकिस्तानने बळकावलेल्या 78 हजार चौरस किलोमीटर भूभागापैकी 5164 चाौरस किमीचा एक तुकडा 1963 मध्येच पाकिस्तानने चीनला देऊन टाकला आहे. चायना-पाकिस्तान इकाॅनाॅमिक कॉरिडोरची सुरुवात गिलगिट-बाल्टिस्तानमधून होते आणि बलुचिस्तानातल्या ग्वादार बंदरापर्यंत तो कॉरिडोर जातो. त्या प्रकल्पासाठी चीनला हा प्रदेश अधिकृतपणे पाकच्या ताब्यात हवा आहे. त्याशिवाय, पूर्व लडाखमधील श्योक नदीच्या दोन्ही तीरांवरून प्रत्यक्ष ताबारेषेला समांतर जाणाऱ्या व हा टापू काराकोरम पासला जोडणाऱ्या दारबुक-श्योक-डीबीओ याअलीकडेच पूर्ण झालेल्या एकूणच उत्तर सीमेवरील संपर्कासाठी अत्यंत महत्त्वाच्या भारतीय  मार्गाला छेद देणे हादेखील चीनचा मनसुबा असू शकतो. यापैकी दाैलत बेग ओल्डी म्हणजे डीबीओ हे पठार बर्फाच्छादित सीमवेरील हवाई सज्जतेच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचे आहे. गिलगिट-बाल्टिस्तानशी संबंधित पाकच्या आगळिकीचे हे सारे संदर्भ आता जागतिक व्यासपीठावर जायलाच हवेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत