शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 09:00 IST

सरकार आज पडणार, उद्या कोसळणार असं छातीठोकपणे जो तो सांगत फिरणार. पण म्हणजे नेमकं काय होणार?" असं विचारलं की मात्र सगळे कावरेबावरे होणार!

- यदु जोशी

चार राज्यांमधील आणि त्यातही उत्तर प्रदेशमधील भाजपच्या धडाकेबाज विजयानंतर आता महाराष्ट्रात सत्ताबदल होणार अशी चर्चा सध्या जोरात आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं तर्क देत सुटला आहे. तर्कांच्या बाजारात अर्काचा मात्र पत्ता नाही. सरकार पडणार, आज जाणार, उद्या कोसळणार असं दावे के साथ सांगणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. असे लोक सुरुवात एकदम जोरात करतात पण "सरकार पडण्याचा फॉर्म्युला काय?"- असं विचारलं की जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखे कावरेबावरे होतात. काहीतरी होईल असं छातीठोकपणे सांगणारे लोक "नेमकं काय होईल?" असं विचारलं की गोंधळतात. 

टोकाचे भाजप विरोधक असलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी धाडकन कोसळेल असं वक्तव्य केल्यानं चर्चेला अधिकच बळ आलं खरं पण सरकार खरंच पडायचं असेल तर हवेत गोळीबार करून चालणार नाही. केवळ आशावाद वा कुणाच्या इच्छेवर ते पडू शकत नाही. कोणाला वाटतं म्हणून सरकार पडलं असतं तर ते आतापर्यंत हजार वेळा पडलं असतं ना भाऊ! ‘ कानून सबूत मांगता है और सरकार के लिए आकडा मंगता है भाई आकडा’...सत्तेचं गणित कुठूनही फिरवलं तरी ते भाजपच्या बाजूनं पडताना दिसत नाही. त्यांच्यासाठी आकड्यांच्या पिचकारीतून विजयाच्या रंगांची उधळण होणं कठीण दिसतं. 

भाजपवाले राष्ट्रवादीसोबत किंवा शिवसेनेसोबत बसतील ही रेकॉर्ड घासून गुळगुळीत झाली आहे. भाजपनं या दोन्ही पक्षांशी जो कमालीचा पंगा गेल्या दोन वर्षात घेतलाय त्यानं या दोन्ही शक्यता आता संपुष्टात आणल्या आहेत. अश्यावेळी राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती आहे. भाजप दोन्ही पक्षांवर मिसाइलवर मिसाइल फेकत आहे आणि महाविकास आघाडी सरकार भाजपशी १८५७ च्या बंडातील बंदुका घेवून लढत आहे. आता कुठे दरेकरांना हात लावला. मूळ भाजपच्या एकाही नेत्याला धक्का लावण्याची हिंमत राज्य सरकार अद्याप दाखवू शकलेलं नाही.

गिरीश महाजनांना गोत्यात आणायला निघाले होते पण देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यावर बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देता देता चार दिवस लागले, यावरून काय ते समजून घ्या. ‘गोवर्धन’ पर्वत अडचणीत आल्याची किनार त्याला असू शकते.

देवेंद्र फडणवीस हे गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उद्या महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणण्यासाठीही तेच शिल्पकार ठरतील का? उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उप-शिल्पकार ठरतील का?. बंडोबा होवून लगेच थंडोबा झालेले अजित पवार आता बंड करण्याची ताकद गमावून बसले आहेत. ते स्वत:तील शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानासारखे वाटतात. सूर्य गिळायला निघालेल्या हनुमानावर इंद्राने वज्रप्रहार केला अन् नंतर सगळ्या देवांनी मिळून त्याला शक्तीचं विस्मरण होईल असा शाप दिला होता. 

मोठ्या झाडाखालचं छोटं झाड असतं, तसं अजितदादांचं  झालं आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं वाटत नाही. जय भवानी, जय शिवाजी, भगवा अन् बाळासाहेब हे चार शब्द सोडून ते चार दिवसही राहू शकणार नाहीत. अजूनही भाजपसोबत गेलं पाहिजे असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे आणि तोदेखील अप्रत्यक्षपणे धरण्याइतपतच त्यांची मजल जावू शकेल.ते ठाणेदार आहेत, ठाणेदारच राहतील.

विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. विधानभवनच्या पायऱ्यांवर, पायऱ्यांखाली आजीमाजी मंत्री आमदार, पत्रकारांच्या चर्चा झडत असतात. काही जण छातीठोकपणे दावे-प्रतिदावे करत असतात. त्यातलेच एक अंदाज देत होते की तब्येतीच्या अनेक मर्यादा असलेले मुख्यमंत्री एक-दोन महिन्यात उपचारांसाठी अमेरिकेला जातील आणि त्यापूर्वी मोठा बदल होईल. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद ही जिद्द पूर्ण झाल्यानं ते आता मित्रपक्ष राष्ट्रवादीला संधी देतील आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील. सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून पक्ष त्यांना हस्तांतरित करणं मोठ्या साहेबांना सोपं जाईल... आणि मग आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील.

काँग्रेसचे दिवसच वाईट

यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही असं गेल्या अधिवेशनादरम्यान याच स्तंभात लिहिलं होतं, आता  पुन्हा तेच लिहिण्याची वेळ आली आहे. नाना पटोले यांनी ज्या घाईघाईत अध्यक्षपद सोडलं ते टाळलं असतं तर आजची वेळ आली नसती असंही बोललं जातं. राज्यपालांनी अपेक्षेनुसार खोडा टाकलाच पण काँग्रेसचे मित्रपक्षही अध्यक्षपद काँग्रेसला देण्याबाबत उत्सुक दिसत नाहीत. काँग्रेसचे एकूणच  वाईट दिवस सुरू आहेत.

अजितदादांचा विक्रम मोडला-

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांच्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नेत्याच्या नावे हा विक्रम होता. २०१९ च्या निवडणुकीत ते १६,६५,२६७ मतांनी जिंकले. आजवर देशात एवढं मताधिक्य कोणी घेतलेलं नव्हतं.

यावेळी उत्तर प्रदेशात दोघांनी त्यांचा हा विक्रम मोडला. साहिबाबादमधून भाजपचे सुनीलकुमार शर्मा २,१४,८३५ मतांनी जिंकले. नोएडामधून १,८१,५१३ मतांनी जिंकलेले पंकज सिंग हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र आहेत. आता २०२४ मध्ये अजिदादांना नवा विक्रम करावा लागेल. तेव्हाही त्यांच्या विरोधात गोपीचंद पडळकरच लढावेत ही इच्छा ते नव्या विक्रमासाठी करीत असावेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस