शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 09:00 IST

सरकार आज पडणार, उद्या कोसळणार असं छातीठोकपणे जो तो सांगत फिरणार. पण म्हणजे नेमकं काय होणार?" असं विचारलं की मात्र सगळे कावरेबावरे होणार!

- यदु जोशी

चार राज्यांमधील आणि त्यातही उत्तर प्रदेशमधील भाजपच्या धडाकेबाज विजयानंतर आता महाराष्ट्रात सत्ताबदल होणार अशी चर्चा सध्या जोरात आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं तर्क देत सुटला आहे. तर्कांच्या बाजारात अर्काचा मात्र पत्ता नाही. सरकार पडणार, आज जाणार, उद्या कोसळणार असं दावे के साथ सांगणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. असे लोक सुरुवात एकदम जोरात करतात पण "सरकार पडण्याचा फॉर्म्युला काय?"- असं विचारलं की जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखे कावरेबावरे होतात. काहीतरी होईल असं छातीठोकपणे सांगणारे लोक "नेमकं काय होईल?" असं विचारलं की गोंधळतात. 

टोकाचे भाजप विरोधक असलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी धाडकन कोसळेल असं वक्तव्य केल्यानं चर्चेला अधिकच बळ आलं खरं पण सरकार खरंच पडायचं असेल तर हवेत गोळीबार करून चालणार नाही. केवळ आशावाद वा कुणाच्या इच्छेवर ते पडू शकत नाही. कोणाला वाटतं म्हणून सरकार पडलं असतं तर ते आतापर्यंत हजार वेळा पडलं असतं ना भाऊ! ‘ कानून सबूत मांगता है और सरकार के लिए आकडा मंगता है भाई आकडा’...सत्तेचं गणित कुठूनही फिरवलं तरी ते भाजपच्या बाजूनं पडताना दिसत नाही. त्यांच्यासाठी आकड्यांच्या पिचकारीतून विजयाच्या रंगांची उधळण होणं कठीण दिसतं. 

भाजपवाले राष्ट्रवादीसोबत किंवा शिवसेनेसोबत बसतील ही रेकॉर्ड घासून गुळगुळीत झाली आहे. भाजपनं या दोन्ही पक्षांशी जो कमालीचा पंगा गेल्या दोन वर्षात घेतलाय त्यानं या दोन्ही शक्यता आता संपुष्टात आणल्या आहेत. अश्यावेळी राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती आहे. भाजप दोन्ही पक्षांवर मिसाइलवर मिसाइल फेकत आहे आणि महाविकास आघाडी सरकार भाजपशी १८५७ च्या बंडातील बंदुका घेवून लढत आहे. आता कुठे दरेकरांना हात लावला. मूळ भाजपच्या एकाही नेत्याला धक्का लावण्याची हिंमत राज्य सरकार अद्याप दाखवू शकलेलं नाही.

गिरीश महाजनांना गोत्यात आणायला निघाले होते पण देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यावर बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देता देता चार दिवस लागले, यावरून काय ते समजून घ्या. ‘गोवर्धन’ पर्वत अडचणीत आल्याची किनार त्याला असू शकते.

देवेंद्र फडणवीस हे गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उद्या महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणण्यासाठीही तेच शिल्पकार ठरतील का? उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उप-शिल्पकार ठरतील का?. बंडोबा होवून लगेच थंडोबा झालेले अजित पवार आता बंड करण्याची ताकद गमावून बसले आहेत. ते स्वत:तील शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानासारखे वाटतात. सूर्य गिळायला निघालेल्या हनुमानावर इंद्राने वज्रप्रहार केला अन् नंतर सगळ्या देवांनी मिळून त्याला शक्तीचं विस्मरण होईल असा शाप दिला होता. 

मोठ्या झाडाखालचं छोटं झाड असतं, तसं अजितदादांचं  झालं आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं वाटत नाही. जय भवानी, जय शिवाजी, भगवा अन् बाळासाहेब हे चार शब्द सोडून ते चार दिवसही राहू शकणार नाहीत. अजूनही भाजपसोबत गेलं पाहिजे असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे आणि तोदेखील अप्रत्यक्षपणे धरण्याइतपतच त्यांची मजल जावू शकेल.ते ठाणेदार आहेत, ठाणेदारच राहतील.

विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. विधानभवनच्या पायऱ्यांवर, पायऱ्यांखाली आजीमाजी मंत्री आमदार, पत्रकारांच्या चर्चा झडत असतात. काही जण छातीठोकपणे दावे-प्रतिदावे करत असतात. त्यातलेच एक अंदाज देत होते की तब्येतीच्या अनेक मर्यादा असलेले मुख्यमंत्री एक-दोन महिन्यात उपचारांसाठी अमेरिकेला जातील आणि त्यापूर्वी मोठा बदल होईल. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद ही जिद्द पूर्ण झाल्यानं ते आता मित्रपक्ष राष्ट्रवादीला संधी देतील आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील. सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून पक्ष त्यांना हस्तांतरित करणं मोठ्या साहेबांना सोपं जाईल... आणि मग आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील.

काँग्रेसचे दिवसच वाईट

यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही असं गेल्या अधिवेशनादरम्यान याच स्तंभात लिहिलं होतं, आता  पुन्हा तेच लिहिण्याची वेळ आली आहे. नाना पटोले यांनी ज्या घाईघाईत अध्यक्षपद सोडलं ते टाळलं असतं तर आजची वेळ आली नसती असंही बोललं जातं. राज्यपालांनी अपेक्षेनुसार खोडा टाकलाच पण काँग्रेसचे मित्रपक्षही अध्यक्षपद काँग्रेसला देण्याबाबत उत्सुक दिसत नाहीत. काँग्रेसचे एकूणच  वाईट दिवस सुरू आहेत.

अजितदादांचा विक्रम मोडला-

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांच्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नेत्याच्या नावे हा विक्रम होता. २०१९ च्या निवडणुकीत ते १६,६५,२६७ मतांनी जिंकले. आजवर देशात एवढं मताधिक्य कोणी घेतलेलं नव्हतं.

यावेळी उत्तर प्रदेशात दोघांनी त्यांचा हा विक्रम मोडला. साहिबाबादमधून भाजपचे सुनीलकुमार शर्मा २,१४,८३५ मतांनी जिंकले. नोएडामधून १,८१,५१३ मतांनी जिंकलेले पंकज सिंग हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र आहेत. आता २०२४ मध्ये अजिदादांना नवा विक्रम करावा लागेल. तेव्हाही त्यांच्या विरोधात गोपीचंद पडळकरच लढावेत ही इच्छा ते नव्या विक्रमासाठी करीत असावेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस