शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशिक्षण संस्थेची ७७ वर्षांची वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 07:23 IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मुळे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. या संस्थेला उद्या ७७ वर्षे पूर्ण होत आहेत...

 सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग

पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केली. ही संस्था ८ जुलै २०२२ रोजी आपल्या अस्तित्वाची ७७ वर्षे पूर्ण करीत आहे. मागासवर्गीयांच्या दयनीय शैक्षणिक परिस्थितीने आंबेडकरांना या वर्गाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यास प्रवृत्त केले. त्यांनी २९ मे १९२८ रोजी ब्रिटिश सरकारला केलेल्या निवेदनात १७७२च्या ब्रिटिश सरकारच्या कायद्याने मागासवर्गीयांना शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा प्राचीन व मध्ययुगीन वारसा चालूच ठेवला होता हे निर्देशनास आणून दिले. परिणामी १७७२ ते १८५५ या ८३ वर्षांच्या काळात बहिष्कृत वर्गाला शिक्षणाची दारे बंद होती. 

ब्रिटिशांनी शेवटी १८५५ला गरीब बहिष्कृत वर्गासाठी शिक्षण खुले केले. मात्र उच्च जातींच्या प्रखर विरोधामुळे इतर जातींसाठी वेगळ्या शाळा काढल्या. तरीही शैक्षणिक प्रवेशदरात फारशी सुधारणा झाली नाही. १९२३ ला त्यांचा प्रवेशदर जवळपास नगण्यच होता. म्हणूनच १९२० ते १९४४ पर्यंत आंबेडकरांनी बहिष्कृत वर्गाच्या शैक्षणिक विकासासंबंधीच्या धोरणासाठी सतत संघर्ष केला. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण आणि शिष्यवृत्ती मिळवण्यात आंबेडकर यशस्वी झाले. ७८ वर्षे जुन्या असलेल्या या दोन्ही शिष्यवृत्ती आतापर्यंत सुरू आहेत. मात्र डॉ. आंबेडकर तिथेच थांबले नाहीत. त्यांनी विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. १९४५ मध्ये मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. १९४६ मध्ये प्रथम मुंबईला व नंतर १९५० मध्ये औरंगाबादला महाविद्यालये स्थापन केली. आता पीईएसच्या मुंबई, औरंगाबाद, पुणे, नांदेड, बिहार, बंगळुरू, कोल्हापूर, पंढरपूर व महाड येथे कला, विज्ञान, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा, इंजीनिअरिंग, पॉलिटेक्निक, कॉम्प्युटर, फिजिकल एज्युकेशन अशा ३१ संस्था व १२ वसतिगृहे आहेत. मागील ७७ वर्षांत पीईएसमुळे अगणित विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. मासिक शिष्यवृत्ती, पुस्तके, भत्ते व वसतिगृहे ही अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील यशाचे गमक ठरले. 

आंबेडकरांनी त्यांच्या संस्थेसमोर शिक्षणाची विशिष्ट उद्दिष्टेसुद्धा निश्चित केली. त्यांच्या दृष्टिक्षेपातील शिक्षणाचे तिहेरी ध्येय, वैज्ञानिक, व्यावसायिक व नैतिक शिक्षण देणे हे होते. वैज्ञानिक शिक्षण हे व्यक्तीची दृष्टी प्रबुद्ध करेल तर व्यावसायिक शिक्षण रोजगारक्षमता वाढवेल. त्यांनी नैतिक शिक्षणालासुद्धा लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने समान महत्त्व दिले. पीईएसच्या महाविद्यालयांनी दिलेल्या शिक्षणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांची आर्थिक प्रगती झाली व जातीवर आधारित असमान समाजात सामाजिक परिवर्तन आणणारी पिढी उभी केली गेली. पीईएसच्या शिक्षणाने मिळवलेली ही सर्वोच्च व उदात्त राष्ट्रीय कामगिरी आहे.

वंचित वर्गाची शैक्षणिक प्रगती मात्र अजूनही कमी आहे.  याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने पीईएस व त्यासारख्या संस्थांना विशेष साहाय्य दिले नाही. पीईएसला ७७ वर्षे पूर्ण होत असताना ज्या पायाभूत सुविधा सध्या अत्यंत विदारक स्थितीत आहेत, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने साहाय्य करण्याची हीच योग्य वेळ आहे. पीईएसला सक्षम बनविण्याची जबाबदारी लोकांचीही आहे, कारण बाबासाहेबांनी तिला लोकांची संस्था म्हणून उभे केले. ‘समाजाला परतावा’ या धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पीईएसची पुनर्बांधणी करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा. पीईएसचा ७७ वर्षांचा प्रवास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला ही एक मोठी आदरांजली ठरेल.