शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ड्रॅगनची भारतात हेरगिरी; देशापुढे नवी ‘तरंगती’ समस्या, श्रीलंकेत आलेल्या चीनी जहाजाचा मागचं राजकारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 07:31 IST

आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे.

गणेश देवकरमुख्य उपसंपादकआर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे. शेजारच्या सर्वच देशांना चीनच्या वर्चस्ववादी आणि विस्तारवादी धोरणाची झळ बसली आहे. भारतासोबत गेल्या काही दिवसांपासून डोकलामच्या निमित्ताने संघर्ष सुरु आहे. सीमा भागात घुसखोरी, गावे वसवणे, मोठे रस्ते आणि पुलांची उभारणी आदी वर्तनामुळे भारताच्या मनात चीनबाबत संशय निर्माण झाला आहे. अशातच चीनने भारताची हेरगिरी करण्यासाठी अत्याधुनिक बनावटीचे स्पाय शिप श्रीलंकेत तैनात केल्याने भारतापुढे नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.

भारताची चिंता का वाढली?   - हंबनटोटा तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ४५१ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतानेया जहाजावर करडी नजर ठेवली आहे. - दक्षिणेतील भारताचे प्रमुख लष्करी व अण्वस्त्र तळ कल्पकम आणि कुडनकुलम हे जहाजाच्या ट्रॅकिंग रेंजमध्ये येतात. - केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील अनेक व्यापारी बंदरे याच्या रडारमध्ये येतात. संरक्षण तज्ज्ञांच्या मते भारताचे दक्षिणेतील नौदलाचे तळ आणि आण्विक तळांची हेरगिरी करण्यासाठीच चीनने हे जहाज जाणीवपूर्वक पाठवले आहे. - कर्जाच्या बोजामुळे लंका सध्या चीनच्या एकप्रकारे अधीन आहे. याचा फायदा घेत हिंदी महासागरात आपला दबदबा वाढावा, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करीत आहे. 

शीतयुद्धकाळात वापर वाढला- १९२० ते १९३० या कालखंडात अमेरिकेच्या वतीने गोल्ड स्टार या स्पाय शिपला जपान, चीन आणि फिलिपिन्स या देशांची हेरगिरी करण्यासाठी पाठवल्याचे आढळते. जपानच्या पर्ल हार्बरवर अणुबाॅम्बचा हल्ला करण्याआधी याच जहाजाने त्या परिसराची इत्यंभूत माहिती पुरविली होती.- दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका व रशिया या २ महासत्तांमध्ये विभागले गेले. या महासत्तांनी एकमेकांना सामर्थ्याची चुणूक दाखवून देण्याची, एकमेकांना जोखण्याची तसेच शह-काटशह देण्याची एकही संधी पुढच्या काळात सोडली नाही. हाच कालखंड शीतयुद्धाचा म्हणून संबोधला जातो. - या काळात एकमेकांच्या देशात गुप्तहेर पाठवून हेरगिरी करणे, माहिती चोरण्यासाठी धाडसी मोहिमा आखणे, महत्त्वाकांक्षी उपक्रम हाणून पाडण्यासाठी कट. कारस्थाने रचणे आदी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यासाठी स्पाय शिपचा वापरही होऊ लागला. - अण्वस्त्र चाचणी, क्षेपणास्त्र चाचणी, संहारक अस्त्राची चाचणी यावर लक्ष ठेवणे, हा हेरगिरीचा प्रमुख उद्देश असायचा. हेरगिरी करताना शत्रू देशांच्या व्यापारी तसेच मालवाहू जहाजांसोबत किनारपट्टी आणि महत्त्वाच्या बंदरांवर होणाऱ्या हालचालींच्या नोंदीही ठेवल्या जाऊ लागल्या. श्रीलंका हतबल  जहाजाला इथे येण्यास चीनला परवानगी नाकारणे लंकेच्या हातात नव्हते. चीनकडून घेतलेल्या १.५ अरब डॉलरच्या कर्जाची परतफेड न केल्याने चीनने श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या लीजवर नियंत्रणात घेतले आहे. चीनने कोणतेही पाऊल उचलल्यास त्याविरोधात आवाज उठवता येईल, अशी स्थिती सध्या श्रीलंकेत नाही.  नेमके काय आहे?देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संशोधन, माहिती संकलन, माहिती विश्लेषण, शत्रूदेशात हेरगिरी आदी विशेष हेतूने स्पाय शिप तयार केली जातात. याच हेतूने चीनने बनविलेले युआन वांग ५ हे स्पाय शिप मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाले. २२ ऑगस्टपर्यंत तिथेच थांबणार आहे. हे २९ सप्टेंबर २००७पासून चीनच्या सेवेत आहे. जियांगन शिपयार्डमध्ये याची बांधणी झाली. ५,२२२ मीटर लांब, २५.२ मीटर रुंदवजनवाहक क्षमता: २५ हजार टन- शक्तिशाली ट्रॅकिंग शिपवर उच्च क्षमतेचे रडार, पॅराबोलिक ट्रॅकिंग अँटेना तसेच अनेक प्रकारचे सेंसर्स आहेत. - ७५० किमी दूर अंतरावरील माहिती हे जहाज गोळा करु शकते. उपग्रह, रॉकेट, क्षेपणास्त्र यांची माहिती अचूकपणे गोळा करू शकते. - विशेष मोहिमा सुरु नसताना जहाजे चीन सरकारला अंतराळ संशोधन मोहीम, इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन, दूरसंचार सेवा व संशोधन आदी पातळ्यांवर महत्त्वाची माहिती गोळा करणे, नोंदी टिपणे ही मदत करते, अशी कामे करणाऱ्या विभागाला स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स असे म्हणतात. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत