शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

आरोपी नक्की सुधारतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 1:36 PM

कारागृहात शिक्षा भोगत असताना आरोपीमध्ये सुधारणा होते. तो समाजात पुन्हा सर्वसामान्य माणसासारखा जगू शकतो, असा आपल्या कायद्याचा समज आहे. हा समज खोटा ठरवणारे अनेक कैदी आज समाजात वावरत आहेत.

विनायक पात्रुडकर

आपला कायदा सुधारणावादी आहे. आरोपीला शिक्षा व्हावी, पण ती मृत्यूदंडाची नको. कारागृहात शिक्षा भोगत असताना आरोपीमध्ये सुधारणा होते. तो समाजात पुन्हा सर्वसामान्य माणसासारखा जगू शकतो, असा आपल्या कायद्याचा समज आहे. हा समज खोटा ठरवणारे अनेक कैदी आज समाजात वावरत आहेत. जुहू येथे घडलेली घटना याचे ताजे उदाहरण ठरेल़ एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह गोणीत बांधून शौचालयाजवळ ठेवण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी पोलिसांना दिसला व त्याला अटक करण्यात आली. आरोपी दिसला म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्याने एका मुलीवर बलात्कार केला होता. तो त्या विभागात का फिरतोय, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तंत्रज्ञान व पोलिसांचा अचूक तपास यामुळे आरोपी सापडला. अशी घटना कोठेही घडू नये. अशा घटना रोखण्यासाठी कायदे अधिक कडक करण्यात आले. फाशीच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली. जनजागृती केली जाते. तरीही बलात्काराच्या घटना घडतात.

जुहू घटनेत तर आरोपीने दुसऱ्यांदा बलात्कार केला. या आरोपीला कायदा किती कडक आहे किमान पहिल्या घटनेनंतर ज्ञात झाले असावे, तरीही त्याने पुन्हा बलात्कार करण्याचे धाडस केले. याचा अर्थ त्याला कायद्याचा धाक राहीलेला नाही हे स्पष्ट होते. आरोपी नक्की सुधारतो का, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. असे आरोपी बोटावर मोजण्याइतके आहेत. पण त्यांच्यावर करडी नजर पोलिसांनी ठेवायला हवी. मुंबई पोलिसांना असे आरोपी नवीन नाहीत. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींनी बलात्कार करण्याची दुसरी वेळ होती. तशी पोलिसांतही नोंद होती. तसे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले़ १९९३ बॉम्बस्फोटातील व अन्य गंभीर गुन्ह्यातील कित्येक आरोपी जामीनावर असताना देश सोडून गेले. 

गुन्हेगारांचा असा दांडगा अनुभव असताना पुन्हा बलात्कार घडणे पोलिसांना नक्कीच शोभनीय नाही. जुहू घटनेचा धडा घेत पोलिसांनी आता तरी अधिक सर्तक राहण्याचे प्रयत्न करायला हवेत. बलात्काराचे आरोपी सुटल्यानंतर त्यांच्यावर विशेष नजर ठेवायला हवी़ कायद्यातही सुधारणा करून बलात्काराचे आरोपी जामीनावरही सुटणार नाहीत, अशी तरतुद करायला हवी. तरच अशा घटना थांबू शकतील. अन्यथा आरोपींना ना कायद्याचे भय राहिल, ना शिक्षेचे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई