शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बलात्कारासंदर्भात जात, धर्म पाहून आपण बाजू घेतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 07:08 IST

दुसरा धर्म/जातीतली माणसे आपल्यापेक्षा वेगळी असतात का? समता, न्याय आणि बंधुत्व या घटनात्मक मूल्यांवर आपला विश्वास आहे का?

दुसरा धर्म/जातीतली माणसे आपल्यापेक्षा वेगळी असतात का? समता, न्याय आणि बंधुत्व या घटनात्मक मूल्यांवर आपला विश्वास आहे का?गर्भवती असताना तिच्यावर बलात्कार झाला. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या कुटुंबातल्या १४ सदस्यांना ठार मारल्याचे तिला कळले. तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचे डोके फुटले होते. एवढ्या मोठ्या धक्क्यातून स्वत:ला सावरत ती जगत राहिली. भारतीय घटना आणि न्याय व्यवस्थेवर तिचा विश्वास होता.

राज्याच्या पोलिसांनी तिच्या बाजूने कोणताही पुरावा नसल्याचा अहवाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे दिले. सीबीआयने गुन्हेगार शोधले आणि त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. खटला महाराष्ट्रात चालविण्यासाठी पाठविण्यात आला. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने ती कायम केली.

दरम्यान ‘निर्भया’ प्रकरणामुळे सगळा देश एकवटला. त्यामुळे कायद्यात बदल करण्यात आले. बलात्काऱ्याला मृत्यूदंडाची त्यात तरतूद होती. आरोपींना फाशी दिली गेली तेव्हा तो न्यायाचा विजय मानला गेला. गुन्हेगारांना त्यातून स्पष्ट संदेश गेला, अशी देशाची भावना झाली.

हैदराबादमधील बलात्कार प्रकरणानंतरही देशभर क्षोभ उसळला. पोलिसांनी काही जणांना अटक केली आणि नंतर कथित पोलीस चकमकीत ते मारले गेले. सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘पोलिसांचे हे कृत्य बलात्काऱ्यांना न्यायव्यवस्थेच्या बाहेर फाशी देणे आहे’, असे याबाबतीत म्हटले. या प्रकरणावरून इतका प्रक्षोभ उसळला होता की, ज्याप्रकारे हे प्रकरण हाताळले गेले त्यावर कोणालाही प्रतिप्रश्न करू दिला गेला नाही. अटक झालेले लोक खरोखरच त्या प्रकरणात गुंतलेले होते किंवा नाही, हेही तपासले गेले नाही. काही काळानंतर निवृत्त न्यायाधीश एस. व्ही. शिरपूरकर यांचा एक चौकशी आयोग नेमण्यात आला. चौकशीत असे आढळले की चकमक बनावट होती आणि मारले गेलेले लोक त्या गुन्ह्याशी संबंधित नव्हते.

कथुवामध्ये बक्करवाल जमातीतल्या एका तरुणीवर बलात्कार झाला. एका संघटनेने बलात्कार करणाऱ्याच्या बाजूने जनमत उभे केले आणि मोर्चा काढला. दोन आमदारांनी मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांच्या पक्षाने त्यांना नंतर मंत्रिपदी बसवले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेसाठी जम्मू-काश्मीरच्या बाहेर पाठवले. ज्या सहा आरोपींच्या समर्थनासाठी संघटनेने मोर्चा काढला, त्या आरोपींना बलात्कार तसेच खुनाच्या आरोपाबद्दल दोषी ठरवून शिक्षा ठोठावली गेली.

उन्नावमध्ये एका तरुणीवर विद्यमान आमदाराने बलात्कार केला. प्रारंभी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. बराच आरडाओरडा झाल्यानंतर तक्रार नोंदविली गेली. लोकांनी आमदाराला पाठिंबा दिला. त्याच्यासाठी मोर्चे काढले. खटला उभा राहिला. दरम्यान, सगळ्या कुटुंबाला नेस्तनाबूत करण्यात आले. त्या तरुणीलाही ठार मारण्याचा प्रयत्न झाला. शेवटी आमदाराला न्यायालयाने बलात्कारासाठी दोषी ठरवले.

- दुर्दैवाने आपल्याकडे बलात्काराच्या अशा अगणित कहाण्या आहेत. पहिल्या प्रकरणात कुटुंबातील चौदा जणांना ठार करून महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. परंतु, दुसऱ्या राज्यात चालविल्या गेलेल्या खटल्यातील बलात्काऱ्यांना तिथल्या राज्य सरकारने शिक्षेत सवलत दिली. असे करताना आवश्यक ती प्रक्रिया अनुसरली गेली नाही. न्यायाधीशांचे मत घेतले गेले नाही. नुकतेच या आरोपींना सोडून देण्यात आले. हारतुऱ्यांनी त्यांचे स्वागत झाले. आपला समाज दांभिक झाला आहे का? गुन्ह्याचा बळी ठरलेली व्यक्ती किंवा गुन्हेगार यांची जात, धर्म पाहून आपण बाजू घेतो का? दुसऱ्या धर्मातली किंवा जातीतली माणसे आपल्यापेक्षा वेगळी असतात, असे आपले मत आहे का? गुन्हा करणारा आणि तो सोसणारा यांची जात किंवा धर्मावर न्याय ठरतो, अशी आपली समजूत आहे का? समता, न्याय आणि बंधुत्व या घटनात्मक मूल्यांवर आपला विश्वास आहे का?

- या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्याशीच द्यावी लागतील. आपल्या मुलांना आपण कोणता वारसा देणार आहोत, याचाही विचार करावा लागेल.- फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ

टॅग्स :Womenमहिला