शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी नक्की सुधारतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:40 IST

कारागृहात शिक्षा भोगत असताना आरोपीमध्ये सुधारणा होते. तो समाजात पुन्हा सर्वसामान्य माणसासारखा जगू शकतो, असा आपल्या कायद्याचा समज आहे. हा समज खोटा ठरवणारे अनेक कैदी आज समाजात वावरत आहेत.

विनायक पात्रुडकर

आपला कायदा सुधारणावादी आहे. आरोपीला शिक्षा व्हावी, पण ती मृत्यूदंडाची नको. कारागृहात शिक्षा भोगत असताना आरोपीमध्ये सुधारणा होते. तो समाजात पुन्हा सर्वसामान्य माणसासारखा जगू शकतो, असा आपल्या कायद्याचा समज आहे. हा समज खोटा ठरवणारे अनेक कैदी आज समाजात वावरत आहेत. जुहू येथे घडलेली घटना याचे ताजे उदाहरण ठरेल़ एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह गोणीत बांधून शौचालयाजवळ ठेवण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी पोलिसांना दिसला व त्याला अटक करण्यात आली. आरोपी दिसला म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्याने एका मुलीवर बलात्कार केला होता. तो त्या विभागात का फिरतोय, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तंत्रज्ञान व पोलिसांचा अचूक तपास यामुळे आरोपी सापडला. अशी घटना कोठेही घडू नये. अशा घटना रोखण्यासाठी कायदे अधिक कडक करण्यात आले. फाशीच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली. जनजागृती केली जाते. तरीही बलात्काराच्या घटना घडतात.

जुहू घटनेत तर आरोपीने दुसऱ्यांदा बलात्कार केला. या आरोपीला कायदा किती कडक आहे किमान पहिल्या घटनेनंतर ज्ञात झाले असावे, तरीही त्याने पुन्हा बलात्कार करण्याचे धाडस केले. याचा अर्थ त्याला कायद्याचा धाक राहीलेला नाही हे स्पष्ट होते. आरोपी नक्की सुधारतो का, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. असे आरोपी बोटावर मोजण्याइतके आहेत. पण त्यांच्यावर करडी नजर पोलिसांनी ठेवायला हवी. मुंबई पोलिसांना असे आरोपी नवीन नाहीत. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींनी बलात्कार करण्याची दुसरी वेळ होती. तशी पोलिसांतही नोंद होती. तसे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले़ १९९३ बॉम्बस्फोटातील व अन्य गंभीर गुन्ह्यातील कित्येक आरोपी जामीनावर असताना देश सोडून गेले. 

गुन्हेगारांचा असा दांडगा अनुभव असताना पुन्हा बलात्कार घडणे पोलिसांना नक्कीच शोभनीय नाही. जुहू घटनेचा धडा घेत पोलिसांनी आता तरी अधिक सर्तक राहण्याचे प्रयत्न करायला हवेत. बलात्काराचे आरोपी सुटल्यानंतर त्यांच्यावर विशेष नजर ठेवायला हवी़ कायद्यातही सुधारणा करून बलात्काराचे आरोपी जामीनावरही सुटणार नाहीत, अशी तरतुद करायला हवी. तरच अशा घटना थांबू शकतील. अन्यथा आरोपींना ना कायद्याचे भय राहिल, ना शिक्षेचे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई