शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘एव्हरेस्ट’वर एकटे जाऊ नका, पैसे जास्त मोजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 06:09 IST

नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईसाठी शुल्कात वाढ केली आहे, शिवाय अष्टहजारी शिखरांवर ‘सोलो’ चढाईला बंदी घातली आहे, त्यानिमित्ताने...

संस्थापक, गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग

जगातील प्रत्येक गिर्यारोहकाला एकदा तरी आपण एव्हरेस्ट सर करावं, असं वाटत असतं. त्यामुळेच नेपाळबद्दल त्याला वाटणारी ओढ काही वेगळीच असते. नेपाळ सरकारने नुकतेच घेतलेले दोन निर्णय गिर्यारोहण या क्रीडा प्रकाराच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचा विचार करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत.

गेल्या काही वर्षांत ‘एव्हरेस्ट समीट’ला एक वेगळंच ‘ग्लॅमर’ आलं आहे. गिर्यारोहणाचा सीझन जवळ येतो तशी जगभरातील गिर्यारोहकांची पावलं नेपाळच्या दिशेने वळतात. नेपाळच्या अर्थव्यवस्थेत गिर्यारोहण आणि पर्यटन या दोन क्षेत्रांचं योगदान मोठं आहे. काही वर्षांपूर्वी एव्हरेस्ट समीट पूर्ण करण्यासाठी गिर्यारोहकांची रांग लागलेला एक फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. त्यादरम्यान एव्हरेस्टच्या वाटेवर होणारे अपघात हाही चिंतेचा विषय होता. नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईसाठी नावनोंदणी करण्यासाठीच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अकरा हजार अमेरिकन डॉलर्सवरून हे शुल्क पंधरा हजार अमेरिकन डॉलर्स एवढं करण्यात आलं आहे. हे वाढीव शुल्क सप्टेंबरपासून आकारलं जाईल, असा  अंदाज आहे; मात्र शुल्क वाढवल्यामुळे एव्हरेस्ट मोहिमा करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होईल असं नाही. गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नेपाळ सरकारने अष्टहजारी शिखरांवर ‘सोलो’, अर्थात एकट्याने चढाई करण्यावर नेपाळने बंदी घातली आहे. एखादा गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाई करतो तेव्हा त्याला अनेकजण सहकार्य करत असतात. कुणी त्याचं सामान वाहत असतं. कुणी त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत असतं. कुणी त्याच्या सुरक्षेची काळजी वाहत असतं. त्यामुळे त्या एकट्याचं पाऊल एव्हरेस्टवर पडतं तेव्हा ते त्याला सहकार्य करत असलेल्या प्रत्येकाचं यश आहे, असं आम्ही मानतो.

गिरिप्रेमीचा संघ कांचनजुंगा मोहिमेवर असतानाचा एक प्रसंग मला आठवतो. चिली या देशाचा एक नागरिक सोलो चढाई करण्यासाठी आला होता. या गिर्यारोहकाचा संकल्प काहीसा अतिरेकी होता. ऑक्सिजनशिवाय एकट्याने चढाई करण्याचा त्याचा मानस होता. बर्फाच्छादित शिखरांच्या माथ्यावर सूर्य येतो तेव्हा तिथली परिस्थिती भयंकर असते. गिर्यारोहकांच्या  तंबूत प्रचंड उकडतं. तशा परिस्थितीत शरीराचं तापमान योग्य राखणं हे आव्हानात्मकच असतं.

कॅम्प टू मुक्कामावर तो चिलीचा गिर्यारोहक आमच्याबरोबर होता. सोलो समीट असल्यामुळे साहजिकच त्याला कुणाची मदत नव्हती. तशात त्याची स्लीपिंग बॅग उडाली. आमच्यापैकी काहींनी आलटून-पालटून स्वतःच्या स्लीपिंग बॅग देऊन त्याला मदत केली. दुर्दैव म्हणजे पुढे समीटच्या मार्गावर त्याचा मृत्यू झाला. त्याचा जीपीएस ट्रॅकर हलत नाही म्हणून ही गोष्ट लक्षात तरी आली. एरवी अशा सोलो चढाई करणाऱ्यांचं वाटेत काही बरं-वाईट झालं तरी पत्ता लागत नाही. अशा वेळी नेपाळ सरकारने त्या देशाच्या सरकारला घटनेची माहिती देणं वगैरे बरेच प्रकार असतात. त्यामुळे प्रशासनावरचा ताण वाढतो. माझ्या गिर्यारोहण कारकिर्दीतले असे अनेक प्रसंग मला आठवतात. त्यामुळेच सोलो समीट ही फार स्वागतार्ह गोष्ट नाही, असं माझं मत आहे.

शेर्पा हा गिर्यारोहण मोहिमांची लाइफलाइन असतो. गिर्यारोहकांचं सामान वाहण्यापासून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यापर्यंत शेर्पा सगळं काही करतात. एवढंच नाही तर ते स्थानिक असल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमताही प्रचंड असते. मोहिमांदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढवली तरी त्यातून मार्ग काढण्याचं कसब शेर्पांकडे असतं. एखादा गिर्यारोहक कितीही तयारीचा असेल तरी नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाहीत. शिवाय सोलो समीट करताना सामान वाहण्यापासून प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. साहजिकच काय किती बरोबर न्यायचं यावरही मर्यादा येतात.

त्यामुळे जोखीम प्रचंड असते. म्हणून अष्टहजारी शिखरांवर सोलो चढाई करण्यावर बंदी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

मोहिमेवरून परतताना हिमालयाच्या पर्यावरणाला हानिकारक ठरेल असा सगळा कचरा परत आणणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि ते पारही पाडतो; पण गिर्यारोहकांकडून मोठं शुल्क घेणाऱ्या नेपाळने यापुढे पर्यावरणाशी असलेली बांधिलकीही जपावी, असं मला मनोमन वाटतं.