शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

ड्रॅगनची भारतात हेरगिरी; देशापुढे नवी ‘तरंगती’ समस्या, श्रीलंकेत आलेल्या चीनी जहाजाचा मागचं राजकारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 07:31 IST

आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे.

गणेश देवकरमुख्य उपसंपादकआर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे. शेजारच्या सर्वच देशांना चीनच्या वर्चस्ववादी आणि विस्तारवादी धोरणाची झळ बसली आहे. भारतासोबत गेल्या काही दिवसांपासून डोकलामच्या निमित्ताने संघर्ष सुरु आहे. सीमा भागात घुसखोरी, गावे वसवणे, मोठे रस्ते आणि पुलांची उभारणी आदी वर्तनामुळे भारताच्या मनात चीनबाबत संशय निर्माण झाला आहे. अशातच चीनने भारताची हेरगिरी करण्यासाठी अत्याधुनिक बनावटीचे स्पाय शिप श्रीलंकेत तैनात केल्याने भारतापुढे नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.

भारताची चिंता का वाढली?   - हंबनटोटा तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ४५१ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतानेया जहाजावर करडी नजर ठेवली आहे. - दक्षिणेतील भारताचे प्रमुख लष्करी व अण्वस्त्र तळ कल्पकम आणि कुडनकुलम हे जहाजाच्या ट्रॅकिंग रेंजमध्ये येतात. - केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील अनेक व्यापारी बंदरे याच्या रडारमध्ये येतात. संरक्षण तज्ज्ञांच्या मते भारताचे दक्षिणेतील नौदलाचे तळ आणि आण्विक तळांची हेरगिरी करण्यासाठीच चीनने हे जहाज जाणीवपूर्वक पाठवले आहे. - कर्जाच्या बोजामुळे लंका सध्या चीनच्या एकप्रकारे अधीन आहे. याचा फायदा घेत हिंदी महासागरात आपला दबदबा वाढावा, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करीत आहे. 

शीतयुद्धकाळात वापर वाढला- १९२० ते १९३० या कालखंडात अमेरिकेच्या वतीने गोल्ड स्टार या स्पाय शिपला जपान, चीन आणि फिलिपिन्स या देशांची हेरगिरी करण्यासाठी पाठवल्याचे आढळते. जपानच्या पर्ल हार्बरवर अणुबाॅम्बचा हल्ला करण्याआधी याच जहाजाने त्या परिसराची इत्यंभूत माहिती पुरविली होती.- दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका व रशिया या २ महासत्तांमध्ये विभागले गेले. या महासत्तांनी एकमेकांना सामर्थ्याची चुणूक दाखवून देण्याची, एकमेकांना जोखण्याची तसेच शह-काटशह देण्याची एकही संधी पुढच्या काळात सोडली नाही. हाच कालखंड शीतयुद्धाचा म्हणून संबोधला जातो. - या काळात एकमेकांच्या देशात गुप्तहेर पाठवून हेरगिरी करणे, माहिती चोरण्यासाठी धाडसी मोहिमा आखणे, महत्त्वाकांक्षी उपक्रम हाणून पाडण्यासाठी कट. कारस्थाने रचणे आदी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यासाठी स्पाय शिपचा वापरही होऊ लागला. - अण्वस्त्र चाचणी, क्षेपणास्त्र चाचणी, संहारक अस्त्राची चाचणी यावर लक्ष ठेवणे, हा हेरगिरीचा प्रमुख उद्देश असायचा. हेरगिरी करताना शत्रू देशांच्या व्यापारी तसेच मालवाहू जहाजांसोबत किनारपट्टी आणि महत्त्वाच्या बंदरांवर होणाऱ्या हालचालींच्या नोंदीही ठेवल्या जाऊ लागल्या. श्रीलंका हतबल  जहाजाला इथे येण्यास चीनला परवानगी नाकारणे लंकेच्या हातात नव्हते. चीनकडून घेतलेल्या १.५ अरब डॉलरच्या कर्जाची परतफेड न केल्याने चीनने श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या लीजवर नियंत्रणात घेतले आहे. चीनने कोणतेही पाऊल उचलल्यास त्याविरोधात आवाज उठवता येईल, अशी स्थिती सध्या श्रीलंकेत नाही.  नेमके काय आहे?देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संशोधन, माहिती संकलन, माहिती विश्लेषण, शत्रूदेशात हेरगिरी आदी विशेष हेतूने स्पाय शिप तयार केली जातात. याच हेतूने चीनने बनविलेले युआन वांग ५ हे स्पाय शिप मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाले. २२ ऑगस्टपर्यंत तिथेच थांबणार आहे. हे २९ सप्टेंबर २००७पासून चीनच्या सेवेत आहे. जियांगन शिपयार्डमध्ये याची बांधणी झाली. ५,२२२ मीटर लांब, २५.२ मीटर रुंदवजनवाहक क्षमता: २५ हजार टन- शक्तिशाली ट्रॅकिंग शिपवर उच्च क्षमतेचे रडार, पॅराबोलिक ट्रॅकिंग अँटेना तसेच अनेक प्रकारचे सेंसर्स आहेत. - ७५० किमी दूर अंतरावरील माहिती हे जहाज गोळा करु शकते. उपग्रह, रॉकेट, क्षेपणास्त्र यांची माहिती अचूकपणे गोळा करू शकते. - विशेष मोहिमा सुरु नसताना जहाजे चीन सरकारला अंतराळ संशोधन मोहीम, इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन, दूरसंचार सेवा व संशोधन आदी पातळ्यांवर महत्त्वाची माहिती गोळा करणे, नोंदी टिपणे ही मदत करते, अशी कामे करणाऱ्या विभागाला स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स असे म्हणतात. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत