शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशिक्षण संस्थेची ७७ वर्षांची वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 07:23 IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मुळे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. या संस्थेला उद्या ७७ वर्षे पूर्ण होत आहेत...

 सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग

पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केली. ही संस्था ८ जुलै २०२२ रोजी आपल्या अस्तित्वाची ७७ वर्षे पूर्ण करीत आहे. मागासवर्गीयांच्या दयनीय शैक्षणिक परिस्थितीने आंबेडकरांना या वर्गाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यास प्रवृत्त केले. त्यांनी २९ मे १९२८ रोजी ब्रिटिश सरकारला केलेल्या निवेदनात १७७२च्या ब्रिटिश सरकारच्या कायद्याने मागासवर्गीयांना शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा प्राचीन व मध्ययुगीन वारसा चालूच ठेवला होता हे निर्देशनास आणून दिले. परिणामी १७७२ ते १८५५ या ८३ वर्षांच्या काळात बहिष्कृत वर्गाला शिक्षणाची दारे बंद होती. 

ब्रिटिशांनी शेवटी १८५५ला गरीब बहिष्कृत वर्गासाठी शिक्षण खुले केले. मात्र उच्च जातींच्या प्रखर विरोधामुळे इतर जातींसाठी वेगळ्या शाळा काढल्या. तरीही शैक्षणिक प्रवेशदरात फारशी सुधारणा झाली नाही. १९२३ ला त्यांचा प्रवेशदर जवळपास नगण्यच होता. म्हणूनच १९२० ते १९४४ पर्यंत आंबेडकरांनी बहिष्कृत वर्गाच्या शैक्षणिक विकासासंबंधीच्या धोरणासाठी सतत संघर्ष केला. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण आणि शिष्यवृत्ती मिळवण्यात आंबेडकर यशस्वी झाले. ७८ वर्षे जुन्या असलेल्या या दोन्ही शिष्यवृत्ती आतापर्यंत सुरू आहेत. मात्र डॉ. आंबेडकर तिथेच थांबले नाहीत. त्यांनी विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. १९४५ मध्ये मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. १९४६ मध्ये प्रथम मुंबईला व नंतर १९५० मध्ये औरंगाबादला महाविद्यालये स्थापन केली. आता पीईएसच्या मुंबई, औरंगाबाद, पुणे, नांदेड, बिहार, बंगळुरू, कोल्हापूर, पंढरपूर व महाड येथे कला, विज्ञान, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा, इंजीनिअरिंग, पॉलिटेक्निक, कॉम्प्युटर, फिजिकल एज्युकेशन अशा ३१ संस्था व १२ वसतिगृहे आहेत. मागील ७७ वर्षांत पीईएसमुळे अगणित विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. मासिक शिष्यवृत्ती, पुस्तके, भत्ते व वसतिगृहे ही अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील यशाचे गमक ठरले. 

आंबेडकरांनी त्यांच्या संस्थेसमोर शिक्षणाची विशिष्ट उद्दिष्टेसुद्धा निश्चित केली. त्यांच्या दृष्टिक्षेपातील शिक्षणाचे तिहेरी ध्येय, वैज्ञानिक, व्यावसायिक व नैतिक शिक्षण देणे हे होते. वैज्ञानिक शिक्षण हे व्यक्तीची दृष्टी प्रबुद्ध करेल तर व्यावसायिक शिक्षण रोजगारक्षमता वाढवेल. त्यांनी नैतिक शिक्षणालासुद्धा लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने समान महत्त्व दिले. पीईएसच्या महाविद्यालयांनी दिलेल्या शिक्षणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांची आर्थिक प्रगती झाली व जातीवर आधारित असमान समाजात सामाजिक परिवर्तन आणणारी पिढी उभी केली गेली. पीईएसच्या शिक्षणाने मिळवलेली ही सर्वोच्च व उदात्त राष्ट्रीय कामगिरी आहे.

वंचित वर्गाची शैक्षणिक प्रगती मात्र अजूनही कमी आहे.  याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने पीईएस व त्यासारख्या संस्थांना विशेष साहाय्य दिले नाही. पीईएसला ७७ वर्षे पूर्ण होत असताना ज्या पायाभूत सुविधा सध्या अत्यंत विदारक स्थितीत आहेत, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने साहाय्य करण्याची हीच योग्य वेळ आहे. पीईएसला सक्षम बनविण्याची जबाबदारी लोकांचीही आहे, कारण बाबासाहेबांनी तिला लोकांची संस्था म्हणून उभे केले. ‘समाजाला परतावा’ या धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पीईएसची पुनर्बांधणी करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा. पीईएसचा ७७ वर्षांचा प्रवास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला ही एक मोठी आदरांजली ठरेल.