शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 09:00 IST

सरकार आज पडणार, उद्या कोसळणार असं छातीठोकपणे जो तो सांगत फिरणार. पण म्हणजे नेमकं काय होणार?" असं विचारलं की मात्र सगळे कावरेबावरे होणार!

- यदु जोशी

चार राज्यांमधील आणि त्यातही उत्तर प्रदेशमधील भाजपच्या धडाकेबाज विजयानंतर आता महाराष्ट्रात सत्ताबदल होणार अशी चर्चा सध्या जोरात आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं तर्क देत सुटला आहे. तर्कांच्या बाजारात अर्काचा मात्र पत्ता नाही. सरकार पडणार, आज जाणार, उद्या कोसळणार असं दावे के साथ सांगणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. असे लोक सुरुवात एकदम जोरात करतात पण "सरकार पडण्याचा फॉर्म्युला काय?"- असं विचारलं की जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखे कावरेबावरे होतात. काहीतरी होईल असं छातीठोकपणे सांगणारे लोक "नेमकं काय होईल?" असं विचारलं की गोंधळतात. 

टोकाचे भाजप विरोधक असलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी धाडकन कोसळेल असं वक्तव्य केल्यानं चर्चेला अधिकच बळ आलं खरं पण सरकार खरंच पडायचं असेल तर हवेत गोळीबार करून चालणार नाही. केवळ आशावाद वा कुणाच्या इच्छेवर ते पडू शकत नाही. कोणाला वाटतं म्हणून सरकार पडलं असतं तर ते आतापर्यंत हजार वेळा पडलं असतं ना भाऊ! ‘ कानून सबूत मांगता है और सरकार के लिए आकडा मंगता है भाई आकडा’...सत्तेचं गणित कुठूनही फिरवलं तरी ते भाजपच्या बाजूनं पडताना दिसत नाही. त्यांच्यासाठी आकड्यांच्या पिचकारीतून विजयाच्या रंगांची उधळण होणं कठीण दिसतं. 

भाजपवाले राष्ट्रवादीसोबत किंवा शिवसेनेसोबत बसतील ही रेकॉर्ड घासून गुळगुळीत झाली आहे. भाजपनं या दोन्ही पक्षांशी जो कमालीचा पंगा गेल्या दोन वर्षात घेतलाय त्यानं या दोन्ही शक्यता आता संपुष्टात आणल्या आहेत. अश्यावेळी राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती आहे. भाजप दोन्ही पक्षांवर मिसाइलवर मिसाइल फेकत आहे आणि महाविकास आघाडी सरकार भाजपशी १८५७ च्या बंडातील बंदुका घेवून लढत आहे. आता कुठे दरेकरांना हात लावला. मूळ भाजपच्या एकाही नेत्याला धक्का लावण्याची हिंमत राज्य सरकार अद्याप दाखवू शकलेलं नाही.

गिरीश महाजनांना गोत्यात आणायला निघाले होते पण देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यावर बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देता देता चार दिवस लागले, यावरून काय ते समजून घ्या. ‘गोवर्धन’ पर्वत अडचणीत आल्याची किनार त्याला असू शकते.

देवेंद्र फडणवीस हे गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उद्या महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणण्यासाठीही तेच शिल्पकार ठरतील का? उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उप-शिल्पकार ठरतील का?. बंडोबा होवून लगेच थंडोबा झालेले अजित पवार आता बंड करण्याची ताकद गमावून बसले आहेत. ते स्वत:तील शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानासारखे वाटतात. सूर्य गिळायला निघालेल्या हनुमानावर इंद्राने वज्रप्रहार केला अन् नंतर सगळ्या देवांनी मिळून त्याला शक्तीचं विस्मरण होईल असा शाप दिला होता. 

मोठ्या झाडाखालचं छोटं झाड असतं, तसं अजितदादांचं  झालं आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं वाटत नाही. जय भवानी, जय शिवाजी, भगवा अन् बाळासाहेब हे चार शब्द सोडून ते चार दिवसही राहू शकणार नाहीत. अजूनही भाजपसोबत गेलं पाहिजे असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे आणि तोदेखील अप्रत्यक्षपणे धरण्याइतपतच त्यांची मजल जावू शकेल.ते ठाणेदार आहेत, ठाणेदारच राहतील.

विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. विधानभवनच्या पायऱ्यांवर, पायऱ्यांखाली आजीमाजी मंत्री आमदार, पत्रकारांच्या चर्चा झडत असतात. काही जण छातीठोकपणे दावे-प्रतिदावे करत असतात. त्यातलेच एक अंदाज देत होते की तब्येतीच्या अनेक मर्यादा असलेले मुख्यमंत्री एक-दोन महिन्यात उपचारांसाठी अमेरिकेला जातील आणि त्यापूर्वी मोठा बदल होईल. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद ही जिद्द पूर्ण झाल्यानं ते आता मित्रपक्ष राष्ट्रवादीला संधी देतील आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील. सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून पक्ष त्यांना हस्तांतरित करणं मोठ्या साहेबांना सोपं जाईल... आणि मग आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील.

काँग्रेसचे दिवसच वाईट

यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही असं गेल्या अधिवेशनादरम्यान याच स्तंभात लिहिलं होतं, आता  पुन्हा तेच लिहिण्याची वेळ आली आहे. नाना पटोले यांनी ज्या घाईघाईत अध्यक्षपद सोडलं ते टाळलं असतं तर आजची वेळ आली नसती असंही बोललं जातं. राज्यपालांनी अपेक्षेनुसार खोडा टाकलाच पण काँग्रेसचे मित्रपक्षही अध्यक्षपद काँग्रेसला देण्याबाबत उत्सुक दिसत नाहीत. काँग्रेसचे एकूणच  वाईट दिवस सुरू आहेत.

अजितदादांचा विक्रम मोडला-

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांच्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नेत्याच्या नावे हा विक्रम होता. २०१९ च्या निवडणुकीत ते १६,६५,२६७ मतांनी जिंकले. आजवर देशात एवढं मताधिक्य कोणी घेतलेलं नव्हतं.

यावेळी उत्तर प्रदेशात दोघांनी त्यांचा हा विक्रम मोडला. साहिबाबादमधून भाजपचे सुनीलकुमार शर्मा २,१४,८३५ मतांनी जिंकले. नोएडामधून १,८१,५१३ मतांनी जिंकलेले पंकज सिंग हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र आहेत. आता २०२४ मध्ये अजिदादांना नवा विक्रम करावा लागेल. तेव्हाही त्यांच्या विरोधात गोपीचंद पडळकरच लढावेत ही इच्छा ते नव्या विक्रमासाठी करीत असावेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस